जेष्ठ नागरिकांचा अनुभव समाजाच्या उन्नतीसाठी उपयोगी - आ. जोरगेवार


सह्याद्री न्यूज |  किरण घाटे 
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : जेष्ठ नागरिकांकडे अनुभवाचा अमुल्य साठा आहे. त्यांचा हाच अनूभव समाजाच्या सर्वांर्गीण विकासासाठी उपयोगी असून त्यांच्या या अनुभवाचा समाजाने समाजाच्या हितासाठी उपयोग करुन घेतला पाहिजे .असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.शिवाय त्यांनी या वेळी जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी २५ लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही केली.
           
जेष्ठ नागरिक दिनानिमीत्य आज शुक्रवारी जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात जेष्ठ नागरिक ओळखपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवराव पिंपळकर, श्रीराम तोडासे, डाॅ. बंडूदास डाभेरे, गोसाई बलकी, मारोतराव मत्ते, गंगाधर पिदूरकर, मानिकराव गहूकर, अरविंद मुछूलवार, रमेश येगीनवार, रामटेके, गूरकर, राजू तंगडपल्लीवार, गणेश बहेकर, आदींची प्रमूख उपस्थिती होती.
        
ज्येष्ठांचा मान , सन्मान व त्यांच्याप्रती आपल्या मनात असलेला आदर व्यक्त करण्यांसाठी तसेच ज्येष्ठ लोकांशी जगात होणारे गैरवर्तन आणि अन्यायाला रोखण्यासाठी जेष्ठ नागरिक दिवस पाळल्या जातो. हा दिवस साजरा करत असतांना समाजात जेष्ठ नागरिकांची आजची स्थिती याबाबत चिंतन झाले पाहिजे. जेष्ठ नागरिक संघाची जेष्ठांना जेवढी गरज आहे. तेवढीच या संघाची गरज समाजालाही आहे. त्यामूळे समाजानेही जेष्ठांचा त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. मला मुंबईच्या सर्वोच्च सभागृहात प्रचंड बहुमताने पाठविण्यात ज्येष्ठांची भुमीका महत्वाची होती. त्यामूळे आज मला वाटपाचा अधिकार मिळाला असता तो योग्य ठिकाणी वाटप करण्याचा मी प्रयत्न करत असून ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले, रामनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी मी २५ लक्ष रुपये देणार आहे. सोबतच नगीनाबाग येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहासाठी २५ लक्ष, मुल रोडवरील विश्रांती वरिष्ठ नागरिक सेवा संघाच्या सामाजीक सभागृहासाठी २५ लक्ष रुपये आणि सरकार नगर येथील ज्येष्ठ नागरिक मंडळासाठी २५ लक्ष रुपये आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले नौकरीतून सेवानिवृत्त झाले असलात तरी समाजाची सेवा करण्याच्या जबाबदारीतून कधीही आपण निवृत्त होऊ नका समाजाला तुमच्या मार्गदर्शनाची फार गरज असुन तूमचा हा संघ विचार आणि अनुभवाच्या ठेवीचे केंद्र आहे याचा फायदा समाजाला होऊ दया असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या होती.

वरोऱ्यातील अल्पवयीन मुली पुण्यात सापडल्या


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
वरोरा, (०१ आक्टो.) : शहरातील मालवीय वारडातिल दोन अल्पवयीन मुली दि.२७.सप्टेंबर ला सकाळीपासून बेपत्ता असुन, त्यांच्या पालकांनी मुलींना पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चंद्रपूर येथील एलसीबीने वेगाने तपासाची चक्रे फिरवून त्या मुलींना पुणे येथून शोधून काढण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, च्या दोन्ही मुलींना घेवून एलसीबीचे पथक पुणे येथून निघाले असून, आज शुक्रवारी सकाळी वरोरा येथील ते वरोऱ्यातील दाखल होणार आहेत. बेपत्ता झालेल्या पैकी एक कु. बबिता बांधे (१४) व कु. तृषाली मडावी (१५) असलेल्या सांगितले जाते. एक मुलगी कॉम्पुटर क्लासला जाते असे सांगितले व दुसऱ्या मुलीने मैत्रिणी च्या घरी वाढदिवसाला जाते. असे म्हटले होते. घरुन बाहेर पडलेल्या या दोन्ही मुली  रात्रि उशिरापर्यंत आप आपल्या घरी परतल्याच नाही. दोन्ही मुलींच्या पालकांनी त्यांचा शोधा शोध केले. परंतु त्यांना अपयश आले. या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी पालकांनी मुलींना पळवून नेल्याची  तक्रार पोलिसात दाखल केली. या तक्रारी वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून वरोरा पोलिसांनी तपास सुरू केला होता. या दरम्यानच्या वेळेत एका संशयितांचे मोबाईल लोकेशन वर्धा येथील आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी वर्धेत मिळाळलेल्या लोकेशन नुसार तपास सुरू केला. परंतु मुलीचा शोध लागत नव्हता आणि तर एकीकडे तर दुसरीकडे नागरिक हैराण होवून नागरीकात मध्ये संताप व्यक्त होत होता. त्यामुळे तपासाची सुत्रे चंद्रपूर एलसीबीकडे देण्यात आले. चंद्रपूर एलसीबीने गांभीर्याने विचारात घेऊन तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवून आणि मिळालेल्या लोकेशन नुसार पुणेचा रस्ता धरला आणि या शोध मोहीमेला अखेर यश आले. पुणे येथील दोन्ही मुली मिळून आल्याचे सांगण्यात आले आहे. मुली सोबत असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते आज वरोऱ्यातील  यांचे बयान घेतली जाईल अशी माहिती मिळाली आहे.

कोळसा वाहतूक करणाऱ्या उभ्या ट्रकमध्ये चालकाचा मृत्यु

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ आक्टो.) : वेकोलीच्या उकणी कोळसाखाणी च्या काट्या जवळ कोळशाचा काटा करण्याकरिता उभ्या असलेल्या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना काल 30 सप्टेंबरला उघडकीस आली. उकणी कोळसाखाणीतून साई वर्धा पॉवर प्लॉंट मध्ये कोळशाची वाहतूक कर्णार्या MH 34 AB 1082 या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळून आल्याने खदान परिसरात चांगलीच खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील रहिवाही असलेला रामदेव नामक ट्रक चालक माजरी येथे रहात असल्याचे कळते. तेथीलच कोळसा वाहतूकदाराकडे तो ट्रक चालक म्हणून कामाला होता. काल रात्री उकणी कोळसा खदानीतून कोळसा भरुन तो साई वर्धा पॉवर प्लॉंट ला जाणार होता. फास्ट ट्याग काम करत नसल्याने त्याच्या गाडीचा काटा होत नव्हता. त्यामूळे त्याने गाडीचा काटा करण्याकरिता काट्या जवळील खुल्या जागेत ट्रक उभा केला. पण बराच वेळ होऊनही ट्रक जागचा हलला नसल्याने काही ट्रक चालकांनी ट्रकमध्ये जाऊन बघितले असता सदर ट्रक चालक हा निपचित पडून दिसला. काहींनी त्याला हलवुन व आवाज देऊन पाहिले. पण काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने खाण प्रबंधकांना महीती देण्यात आली. तो मृत पावल्याचा अंदाज बांधत ट्रक मालकाला कळविण्यात आले. त्याचा मृत्यू नेमका कसा व कशाने झाला हे अद्यापही कळू शकलेले नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल की गुलदस्त्यातच राहील ही चर्चा खदान परिसरात ऐकायला मिळत होती. सध्या कोळसा वाहतुकीची मोठी स्पर्धा सुरु असून वाहनाच्या जास्तीत जास्त चकरा लागाव्या याकरिता चालक व मालक दोघांचीही धडपड चाललेली असते. ही जीवघेणी स्पर्धा कधी कुणाच्या जिवावर बितेल याचा नेम राहिलेला नाही. वेकोलीच्या रुग्णवाहिकेने मृतदेह कोळसा खदानीतून हलविण्यात आला आहे.

साई भव्या सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीचा पाहणी प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (०१ आक्टो.) : तालुक्यातील साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनी द्धारे वेगाव येथील राजु कळसकर यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कापुस लागवड सुपर टायग्रेट बी.जी.२ लाग लागवड तारीख : ९ जुन २०२१ लागवड अंतर :- ४X३ फूट
बोंडांची संख्या : - ७०/७५
पात्यांची संख्या :- १५/१९
महिला शेतकरी :- २०५
नोंदणीकृत महिला शेतकरी २०५
शेतकऱ्यांची संख्या :- १५०+
नोंदणी कृत शेतकऱ्यांची संख्या :- १००
व्यापाऱ्यांची संख्या :- ८
गाव संख्या : ७
मागील१५ दिवसांपासून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. परंतु मुसळधार पावसामुळे २ वेळा हा कार्यक्रम रद्द केला गेला दि. २८ सप्टेंबर रोज मंगळवार रोजी वेगाव येथे साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद कंपनीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करून यशस्वी पण पार पाडला.
सुपर टारगेट हे वाण रसशोषक किडींना प्रतिकारक्षम असून सुपर टारगेट अधिक बोंडांची संख्या,प्रती फांदी ६/७ बोंड असुन, दोन बोंडामधील अंतर खूप कमी आहे. यामुळे शेतकरी खूप खूश आहे आणि परिसरातील सर्वच शेतकरी वर्गाने व महिला आम्हला पुढील खरीप हंगामात साई भाव्या सिड्स कंपनीचे "सुपर टारगेट" आणि "तुफान" बी.जी. २ याच वाणांची लागवडी करणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला साई भव्य सिड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद येथील अधिकारी यशवंतराव डफरे क्षेत्र विक्री व्यवस्थापक विदर्भ व प्रकाश बुरडकर सर यवतमाळ व चंद्रपूर यांनी शेतकऱ्यांना हखयब्रीड सुपर टायग्रेट विषय मार्गदर्शन करण्यात आले असुन, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत साई भव्या सिड्स प्रायव्हेट लिमिटेड अधिकारी व कर्मचाऱ्याचे आभार मानले.

वारंवार खंडीत होणाऱ्या विज पुरवठ्यामुळे वाढू लागला जनतेचा संताप


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (०१ आक्टो.) : विज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा आता नागरिकांच्या रोषाचे कारण बनू लागला आहे. ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यात विज वितरण कंपनी कमी पडू लागली आहे. विज वितरण कंपनीचा कारभार पूर्णता ढेपाळल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. विज वितरण कंपनीकडून करण्यात येणार्या विज पुरवठ्यामुळे ग्राहक जराही समाधानी नाहीत. वेळोवेळी खंडीत होणारा विज पुरवठा नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. विज वितरणने मान्सूनपुर्वीची कोणतीही कामे पुर्ण न केल्याने नेहमी विज प्रवाह बंद चालू होत असतो. विद्युत तारांना स्पर्श करणारी झाडे कापण्यात न आल्याने थोडीही हवा आली की, विज तारांचे एकमेकांना घर्शण होऊन नेहमी विज पुरवठा खंडीत होतो. त्यामूळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेलाही तासंतास विज गोल असते. कधी कधी तर काही कारण नसतांनाही विजेचा लपंडाव सुरु असतो. या नेहमी खंडीत होणाऱ्या विज प्रवाहामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहे. 

ग्रामीण भागत तर विजप्रवाह कधी खंडीत होईल याची शास्वतीच राहिलेली नाही. पाण्या पावसाच्या दिवसांमध्ये रात्रीलाही लाईन तासनतास बंद रहात असल्याने ग्रामीण जनतेला भितिच्या सवटात रात्र काढावी लागते. विषारी जिवांचा ग्रामीण भागत नेहमी संचार असतो. रात्री अनेकदा लाईन गोल रहात असल्याने हे जिवजन्य दृष्टीस पडत नाही, त्यामूळे जनतेच्या जिवाला धोका संभऊ शकतो. याची विज वितरण जराही जाणीव ठेवायला तयार नाही. नेहमी विज पुरवठा खंडीत होण्याने उपचाराधीन रुग्ण व आजरी व्यक्तींनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विज पुरवठा विभागाचा अजब कारभार पहायला मिळत आहे. पथदिवे दिवसालाही सुरु ठेवले जातात. तर घरगुती विज रात्री बंद केली जाते. विज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा मनस्ताप वाढू लागला आहे. विजेचा खेळ खंडोबा असाच सुरु राहिल्यास विज वितरण कंपनीला जनतेच्या रोषाला समोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राजुरवासी तर वारंवार खंडीत होणाऱ्या  वीजपुरवठ्यामुळे कमालीचे वैतागले आहेत. विज पुरवठा कधी खंडीत होईल व नंतर विज कधी परत येईल याचा नेमच राहिला नसल्याची राजुरवासीयांची खंत आहे. विज वितरणने मान्सूनपुर्वीची कामे तर केलीच नाही. पण सुरक्षिततेच्या उपाययोजनाही केल्या नाही. ग्रामीण भागातील विज खांबा वरील डीपी सताळ उघडया पडल्या आहेत. डीपीची दरवाजे तुटून पडल्याने रोहित्र खुली रहात असून, कुणी कुचिंदी केल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणाने शॉर्ट सर्किट होऊन रोहित्र जळाल्यास आसपासच्या दुकानांना व घरांना धोका निर्माण होऊ शकतो. रोहित्र जळल्याने लागलेल्या आगीच्या झळा अजुनही राजुर वासियांमध्ये धुमसत आहे. याची पुनरावृत्ती होणार नाही, ही काळजी विज विभागाला घ्यावी लागणार आहे. वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याने विजेच्या उपकरनांवर आधारित व्यवसायावरही त्याचा चांगलाच परिणाम होत आहे. विज तासंतास बंद रहात असल्याने विजेच्या उपकरणांवर आधारित सर्व कामे ठप्प पडत असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. विज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे व्यवसायिकांसह संपुर्ण जनताच त्रस्त झाली आहे. विज पुरवठा सुरळीत करण्याकडे वेळीच विज वितरणने लक्ष न दिल्यास नागरिकांचा संताप अनावर होऊन त्याचे पडसाद उमटल्या शिवाय राहणार नाही. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याचे परिणाम विज वितरणला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.