कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असलेल्या 45 जनावरांची सुटका

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरांना पायदळ घेऊन जाणाऱ्या 45 बैलांची सुटका करण्यात मारेगाव पोलिसांना तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले असून, पाच जणांविरोधात मारेगाव पोलीसात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली. ही घटना काल दि 30 में ला सायंकाळी साडे चार वाजता घडली असून रात्री पासून कार्यवाही सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, करणवाडी ते रोहपट मार्गाने अवैधरित्या गुरे कत्तलीसाठी पायदळी नेत असल्याची माहिती मिळाली, मारेगाव पोलीसांनी करणवाडी ते रोहपट रोडवर बैलाच्या कळपाची पाहणी करत असतांना जीवनज्योत दवाखान्याकडे जाणाऱ्या रोड समोर 5 इसम हे बैलाचा कळप घेऊन जाताना दिसले. त्याचवेळी बैलाचा कळप सावलीत थांबवून चौकशी करण्यात आली असतांना त्यांनी तेलंगणा राज्यात दिग्रस मार्गे जात असल्याची कबुली दिली. त्यात तब्बल 3-3 बैलाचा कळप,15 जोड्या असे एकूण 45 बैल आढळून आले. बैलांना निर्दयीपणे गळ्यात दोराने फास बांधून भर उन्हात पायदळ कत्तलीसाठी घेऊन जात होते. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता पोलिसांनी बैलांची सुटका करत त्यांना जीवनदान दिले आहे. व सुरक्षेच्या दृष्टीने गुरुगणेश गौशाळा येथे गुरांना पाठविण्यात आले. याप्रकरणी तस्लिम खां वहाब खां कुरेशी (44) वार्ड 12, मारेगाव, मुकुंदा कलप्पा जाधव (35) मारेगाव, सुनील शामराव गुंजेकर (24) वार्ड नं- 4, मारेगाव, शंकर संभा भोजेवार (41) रा. मारेगाव, उमेश जनार्दन चाफले (31) वार्ड नं-7, मारेगाव यांना अटक करण्यात आली असून त्यांचे जवळून जुन्या बांबू ची 5 काठ्या, सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 5000/- व बैल 45 नग अंदाजे किंमत 9,00,000/- रुपये असा एकूण 9,05,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाचे पोहेकॉ सुनील खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन मारेगाव पोलीसात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस हेडकॉनस्टेबल चांदेकर तथा सुंकुरवार करीत आहे.

जाणून घ्या में महिन्याचा शेवटचा दिवस, राशीभविष्य : 31 मे बुधवार..!

जाणून घ्या या महिन्याचा शेवटचा दिवस, राशीभविष्य : 31 मे बुधवार..!


मेष :
मेष राशीच्या लोकांना इतरांच्या मदतीमुळे खूप आराम मिळेल. तुमच्या दिवसाचा बराचसा भाग धर्मादाय कार्यात जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. रात्री पत्नीची तब्येत बिघडल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस कुटुंबियांसोबत आनंददायी जाईल. मात्र, दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमीही मिळेल. तुमच्या घरी पाहुणे आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो. रात्री काही शुभ कार्यात भाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल.

मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी खूप चांगले राहील. या राशीच्या अनेक लोकांना मौल्यवान वस्तू मिळू शकतात. तुम्ही खूप व्यस्त असणार आहात. अनावश्यक खर्च टाळा. या क्षणी तुम्हाला पत्नीकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला असणार आहे. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यावसायिक योजनांना गती मिळेल. राज्य सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत देव दर्शनाचा लाभ मिळेल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांना राजकीय क्षेत्रात तुफान यश मिळेल. मुलाप्रती असलेली जबाबदारीही पार पडेल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाईल, रखडलेली कामेही पूर्ण होतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ प्रियजनांचे दर्शन आणि हास्याच्या वातावरणात जाईल.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस उत्पन्नाच्या दृष्टीने खूप चांगला आहे. चांगल्या कामात पैसा खर्च झाल्यास मन प्रसन्न राहील. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर थोडे नाराज राहू शकतात. वैवाहिक जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल.

तूळ :
आज तूळ राशीच्या लोकांसाठी स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जास्त धावपळ केल्यामुळे हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर तुम्ही एखाद्या कामाच्या संदर्भात प्रवासाला जात असाल तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने धन, मान-सन्मान, कीर्ती वाढेल. थांबलेले काम सिद्ध होईल - प्रियजनांशी भेट होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवला नाही तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

धनु :
धनु राशीच्या लोकांना घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करावे लागतील. सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. अधीनस्थ कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, पैसे अडकू शकतात.

मकर :
मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे लाभ मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायात बदल करण्याचे नियोजन केले जात आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. धार्मिक स्थळांच्या प्रवासाचे संदर्भ संध्याकाळी प्रचलित होतील आणि पुढे ढकलले जातील. वाहन वापरताना काळजी घ्या.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस भरपूर खर्च आणणार आहे. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी त्याबद्दलची सर्व माहिती नीट जाणून घ्या. संध्याकाळी पत्नीचे आरोग्य सुधारेल - तथापि, पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागेल.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस वैवाहिक जीवनात आनंदाचा असणार आहे. तुम्हाला जवळ किंवा दूरचा प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचे मनही रिलॅक्स होईल.


मर्डर मिस्ट्री: तिचा अखेर खून'च केला गेला, आरोपीला ठोकल्या बेडया

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : शहरातील जैन ले-आऊट कृष्णअपार्टमेंट मध्ये बंद खोलीत एका पंचवीस वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून वणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून तपासाची गती अतिशय नियोजनपूर्वक करित या प्रकरणातील एकाला 24 तासाच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. 

मृतक प्रिया देवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे रा. बोर्डा ता.वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे तरुणीचे नाव असून ती वणी येथील कृष्णअपार्टमेंट मध्ये दोन महिन्यापासून राहत होती. सोमवारी (29 में) ला सकाळी दहा वाजता ती राहत असलेल्या खोलीतून स्थानिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्या रूम मालकाला सांगितले, त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेचा पंचनामा करित या प्रकरणातील "गुढ" काय हे शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर तिचा खून झाल्याचे तिच्या शरीरावरील व्रण वरून स्पष्ट झाले. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला गेला होता.

या प्रकरणातील आरोपी विनोद रंगराव शितोळे रा. शिरोळी ता.वसमत जिल्हा हिंगोली येथून अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान, खुनाचा कोणताही सुराग हाती लागला नसतांनाही अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करीत सापोनी माधव शिंदे यांनी आरोपीला जेरबंद केले. अवघ्या चोवीस तासांतच या गुलदस्त्यात असलेल्या घटनेचा उलगडा करीत आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

सदरची कारवाई मा. डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप, अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, यांच्या मागदर्शनाखाली पो.नि. श्री प्रदीप शिरस्कर, सपोनि माधव शिंदे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि अशिष झिमटे, पोउपनि प्रविण हिरे, सफै कांबळे, पोह गजानन होडगीर, पोना अविनाश बनकर, पोना अमोल अन्नेरवार, पोना विजय वानखेडे, पोना इकबाल, पोशि सागर सिडाम, पोशि भानुदास हेपट, पोशि अकाश अवचारे, पोशि शुभम सोनुले व पोस्टे वणी यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मृतक तरूणीचे फेसबुक द्वारे विनोद यांचे सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. तिचा प्रियकर विनोद यांनी तीचा घातपात करून गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचे नावा व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती नसताना व आरोपी हा बाहेर जिल्ह्यातील असल्याने वणी पोलिस स्टेशन मधिल कर्मचारी व अधिकारी यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करून,आरोपीची माहिती काढून त्यास त्याचे मुळ गाव शिरोळी ता. वसमत जिल्हा. हिंगोली येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालावली


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. 

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.

लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. अशातच शुक्रवार, दिनांक 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; वांजरी मार्गांवरील झाडे जमीनदोस्त, वीज पुरवठा खंडीत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील विविध भागांत सोमवारी रातपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. वांजरी मार्गांवरील भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

गेल्या एक महिन्यापासून वणी उपविभागातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस अधून मधून जोरदार हजेरी लावतोय. आज नांदेपेरा, मजरा,वांजरी यासह इतर भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता. त्यामुळे वणी नांदेपेरा मार्गांवरील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका वांजरी भागात फटका बसला असून येथील एका वीट फॅक्ट्ररी चे शेड उडून गेले आहे. मात्र, जीवितहानी कुठे झाल्याचे चित्र नसून. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.