कलाकारांचे ९ ऑगस्ट ला राज्यव्यापी आंदोलन

                       (संग्रहीत फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे 
पुणे, (२९ जुलै) : कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी मिळावी, चित्रीकरणास परवानगी मिळावी,नाट्य गृहे सुरु करावीत आणि कलाकारांना रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी,अशा विविध मागण्यासाठी रंगकर्मी राज्यभर आंदोलन. करणार आहेत. ९ ऑगस्ट ला प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळी हे आंदोलन होणार असून, त्यात मालिका चित्रपट,नाटक क्षेत्रातील कलाकारांसह लोककलावंत सहभागी होणार आहेत. कलाकारांच्या व्यथेकडे सरकार चे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. बुधवारी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांना आपल्या व्यथा मांडल्या, पुण्यात जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर दुपारी १२ वाजता हे आंदोलन होणार असून, प्रत्येक जिल्ह्यात सरकार च्या नियमांप्रमाणे ५० जणांच्या उपस्थितीत आंदोलन होणार असल्याचे कलाकार जयराज मोरे यांनी सांगितले. 

मनसेकडून शुक्रवारी 'मदत' कोकणाकडे रवाना होणार - राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांची माहिती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (२८ जुलै) : गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आणि पुराबरोबरच दरडी कोसळण्याच्या घटनांनी अख्खी गावंच्या गाव माळीणसारखीच क्षणार्धात होत्याची नव्हती झाली.

कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले असून हजारो कुटुंब बेघर झाली आहे. हा एकूणच घटनाक्रम आणि संभाव्य उपाययोजना म्हणून मनसे आता कोकण पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता सरसावली आहे. मा. राजसाहेब ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सैनिकांना सूचना दिल्या. त्यांचे आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष राजूभाऊ उंबरकर यांनी शुक्रवारी वणीतून मदतीचा ट्रक जीवनाश्यक साहित्यसह पूरग्रस्तांना पाठविली जाणार आहे अशी माहिती दिली.

मागील काही दिवसात प्रचंड पाऊस झाल्याने कोकणातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली, अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेली. अनेकांचे बळी गेले. परिणामी कोकणात आलेल्या अतिवृष्टीमुळे येथील जीवन उध्वस्त झाले आहे. त्यांना मदतीची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेकडून स्वखर्चाने ही मदत दिली जाणार आहे.

त्यात १ हजार ब्लँकेट, १ हजार साड्या, ३ हजार बिस्कीट पुडे, ३ हजार पाणी बॉटल, ५ टन तांदूळ, दीड टन डाळ, १ हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नास्त्याचे साहित्य आदींचा समावेश असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता च्या दरम्यान, शिवाजी चौक वणी येथून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना होणार, मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होत आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रात आणून द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.



भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहारभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


"भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार शेख़ यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.."

               अभिष्टचिंतन  : २८ जुलै 
गोरगरीबांची मदत करण्यास नेहमी तत्पर असलेले इजहार भाई संकटकाळात सर्वसामान्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. कोरोना काळात त्यांनी गरजूंच्या उदर्निवाहाचा विडा उचलला. हरसंभव मदत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे मदत कार्य सुरूच आहे. तसेही त्यांची मदतगार म्हणून शहरात ख्याती आहे. त्यांच्याकडे मदत मागण्यास गेलेला कुणीही खाली हात कधी परतला नाही.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले इजहार भाई यांनी राजकीय क्षेत्रातही अल्पावधीतच भरारी घेतली आहे. त्यांच्या सुस्वभावी व्यक्तिमत्वाची व मदतकार्याची शहरात नेहमी प्रशंसा होत असते. लॉकडाऊन काळात त्यांनी गरजू गरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वितरित केले. आपत्ती व्यवस्थापनाकरिताही त्यांनी शासनाच्या साह्यता फंडात निधी जमा केला. अशा या मनमिळाऊ व मदतगार व्यक्तिमत्व लाभलेल्या इजहार शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ! त्यांचं शहरवासियांकरिता असलेलं आपुलकी व प्रेम असचं अबाधित राहावं हिच सर्वांची मनोकामना आहे.

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत हीच मनस्वी सदिच्छा....!!

शुभेच्छुक : सैफूर रहेमान, आतिफ रहेमान, वणी (यवतमाळ)

कोविड-१९ उपाययोजना करीता वितरित निधीची अफरातफर,राजुरा आरोग्य केंद्रातील प्रकार - संतोष कुळमेथे यांनी सीईओकडे केली चौकशीची मागणी

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
राजुरा, (२८ जुलै) : कोविड - १९ या आजारावर उपाययोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे वितरित करण्यात आला या निधीतून खरेदी केलेली औषध व साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याने त्याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कुळमेथे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांच्याकडे केली आहे.
    
माहे मार्च-एप्रिल २०२० मध्ये कोविड - १९ या आजारावर उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपायाकरिता राजुरा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंBBद्र चिंचोली, काढोली व देवाडा येथे औषधी, साधनसामग्री,साहित्य खरेदी करण्यासाठी तिनही आरोग्य केंद्राला प्रत्येकी एक लाख रुपये या प्रमाणे जिल्हा परिषद मधून निधी वितरित करण्यात आला या वितरित निधीतून निकृष्ट दर्जाची साहित्य खरेदी करून निधीची अफरातफर केल्याचा आरोप कुळमेथे यांनी केला आहे.
    
माहे मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेली औषधे, साधनसामग्री,साहित्य, व्हाउचर, बिल वितरकाचे नाव,खर्चित रक्कम आणि खतावलेल्या जमावही (stock book) आदींची काटेकोरपणे तपासणी केल्यास भोंगळ कारभाराची सत्यता समोर येण्याची शक्यता वर्तुळात वर्तविली जात असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

 मार्च-२०२० ते सप्टेंबर-२०२० या कालावधीत खरेदी केलेल्या साहित्याची संपूर्ण कागदोपत्री असलेल्या नोंदीची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी संतोष कुळमेथे यांनी केली आहे यावर जिल्हा परिषद कार्यालयाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

"कोविड-१९ या आजारावर उपाय योजना करण्यासाठी राजुरा तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राला जो निधी वितरण करण्यात आला त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची निःपक्षपाती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ही माझी मागणी आहे".

एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिले निर्देश

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२८ जुलै) : ‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा; शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. विशेष बाब म्हणून ४ मे आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट.

‘एमपीएससी’कडील पदांच्या भरतीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पद भरती करताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन राज्यातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.