धान उत्पादक शेतकऱ्यांना धाणाचा बोनस जाहिर करा...


उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : यावर्षीच्या खरीप हंगाम २१-२२ मध्ये राज्य शासनाने खरेदी केलेल्या धानाला राज्य सरकारने अजूनर्यंत बोनस जाहीर केलेला नाही त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा व गोंदिया या धान पट्ट्याच्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत  असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटा चा सामना करावा लागत आहे.

आपल्या हक्काच्या प्रतिक्षे मुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. शेतकऱ्यांमध्ये हक्काच्या बोनस जाहीर करण्यात यावा याकरिता भारतीय जनता पार्टी तालुका सावलीच्या वतीने धरणे देत मुख्यमंत्री यांना नायब तहसीलदार सागर कांबळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, जिप सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा भाजपा महिला उपाध्यक्ष तथा नगरसेविका निलिमा सुरमवार, नगरसेविका शारदा गुरुनुले, पंचायत समिती सदस्य तुकाराम ठिकरे, पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे, पंचायत समिती सदस्य छाया शेंडे,भाजपा युवा तालुका अध्यक्ष विनोद धोटे, भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, महिला अध्यक्ष गुड्डी सहारे, जेष्ठ नेते प्रकाश खजांची, कवेंद्र रोहनकर, दिवाकर गेडाम, नामदेव भोयर, राकेश गोलेपल्लीवार, युवा नेता प्रसाद जक्कुलवार,मयूर गुरुनुले, शुभम कटारे,वृषभ कोटरंगे, अंबादास गुरुनुले, अंकुश भोपये, मुक्तेश्वर थोराक, मनोज अमरोजवार आदी कार्यकर्ते सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

ॲड रोहिणी पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील रहिवासी असलेल्या ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी यांची नांदेड जिल्हा न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

माननीय उच्च खंडपीठ व एम पी एस सी च्या वतीने सात जागांसाठी जिल्हा न्यायाधीश याच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात त्यांनी उज्वल यश संपादन केल्यामुळे त्यांची न्यायाधीश पदी निवड झाली आहे.

ॲड रोहिणी राजेंद्र पटवारी या बी ए एल एल एल एल एम बी असून लातूर येथे जिल्हा न्यायालयात दहा वर्ष वकिली व्यवसाय केलेला आहे. त्या दयानंद लॉ कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्य केलेले आहेत तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वकील म्हणून कार्य केलेले आहे.

 त्या लातूर जिल्ह्यातील पहिल्या एकमेव महिला न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे त्या ऍडव्होकेट राजेंद्र पटवारी यांच्या त्या सुविज्ञ पत्नी आहेत त्यांच्या या निवडीबद्दल टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर व सावित्रीबाई फुले महिला शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका महानंदा सुवर्णकार, बालाजी सुवर्णकार, सुधाकर बापकेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

वऱ्हाडी, कोरकू अशा स्थानिक भाषेतून शासकीय योजनांचा प्रचार


सह्याद्री चौफेर | न्यूज 

अमरावती : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. या अभिनव कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषतः वऱ्हाडी आणि कोरकू भाषेतून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती अमरावती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता.


लोककलावंतांच्या अभिनयाने दिली शासकीय योजनांना प्रसिद्धी
गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.

समर्पण बहुद्देशीय संस्था, माई मानव बहुद्देशीय संस्था तसेच गंधर्व बहुद्देशीय संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात 63 च्या वर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, चांदुररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरूड, अंजनगाव सूर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. धारणी तसेच चिखलदरा या भागात कोरकु भाषेतूनही ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले, हे विशेष.


ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता आमच्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्यात.

ग्रामस्थांनी घेतला लोककलेचा आस्वाद
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात लोककलेला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु कोरोना निर्बंधामुळे लोककलेचे आयोजन दोन वर्षात झाले नव्हते. जिल्हा माहिती कार्यालयामुळे ग्रामस्थांनी लोककलेचा आनंद घेतला. या पारंपारिक लोककलेच्या कार्यक्रमाचे प्रथमच जिओ टँगिंगही करण्यात आले होते. कलापथकांच्या सादरीकरणाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करुन कलावंतांचे आदरतिथ्य केले.

टँकर पलटून चालक जागीच ठार

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बेंबळा कालव्याची कामे  परिसरात अतोनात सुरू आहे. येथील कामांना विविध साहित्यासह पाणी पुरवठा करण्याकरिता जात असलेला टँकर नाल्यात कोसळला. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वृत्त असून सदर घटना आज (ता.२४ मार्च) रोजी २ वाजता च्या दरम्यान घडली.

शिवदास जयसिंग राठोड (६४ वर्ष) रा. करजी असे मृतक चालकाचे नाव आहे. तालुक्यातील बेंबळा (प्रकल्प) कालवाच्या कामाला पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येतेय. अशातच आज पाणी भरलेला टँकर घेऊन जात असतांना अचानक नाल्यात कोसळून पलटी झाला असून यामध्ये चालक जागीच ठार झाला असल्याचे समजते.
दरम्यान,पोलीस येण्यापूर्वीच टँकर जैसे थे करून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करित आहे.


माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत शहरातील युवकांचा भाजपात प्रवेश

कालू रामपुरे | सह्याद्री चौफेर 

वरोरा : शहरातील यात्रा व बाजार वार्ड परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने २३मार्च बुधवारला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी हंसराज अहीर यांनी युवकांना प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देत कोणतीही मागणी न करता ज्या आनंदाने आपण भाजपात प्रवेश केला तो आनंद वाढेल.या पक्षात आपला मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली . जाती पातीचा विचार न करता सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास या मूलमंत्राने काम करणारा भाजप हा पक्ष आहे.अश्या पक्षात आपले स्वागत आहे असे उद्गार यावेळी काढले. 
      
दीपक चव्हाण यांच्या सोबत नासिर खान, अनिल सिंग, शशिकांत गुप्ता, निसर्गाने, आदर्श सोयाम,सागर चौधरी, बशीर पठान, रिजवान रंगरेज, आतिक पठान, रमेश पंधराम या प्रमुख युवकांच्या यात्रा व बाजार वार्ड परिसरातील ७९ युवकांच्या गळ्यात मान्यवरांच्या हस्ते भाजपाचा दुपट्टा टाकत व गुलाब पुष्प देत पक्षात प्रवेश दिला. या युवकांनी हातात भाजपाचे झेंडे घेत जय घोष करीत विजयी घोषणा दिल्या. 
या युवकांच्या प्रवेशामुळे या भागातील भाजपाची स्थिती बळकट झाली असून येत्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असे मत भाजपचे जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी यावेळी नोंदविले.

माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, प्रदेश युवा मोर्चाचे सचिव करण देवतळे, बाबासाहेब भागडे, ओम मांडवकर, विजय वानखेडे, सुरेश महाजनआदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
      
या कार्यक्रमाला देविदास ताजने, महेश श्रीरंग, आशिष रणदिवे, संजय राम, विलास गयनेवार, दिलीप घोरपडे, अक्षय भिवदरे, डॉ.गुणानंद दुर्गे, मोहन रंगदळ, ओम यादव, दिपक घुडे, रेखा समर्थ, ममता मरसकोल्हे, ज्योति किटे,छाया चौव्हाण आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन राऊत यांनी कार्यक्रमाचे संचलन तर विनोद लोहकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.