वनोजा (देवी) सोसायटी वर शिवसेना - काँग्रेस आघाडीचा झेंडा

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वनोज देवी विविध कार्यकारी संस्थेवर शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मिळून शेतकरी विकास आघाडी ची स्थापना करून ३० मार्च ला निवडणूक लढवली,त्यात शेतकरी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 
 
आज गुरुवार (ता.२८) एप्रिल रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी खरेदी विक्री मारेगाव येथे पाचरण करण्यात आले. यात शिवसेनेचे गोवर्धन टोंगे हे अध्यक्ष तर काँग्रेसचे मारोती नगराळे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच 
संचालक मंडळ बंडू पुनवटकर, शंकर वैद्य, रामभाऊ पिदूरकर, किशोर धांडे, प्रभाकर ढवळे, टिवलू टोंगे, उमेश राजूरकर, आनंदराव घोटकर, रवींद्र धांडे, शोभा नागपुरे, जाई टोंगे आदींचा समावेश आहे. हे सर्व आनंदी वातावरणात घडवून आणण्यासाठी पराकाष्ठा नेतृत्वाला करावी लागली, हे विशेष...
     (अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करताना)

त्याकरिता गोवर्धन टोंगे, प्रशांत भंडारी, उपसरपंच जनार्दन गाडगे, गंगाधर कडुकर, संभाजी बहिरे, प्रकाश पिदूरकर, संदीप भोपरे, विजय बोढाले इत्यादीचे खूप मोठे योगदान लाभले.

यावेळी निवडणूक अधिकारी इंगोले साहेब, भाऊराव काळे, सचिव यांचे यांचे मार्गदर्शनात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड शांततापूर्ण व बिनविरोध संपन्न झाली. 

"शिक्षण विभाग पंचायत समिती झरी यांच्या संकल्पनेतून साकारला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा."


निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

झरी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन अतिशय गतीमान होत चालले आहे. बदलत्या युगात ज्यांनी स्वतःमध्ये बदल केला ते प्रवाहात टिकले व ज्यांनी बदल स्विकारला नाही. अशा बाबी मात्र काळाच्या पडद्याआड लुप्त झाल्या.

मानवाला यशोशिखरावर पोहोचायचे असेल तर, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची,पराकोटीच्या जिद्दीची व चिकाटीची,उच्चतम महत्वाकांक्षेची गरज असते. विकासाला पुरक असलेली मानवी सचोटी केवळ स्पर्धेच्या सहाय्याने प्राप्त करता येते.शहरातील वातावरण व तेथील पुरक परीस्थिती ह्यामुळे शहरी विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात सहजच सामील होतो. याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थी परिस्थितीच्या अभावामुळे दिवसा गणिक मागे पडतो. त्यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊण स्पर्धेतून अलगद बाहेर फेकला जातो. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विध्यार्थी स्पर्धेच्या प्रवाहात टिकावेत ह्या करिता जडण घडणी सोबतच स्पर्धात्मक युगाचे बाळकडू त्याला दिल्यास भविष्यात जि. प. शाळेचा विध्यार्थी स्पर्धेत मागे पडणारच नाही. हया विचाराने ध्येयवेडे होवून,जि.प.यवतमाळचे शिक्षणाधिकारी मा.सूर्यवंशी साहेब ह्यांनी "महादिप " ह्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परिक्षेस सुरूवात केली व हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला.

विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवेदनशील भागातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्न करणारे उपक्रमशिल गटशिक्षणाधिकारी मा. नगराळे साहेब व मानवतावादी द्दृष्टी जपणारे विध्यार्थीप्रीय गटविकास अधिकारी मा.मुंडकर साहेब यांनी मा.केंद्रप्रमुख व गटसाधन व्यक्ती सर्व मान्यवर मुख्याध्यापक व नवोपक्रमशील शिक्षक यांच्या सहकार्याने "महादिप" ह्या स्तुत्य उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्या मुळे झरी सारख्या अतिदुर्गम तालुक्यातून तब्बल २१ विध्यार्थी जिल्हा स्तराकरिता निवडल्या गेले. ह्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या यशस्वीते करिता अपार मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देवून सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.

"महादिप" उपक्रमा करिता प्रश्नावली तयार करून नंतर झटणारे सौ.सुरेखा ठाकरे मॅम पंचायत समिती पांढरकवडा,सौ.आशालता कोवे मॅम पंचायत समिती वणी व श्री.कैलास गव्हाणकर सर यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.'आपल्या पंचायत समितीमधील ८९ शाळा कोरोणा काळात सुध्दा अखंडपणे सुरू होत्या. आमचा शिक्षकवर्ग विध्यार्थी हिताचे कार्य निरंतरपणे करत होता. त्यामुळे विध्यार्थी आजही शाळेशी कायमचा जुळून राहू शकला. म्हणूनच आज संपूर्ण तालुक्यातून एवढ्या उत्तम प्रकारे विद्यार्थी स्पर्धेत निडरपणे उतरू शकला. 'असे मत आपल्या प्रास्ताविक भाषणातून सन्माननीय नगराळे साहेब ह्यांनी व्यक्त केले. यवतमाळ येथून आलेले सन्माननिय काठोळे सर ह्यांनी, झरीतील शैक्षणिक प्रगती बाबत व शिक्षकांच्या बदल्या तथा पदोन्नती बाबत आपल्या भाषणातून माहिती विषद केली. "स्पर्धा ही मानवी जीवनातील एक नसंपणारी बाब आहे." असे मत शिक्षक सत्कारमूर्ती मा.शंकर केमेकार सर ह्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केले."आमच्या मनात सकारात्मक उर्जा भरण्याचे काम मा.मुंडकर साहेब व नगराळे साहेब निरंतर करतात परंतु मा मुंडकर साहेबांच्या बदली मुळे आम्ही पोरके होवू.आपणास शक्य असल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी आपली बदली रद्द करुन बघा" अशी आर्त हाक माननिय पोलचेट्टीवार सर यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केली. ह्या शब्दांनी क्षणभर सभाग्रुहातील प्रत्येक मुख्याध्यापकाच्या मनात भावनिक लहर निर्माण झाली व प्रत्येकाच्या मनपटलावर मा.मुंडकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विविधशैक्षणिक कार्याची प्रतिमा उमटली. श्रीकांत काळे सर ह्यांनी आपल्या गायनाने उपस्थितांचे मन प्रफुल्लित केले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन हर्षदा चोपणे मॅम ह्यांनी तर आभारप्रदर्शन श्री मोहन काटकर सर ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.नगराळे साहेब यांच्या मार्गदर्शनात केंद्रप्रमुख सर्वश्री कुळसंगे सर,चुधरी सर,विनोद मडावी सर,पोलचेट्टीवार सर,सहारे सर,काटकर सर,यमसनवार सर, गजानन आकुलवार सर,मुंडाले मॅम,वांढरे सर,भोयर सर,वाईकर सर व सर्व गटसाधन व्यक्ती पंचायत समिती झरी यांनी परिश्रम घेतले.

मा.कुरेकर सर ह्यांनी सर्व मुख्याध्यापकांना (U-dise) प्रपत्रामध्ये नव्याने समावेशीत करण्यात आलेल्या घटका बाबत सखोल मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मुख्याध्यापकांच्या सहकार्याने सत्काराच्या कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

राज्यस्तरीय "आदर्श समाजरत्न" प्रेरणा पुरस्कार २०२२ मा.निर्भीड पत्रकार सुनिल भोसले यांना प्रदान


स्नेहा मडावी | सह्याद्री चौफेर

पुणे : संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य. यांच्या तर्फे या वर्षी पासुन २०२२ अर्थात पहले वर्षी सुरूवात करण्यात आली आहे.

हा पुरस्कार समाजातील काही वेगळ्याच तऱ्हेची वेडी माणस उपेक्षितांसाठी झटत असतात. हे वेड ध्येयाच, समाजसेवेच असत, आणि याचीच जाणीव ठेवून संघर्ष सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हे पुरस्कार मा.सुनिल ज्ञानदेव भोसले यांना प्रदान केले आहे. 

सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक, ते समाजात विविध उपक्रम राबवित असतात. अनेक आजच्या काळात अशी उल्लेखनीय माणसं मिळणे कठीण आहे. सुनिल ज्ञानदेव भोसले यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

विविध माध्यमातून पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रमजान ईदच्या तयारीसाठी सूरमाज फाउंडेशनने मदत केली


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : रमजान हा पवित्र महिना आहे ज्यामध्ये प्रत्येक मुस्लिम उपवास करतो. उपवासाचा अर्थ असा आहे की तो दिवसभर अल्लाहची उपासना करतो आणि फक्त उपाशी राहत नाही तर खोटे बोलणे, एखाद्याचे नुकसान करणे, वाईट करणे, भांडणे करणे आणि चुकीचे काम करणे या सारख्या सर्व वाईट कृत्यांपासून दूर राहतो. यामुळे अल्लाह त्या व्यक्तीला त्याने केलेल्या कामापेक्षा त्याच्या बँकेतून 70 टक्के नफा देतो. जे ईदच्या रुपात एक मेंढी आहे.

ईदच्या दिवशी मुस्लीम समाज आपल्या घरी विविध प्रकारचे पदार्थ बनवतात, ज्यामध्ये खास शिरकुर्मा असतो आणि हा शिरखुर्मा ईदच्या दिवशी आलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना वाटून दिला जातो.  परंतु अनेक गरीब कुटुंबे या आनंदापासून वंचित आहेत म्हणून सूरमाज फाउंडेशन चोपडा यांना हे धार्मिक कार्य करण्याची संधी मिळाली आणि गुरुवार 28 एप्रिल 2022 रोजी चोपडा तालुक्यातील बेवा, गरीब आणि गरजू लोकांना 300 शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. 

शिरकुर्मा किटमध्ये कोपरा, काजू, चारोळी, बेदाणे, साखर आणि शिरकुर्मा बनवण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट होती आणि ती सुमारे 20 लोक खाऊ शकतात.  सूरमाज फाऊंडेशन असेच कार्य करत राहावे आणि आपण सर्वांनी यात नेहमी योगदान द्यावे अशी प्रार्थना करतो.

हे काम पूर्ण करण्यासाठी हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाऊंडेशन), डॉ.मोहम्मद रागीब, शेख मुजाहिद इस्लाम, अबुलौस शेख, डॉ.मोहम्मद जुबेर शेख, जियाउद्दीन काझी साहेब, शोएब शेख, जुबेर बेग व त्यांच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभले.

बोटोणीतील सरपंचासह दोन सदस्य अपात्र

सह्याद्री | चौफेर न्यूज 

मारेगाव : जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सरपंच सह दोन सदस्यांना अपात्रतेची टांगती तलवार उभी ठाकली आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निर्गमित आदेशाने मारेगाव तालुक्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बोटोणी ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक सन २०२० मध्ये पार पडली. या निवडणुकीत सुनीता जुमनाके, सुवर्णा ठक, अश्विनी मडावी हे सदस्य म्हणून निवडून आले. नव्हेतर गावातील प्रथम नागरिक म्हणून सुनीता विनायक जुमनाके ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या.

दरम्यान, या तिन्ही सदस्यांनी वर्षभरात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार येथील महादेव सिडांम यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तिघांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय निर्गमित केला. या निर्णयाने बोटोणीसह तालुक्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
न्यायालयात दाद मागू
      
मध्यंतरी कोविड ने सर्वसामान्य जनतेची झालेली परवड,एसटीचा संप यामुळे जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यात अडसर निर्माण झाला. अशातच अपात्र संदर्भात कुठली नोटीस आपणास यापूर्वी प्राप्त झाले नाही. त्यामुळे अपात्र च्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू.
       
- सुनीता जुमनाके
सरपंच ग्रामपंचायत, बोटोणी