जाणून घ्या राशीभविष्य : कसा राहील तुमचा हा आठवडा?


      राशीभविष्य : कसा राहील तुमचा हा आठवडा?


मेष:-
मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात सकारात्मक विचार ठेवावा. अनावश्यक गोंधळ टाळा आणि विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. लवकरच या क्षेत्रात काही मोठे यश मिळेल. शांत चित्ताने आणि प्रामाणिकपणाने केलेल्या कामात यश मिळेल. लाल फळांचे सेवन फायदेशीर ठरेल. वैयक्तिक जीवनात खर्चावर नियंत्रण ठेवा, बचतीवर लक्ष द्या.

वृषभ:-
या आठवड्यात तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि प्रदीर्घ काळातील अडथळे दूर होतील. नवीन कामांच्या संधी मिळतील. सोमवारपासून वेळ तुमच्या अनुकूल असेल. शेजाऱ्याशी वाद होऊ शकतो. काही निरुपयोगी कामात वेळ जाऊ शकतो. काही दिवस मन उदास राहू शकते. कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. शुक्रवार आणि शनिवारी उत्पन्नात सुधारणा होईल.

मिथुन:-
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मित्रांकडून स्नेह मिळेल. कामात कोणताही शॉर्टकट घेऊ नका. कोणालाही वाईट शब्द बोलू नका आणि वादविवादात पडू नका. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. घरातील सदस्यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.

कर्क:-
या आठवड्यात तुमचे उत्पन्न चांगले राहील. कुटुंबाकडून आनंद मिळेल आणि नवीन कामात प्रगती होईल. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. मोठा नफा मिळण्याचीही शक्यता आहे. मुलांकडून आनंद मिळेल. मंगळवार अडचणींनी भरलेला असू शकतो. बुधवार आणि गुरुवारी मन उदास राहू शकते. कामाकडेही दुर्लक्ष टाळा. शुक्रवार आणि शनिवारी नशीब पुन्हा तुमच्या सोबत राहील. उत्पन्न वाढेल पण व्यस्तही राहाल. धार्मिक प्रवासाला जायला आवडेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

सिंह:-
या आठवड्यात पैसे कमावण्यासोबतच बचतीकडेही लक्ष द्यावे लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या, ओव्हरस्पीड अजिबात करू नका. गुडघे किंवा पाठीत अचानक दुखणे देखील होऊ शकते. आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्या. वैयक्तिक जीवनातील लहान आव्हानांना घाबरू नका.

कन्या:-
आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली राहील. कामे वेळेत पूर्ण होतील. सोमवार आणि मंगळवारपासून चिंता वाढू शकतात. कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात. खर्चाचा अतिरेक होईल. बुधवारपासून परिस्थिती सुधारेल. कामाचा अतिरेक वाढेल. गुरुवार आणि शुक्रवारी तुम्हाला यश मिळेल. मुलांचे सहकार्य मिळू शकते. परदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. शनिवारी कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळेल.

तूळ:-
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील. आरोग्य चांगले राहील, खूप उत्साही वाटेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. विचार सकारात्मक ठेवा. कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल. आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध फायदेशीर ठरतील. भाग्य तुमच्यावर कृपा करेल. वैयक्तिक जीवनात खूप कष्ट करावे लागतील, परंतु इच्छित परिणाम मिळतील.

वृश्चिक:-
या आठवड्यात तुमच्या उत्पन्नासोबत खर्चातही वाढ होईल. आठवडाभर पैसे मिळतील आणि कामाचा अतिरेक होईल. सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नशिबाची साथ मिळेल. व्यस्तता राहील पण उत्पन्नही चांगले राहील. बुधवार व गुरुवारी मोठी कामे होणे अपेक्षित आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी भावांकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून बळ मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

धनु:-
धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली निर्णयक्षमता मजबूत ठेवावी लागेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या अनुभवावर आधारित निर्णय घ्या. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.

मकर:-
या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढेल. कामे वेळेवर होतील आणि मन प्रसन्न राहील. सोमवार आणि मंगळवारी काही अडचणी येऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढतील. बुधवार आणि गुरुवारी परिस्थिती पुन्हा सुधारेल. योजना यशस्वी होतील. उत्पन्न वाढेल. शुक्रवार आणि शनिवारी कुटुंबासह कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहू शकता. तुमचे उत्पन्न चांगले होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. प्रेमाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात.

कुंभ:-
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. तुम्हाला सूर्यदेवाची असीम कृपा प्राप्त होईल. आरोग्य चांगले राहील, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात यश मिळेल, पदोन्नती होऊ शकते. नशीब तुमच्यावर सर्व बाजूंनी कृपा करेल. वैयक्तिक जीवनात जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.

मीन:-
मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात धीर सोडू नये. आव्हानांना खंबीरपणे सामोरे जा, घाबरू नका. आरोग्य चांगले राहील. म्हणूनच मेहनत करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा, कचऱ्याची चिंता सोडून कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. वैयक्तिक आयुष्यात कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका, चांगले विचार करा, चांगले घडेल.


डांबरी रस्त्याला तीन महिन्यात भेगा; कंत्राटदारावर प्रश्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : किन्हाळा भागातील एका रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र, दोन ते तीन महिन्यातच या डांबरी रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा गेल्याचे दिसत आहे. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा नागरिकांची ओरड आहे. एवढेच नव्हेतर यासंदर्भात त्यांनी या दोन किलोमीटर रस्त्याच्या कामात गावाजवळ एक ते दिड किलोमीटर पर्यंत तीन लेयर टाकण्यात आले असून गावाच्या बाहेर काही अंतरावर दोन लेयर टाकून कंत्राटदार मोकळे झाले असून संबंधित विभागाला याबाबत देखील तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, कुणीही याकडे लक्ष दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. थातूर मातुर काम केल्याने या नुकत्याच काम केलेल्या रस्त्याला भेगा गेल्या संबंधित ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे केल्यानेच या रस्त्याला ठिक ठिकाणी तडा गेल्या याची चर्चा किन्हाळा परिसरात होत आहे.
मारेगाव ते मार्डी कडे जाण्यासाठी किन्हाळा येथील हा रस्ता महत्त्वाचा असल्याने; मारेगाव-मार्डी कडे जाण्यासाठी हजारो लोकांची या रस्त्यावरून दररोज वाहने जात असल्याने दोन महिन्या अगोदर या रस्त्यासाठी डांबरीकरण केले; परंतु रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन महिने देखील उलटले नाहीत तोच या सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा (चिरा) गेल्या असून, या रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदाराचे पितळ उघडे पडले असून, या ठेकेदाराला आशीर्वाद कुणाचा अशी भावना वाहनधारक व्यक्त करीत आहे.
मारेगाव ते मार्डी या मार्गांवरील किन्हाळा दरम्यान झालेल्या डांबरी रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेले. यात किन्हाळा 2 किलोमीटर मध्ये गावापासून काही अंतरा पर्यंत ठेकेदाराने केलेल्या कामाला जास्त ठिकाणी तडे गेले आहेत. 'आता संबंधित विभाग' या चिरा पडलेल्या ठिकाणे नवीन करणार का? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

बेमुदत काम बंद धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : सोमवार, दि. ५/६/२०२३ पासून महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना, मारेगांव च्या वतीने सर्व पदाधिकारी व ग्राम रोजगार सेवकांचे बेमुदत काम बंद धरणे आंदोलन येथील पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. अशा आशयचे निवेदन पं स गटविकास अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना देण्यात आले. 

 प्रमुख मागण्या :

१) रोजगार सेवकाला सम्मानाची वागणुक देणे
२) मग्रा मनरेगा अंतर्गत कार्यारत असलेले ऑपरेटर यांचेकडे असलेला म.ग्रा.रोहयो योजनेचे टेबल श्री बादल खंडारे यांचेकडून काढण्याबाबत.
३) कामाची मागणी दिल्यानंतर त्वरीत मस्टर मिळत नसल्याबाबत.
 या प्रमुख मागण्यासह इतर ही मागणी केली जात आहे.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून, रोजगार सेवकांच्या अमंलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात आहे. तसेच येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड रोजगार सेवकातून होत आहे.

त्यामुळे रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या त्या टेबलवरून ऑपरेटर ला तात्काळ हटविण्यासाठी महाराष्ट्र रोजगार सेवक संघटना मारेगावच्या वतीने सोमवार 5 तारखे पासून काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नारीशक्ती चा एल्गार

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील केसुर्ली येथे गेल्या दोन वर्षापासुन अवैध दारूविक्री सुरू आहे. यासाठी अनेकदा दारूची विक्री बंद करण्यासाठी गावातील महिलांनी विनंती केली परंतु याचा काही परिणाम न झाल्याने अखेर गावातील महिला व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन वणी पोलीस स्टेशनला २ जुन रोजी अवैध दारू विक्री बंद करण्याबाबतचे निवेदन दिले.

वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या केसूर्लीत अवैध दारू विक्री व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून जोमात सुरु आहे. या दारू विक्री मुळे महिला मंडळींना नाहक त्रास सहन करावा लगत असून अनेकांच्या संसारात कलह वाढले आहे. या अवैध दारूविक्री मुळे विद्यार्थ्यांवर सुद्धा वाईट परिणाम होण्याची शक्यता असून व्यसन जडण्याची दाट शक्यता महिला वर्गातून वर्तविली जात आहे. त्यामुळे येथील दारू विक्री करीत असण्याऱ्यावर कठोर कारवाई करा यासाठी महिलांनी एल्गार पुकारला असून वणी ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

या दारू मुळे अनेक महिला त्रस्त झाल्या असून त्यांचा परिवार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे तात्काळ "अवैध दारूविक्री" बंद करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा निवेदनातून वणी ठाणेदार यांना केसुर्ली गावातील महिला व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला. यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते, तूर्तास दिलेल्या निवेदनावर संबंधित पोलीस प्रशासन काय ठोस पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आदिवासी गोंड गोवारींचे एकदिवसीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आदिवासी गोंड गोवारी जमातीला भारतीय संसदेच्या पहील्या अनुसुचित जमाती दुरुस्ती विधेयक १९५६ द्वारा अनुसुचित जमातीचे आरक्षण प्राप्त झाले.त्यापुर्वी १९५३ ला काकासाहेब कालेलकर कमिशनने गोवारी जमातीची शिफारस केंद्र सरकारला केली होती.त्यानुसारच गोंड या मुख्य जमाती अंतर्गत क्रमांक १८ वर गोंडाची उपजमात म्हणून गोंड गोवारी अशी नोंद आली.तेंव्हा पासुन ढाल वाघोबा नागोबा मोठा देव भिवसन या देवतांची उपासना करणाऱ्या गोवारीना गोंड गोवारी म्हणून आदिवासी चे आरक्षण प्राप्त आहे.

नुकत्याच १८डिसेंबर २०२० च्या ऐतिहासिक मा.सर्वोच्च न्यायालयाच्या ४०९६ /२०२० या निर्णयाने गोंड गोवारीच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले आहे.या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने १९६१ व १९७१ च्या जनगणनामध्ये गोंड गोवारी जमात यवतमाळ जिल्ह्यातील वणी,केळापुर ,यवतमाळ तालुक्यात चंद्रपुर जिल्ह्यातील सिरोंचा ,गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात मेळघाट तालुक्यात गोंड गोवारी जमात आली असुन १९६१ च्या इथनोग्राफीक नोट्स नुसार पान क्रमांक १९८ वर गोंड गोवारींची आडनावे नेहारे ,नागोसे,राऊत अशी आहे हे स्पष्ट नमुद केले आहे.
      
एवढा स्पष्ट निर्वाळा मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला असताना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार गोंड गोवारीचे जात प्रमाणपत्र प्रस्ताव फेटाळत आहे.सोबतच अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ गोंड गोवारीचे वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सुध्दा रद्दबातल करत आहे.ही कृती म्हणजे सदर अधिकारी व संस्थां यांचे कडून मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा अवमान असुन संविधानाचे उल्लंघन आहे.त्यामुळे आदिवासी गोंड गोवारी जमातीवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध तथा आपला आक्रोश महाराष्ट्र शासनापर्यंत पोचविण्यासाठी दिनांक ५जून २०२३ रोजी आझाद मैदान यवतमाळ येथे एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित केले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व एल्गार संघटनेचे अध्यक्ष मनोहर शहारे ,आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समितीचे अध्यक्ष माधव कोहळे हे करणार आहेत.तरी हजारोच्या संख्येने वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव ,झरी ,वणी तालुक्यातील हजारो गोंड गोवारी बांधवांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन पुंडलिक फुन्ने,सुभाष लसंते,संजय चचाने,निलेश चौधरी,धनराज खंडरे,शञुघन ठाकरे,गजानन गाते,सतिश दुधकोहळे,पवन राऊत,पुरुषोत्तम राऊत,प्रदीप दुधकोहळे,अंकुश नेहारे,विलास नेहारे,सुधाकर राऊत,पवन खंडरे,शंकर खंडरे,दत्तू कोहळे,सुरेश दुधकोहळे,सुरेश नेहारे,चिंतामन वाघाडे,पंकज नेहारे,कैलास दुधकोहळे,लक्ष्मण वाघाडे,स्वप्नील नागोसे,सुनिल वाघाडे,कैलास वाघाडे ,प्रशांत लसंतेइत्यादींनी केले आहे.