शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवा - वणी काँग्रेस सेवादलाची मागणी


सह्याद्री चौफेर

वणी : शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजावण्यात यावे अशी मागणी वणी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मुख्याधिकारी वायकोस यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शहर अध्यक्ष प्रमोद लोणारे सेवादल, इजहार भाई शेख, विकेश पानघाटे, नईम अजिज, सुधीर खंडाळकर, राजू पेंढारकर, इरफान सय्यद, सुमित ठाकरे, महादेव दोडके, व साहिल सय्यद आदीची उपस्थिती होती. 
पावसाचे दिवस होऊ घातल्याने शहरात अनेक मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून,शहरातील खड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून खड्डेमय रस्त्याने जावं लागतं, पाणी साचलेल्या खड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे मुरूम, गिट्टी चा भर टाकून शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजावण्यात यावे अशी मागणी वणी काँग्रेस सेवादलाच्या वतीने करण्यात आली.
जर का? हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात आले नाही तर आम्हाला आंदोलन छेडावे लागेल,असा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.
            जाहिरातसाठी संपर्क : 9011152179
             जाहिरातसाठी संपर्क : 9011152179

कासारबेहळ येथे अवैध दारूचा महापूर

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर

महागांव : कासारबेहळ येथे ग्रामसभा पार पडली त्यात ग्रामस्थांनी अवैध दारू चा प्रश्न उपस्थित केला होता. दारू बंद करा म्हणून गावकऱ्यांची आग्रही मागणी आहे.

तालुक्यातील कासारबेहळ येथील होणारा दारू चा महापूर बंद करा याबाबत गावाकऱ्यांनी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केला होता. "गांव तसं चांगले पण वेशीला टांगले" असे बोलल्या जात आहे. येथील टी पॉईंटला राजरोसपणे दारू विकल्या जात असल्याची लोकांमधून ओरड आहे. या दारू मुळे अनेकांची कुटुंब उध्वस्त होत असल्याचे लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने दारू बंद करावी अशी नागरिकांतून आग्रही मागणी होत आहे.

ग्रामसभेत ठराव घेवून सुद्धा अवैध दारू विकल्या जाते तरी कशी, कोण यांना पाठीशी घालतं, कुणाचा यांचे वर वरदहस्त आहे असा अनेक प्रश्न जनसामान्यातून उपस्थित आहे. 

परिणामी येथील अवैध दारू बंद करा अशी मागणी जोर धरत आहे. 

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळ्यांना समान न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विधानसभेच्या विशेष आधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आवाजी मतदानाने मतदान करण्यात आले. सरकारच्या वतीने राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना-भाजपचे सर्व सदस्य तसेच सहयोगी पक्षांना राहुल नार्वेकर यांनाच मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. त्यानुसार ही सर्व मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना 164 सदस्यांची मतं मिळाल्याने बहुमताने अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांची निवड झाल्याची घोषणा करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांच्या स्थानापर्यंत घेऊन गेले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते, आता भाजपमध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अनेक उत्तम अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. कै. ग. वा. माळवणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, अरुण गुजराती, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे या विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्त्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा आपल्या खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली असून ते ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

 काल अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आज बहुमत चाचणीला नवनिर्वाचित सरकारला सामोरे जायचे आहे त्यात हे सरकार यशस्वी होईल का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

ब्राह्मण समाजा ची अवहेलना, रिपाई डेमोक्रॅटिक मध्ये सहभागी व्हावे - डॉ. राजन माकणीकर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : ब्राह्मण समाजाची अवहेलना कोण्या राजकीय पक्ष कडून होत असल्या चे एकिवात आले, हे योग्य नाही अश्या ब्राह्मण कार्यकर्त्यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात सन्मानाने सामील व्हावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रिय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्राच्या संकल्पनेतुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना झाली असून आदरणीय आमदार टी. एम. कांबळे यांनी डेमोक्रॅटिक RPI च्या रूपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नपूर्ती साठी पुन: बांधणी केली व मराठवाडा-महाराष्ट्र राज्यात समाजवादी विचार रुजवण्याचे कार्य केले आणि बौद्धांचे अस्तित्व निर्माण केले. 
रिपाई डेमोक्रॅटिक पक्ष ब्रह्मान्यवादाचा प्रखर विरोधक असला तरी ब्राह्मण समाज विरोधी नाही. ब्राह्मण समाजाला राजकीय अस्तित्वापासून कोणता राजकीय पक्ष वंचित ठेवत असेल स्वतःचे अस्तित्व संपवण्यापेक्षा संबंधित पक्षाला ब्राह्मण बंधू भगिनींनी लाथाडून डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.

कात्री येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या


रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : तालुक्यातील कात्री येथील रहिवासी असलेल्या एका शेतमजूराने गळफास घेऊन आपली जिवण यात्रा संपविली. 
अंकुश निळकंठ रोहणे (४५) वर्ष याने काल (ता.२) मध्यरात्री राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली.
मृतक अंकुश रोहणे हा शेतमजुरी करीत होता त्याच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
मात्र आत्महत्येचे मुळ कारण समजले नाही.
या बाबत पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली. मृतकाला ग्रामीण रूग्णाल्यात कळंब येथे  शवविच्छेदनाकरीता रवाना करण्यात आले असुन पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे.