अंजनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे
बिलोली, (०१ ऑगस्ट) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांची १०१ वी जयंती मौजे अंजनी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. अंजनी गावचे सरपंच महेश पाटील हांडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजेन केले व ध्वजारोहण महेश पाटील हांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे यांनी अवघ्या दीड दिवस शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना बाराखडीची साधी तोंडओळखही होऊ शकत नाही, पण त्यांनी अनेक कथा कादंबरी, पोवाडे, त्यांनी लिहिलेली आहे. अण्णाभाऊ यांनी कामगार कष्टकरी वर्गातील लोकांच्या कथा व्यथा अपल्या लेखणी च्या माध्यमातून त्यांनी जगासमोर मांडले त्यांची प्रसिद्ध लावणी माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होती ही प्रसिद्ध लावणी एका नविन लग्न झालेल्या कुटुंबाची व्यथा मांडले. या महान महापुरुषांना जयंतीदिनी दिनांक १ ऑगस्ट रोजी अंजनी येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरपंच महेश पाटील हांडे, उपसरपंच प्रतिनिधी बालाजी मुंडकर, सेवा सोसायटी चेरमन प्रतिनिधी गोविंद बद्देवाड, शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सिद्धार्थ गावंडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गावंडे, नारायण भोईवार, सखाहरी घायाळे, किशोर भरांडे, पत्रकार गौतम गावंडे, सुभाष जाधव, विश्वनाथ भरांडे, गंगाधर भोईवार, पंढरी भोईवार, शेषेराव गावंडे, जयदीप गावंडे, भगवान धानेकर यादींची उपस्थिती होती.

माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनावणे 
बीड, (०१ ऑगस्ट) : अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर असे पानं. आपल्या लेखणीला तोफ बनवून तिच्यातून क्रांतीचे तोफगोळे फेकणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ. आपल्या डफावर परिवर्तनाची थाप देऊन जनमाणसं विद्रोहाने पेटवणारे शाहिर म्हणजे अण्णाभाऊ.

जग बदलाची भाषा बोलणारा माणुस! म्हणजे अण्णा भाऊ साठे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव येथे त्यांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी माजलगाव शहराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पोलीस निरीक्षक मा. फराटे साहेब यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात. यावेळी मा. लहुश्री भास्कर शिंदे, दत्ता भाऊ कांबळे, प्रदीप तांबे, अभिजित देंडे, अनिल ढगे, आदींची उपस्थिती होती.

राळेगाव तालुक्यात संघटन पातळीवर मनसे ची दमदार कामगिरी


सह्याद्री न्यूज | रुस्तम शेख
राळेगाव, (०१ ऑगस्ट) : राळेगाव तालुक्यात पराभूत मानसिकतेतुन काँग्रेस बाहेर पडताना दिसतं नाही, भाजपा च्या ध्येय धोरणाबाबत ग्रामीण भागात प्रचंड अस्वस्थता आहे. या मुळे तालुक्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी मनसे भरून काढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह अनेक मोठ्या गावातील शेकडो युवक मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेत प्रवेश करीत आहे. रिधोरा, वरुड, सावरखेड, चाचोरा, किन्ही या सह विविध गाववातील युवकांनी मनसेत 'दिल से' प्रवेश करून एकच खळबळ उडवून दिली. मनसेची अशीच घोडदोड कायम राहिली तर एक सक्षम पर्याय म्हणून मनसे समोर येऊ शकते, अशी राजकीय जानकारांची प्रतिक्रिया दुर्लक्ष करण्याजोगी नाही असेच म्हणावे लागेल. 
    
राळेगाव तालुक्यातील अनेक युवक ,विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेत असुन युवकांचा ओघ मनसेकडे वाढला आहे.
मनसे अध्यक्ष यांच्या महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दूरदृष्टी,स्वतंत्र अजेंडा ,सत्ता नसतांना प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करून जनतेला न्याय मिळवुन देण्याची शिकवण यामुळे राळेगाव तालुक्यातील अनेक युवक,विद्यार्थी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १५ वर्धापनदिनाचे औचित्य साधुन मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेवुन नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला आहे. मनसे उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, आनंद एंबडवार, यांच्या आदेशाने व मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक विश्रामगृह येथे पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील रिधोरा, किन्ही, सावरखेडा, खेमकुंड, वरुड, चाचोरा या गावांमधील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे यांनी प्रवेश घेणाऱ्या युवकांचे मनसेचा झेंडा देवुन स्वागत केले व पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळी मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, गणेश काकडे, राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, विठ्ठल जोगी, अमित निकाडे, सुनील बोबडे, सागर शेंदरे, अक्षय निकम, अनिल मेश्राम, मारोती ठाकरे, रुपेश शेळके, अक्षय ढेकणे, गणेश बोबडे, उमेश पावडे, लव नैताम, मंगेश तोडसे, प्रसाद परचाके, अमोल गेडाम, रोशन बावणे, उमेश क्षीरसागर, रोशन गुरनुले, राज लांडे, वूषभ गुरनुले, गजानन ऊईके, गौवर्धन मेश्वाम, पाडूरंग ऊईके, सुरेश ठाकरे, सचिन गेडाम, राहुल पेंदोर,अर्जुन सातघरे, विकास कोसुरकर, सुरेश मंगाम, विठ्ठल जुमनाके, रोहित करपते, अरविंद करपते, गजानन करपते, सुरेश सातघरे, मंगेश मोहूर्ले, कार्तिक चांदेकर, मोहन नवले, गणेश मांदाडे, निलेश सिडाम, घनश्याम मेश्राम, सागर आत्राम, गजानन गाऊत्रे, संदीप गुरनूले, योगेश वाढई, अनिल वाढई, गजानन मोहूर्ले, मंगेश मादाडे, गोपाळ मादाडे, ऋषिकेश वाघाडे, मज्जित सैयद रहीम शेख, यशवंत घरघडे, कारण नेहरे, सौरभ तुळसकर, कुणाल घरघडे, प्रशांत पवार, नागेश देकणे, शुभम नेहारे, हर्षद गेडाम, बशीर सैयद, सुदर्शन उईके, अमित उईक, ऋतिक जमूणकर, पवन दडांजे, वित्तल शेंडे, सचिन शेंडे, रवी मडावी, करण कुमरे, योगेश कुमरे, आकाश नहरे, गौरव अत्राम, विजय नेहरे, कुणाल शेंडे, तुषार शेंडे उपस्थित होते.

‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा, शासन आदेश जारी

                        (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुंबई, (०१ ऑगस्ट) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसात ३० जुलै रोजी वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठविण्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे.

राज्य शासनातील एमपीएससीकडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील २८ जुलै रोजी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, लेखा व कोषागार विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईच्या सचिव स्वाती म्हसे-पाटील आदी उपस्थित होते. त्याबैठकीत एमपीएसच्या पदभरतीसंदर्भातील हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने हा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.

 ‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला यापूर्वी मंजूरी देण्यात आली होती. दि. ४ मे २०२० आणि दि. २४ जून २०२१ च्या शासननिर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेवर निर्बंध होते. मात्र विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त असणाऱ्या पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदासह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी ३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १५ हजार ५०० हून अधिक पदांची भरती करण्याचे विधीमंडळात जाहीर केले आहे. त्या प्रक्रियेला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.

पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकुन गोवंश जनावराचे मांस विक्री करणाऱ्या चार आरोपींना केली अटक


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, ( ०१ ऑगस्ट) :
गोवंश जनावरांची कत्तल करणे व मांस विक्री करण्यावर शासनाने बंदी आणली असतांनाही शहरातील काही भागत सर्हास गोवंशाची कत्तल करुन त्यांचे मांस विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. मोमीनपुरा व रजानगर येथे धाड टाकुन डिबी पथकाने ३२० किलो गोवंश जनावराचे मांस जप्त केले. ही कार्यवाही आज १ ऑगस्ट ला सकाळी करण्यात आली. याठिकाणी गोवंश मासाची विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती डिबी पथकाला मिळाली होती.

डिबी पथकाला मोमीनपुरा व रजा नगर येथे गोवंश जनावराच्या मासाची विक्री केली जात असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता मोमीनपुरा येथे मो. नासिर मो. राशिद (५१), मो. कैसर मो. अजीज कुरेशी (४५) हे दोघे गोवंश जनावराचे मांस विकताना आढळून आले. तर रजा नगर येथे इस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी (४८), मो. जुबेर अब्दुल मुनफ़ (३५) हे मांसाची विक्री करताना आढळले. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ च्या कलम ५ (ब)(क), ९,९ (अ) व भादंवी च्या कलम १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्हीही धाड़ीत पोलिसानी ३२० किलो गोवंश जनावराचे मांस किमत ६४ हजार रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाही एसडीपिओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डिबी पथक प्रमुख गोपाल जाधव, पोउपनि आशिष झिमटे, डिबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, गजानन होटगिर, संतोष अढाव, हरिंद्र भरती, पंकज उंबरकर, दिपक वांडृसवार, विशाल गेडाम, संजय शेन्द्रे, सागर सिडाम, पंकज लांजेवार, प्रगती काकडे यांनी केली.