विदर्भ साहित्य संघ कार्यकारिणी गठीत


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (३ जुलै) : दि.२८ जून २०२१ ला विदर्भ साहित्य संघ वणी शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष पदी प्रा. डॉ. सुप्रसिद्ध नाट्यकर्मी दिलीप अलोणे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन कासावर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ मार्गदर्शक वणी शाखेचे आधारस्तंभ श्री. माधव सरपटवार यांची कार्याध्यक्ष पदी तर प्राध्यापक डॉ.अभिजित अणे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यामध्ये सहसचिव कवी राजेश महाकुलकर, कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथरडकर, कोषाध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यासोबत डॉ. प्रसाद खानझोडे, अशोक सोनटक्के, अमोल राजकोंडावार, जयंत लीडबीडे आणि गजानन भगत यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षात यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, तीन पुस्तकांचे प्रकाशन आणि हेमंत व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रम अशी या शाखेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी पुढील काळात देखील राहिल असा विश्वास या नवनियुक्तनंतर अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप अलोणे आणि सचिव अभिजित अणे यांनी व्यक्त केला. 

कोविशिल्ड लसींचा यवतमाळ जिल्ह्यात तुटवडा : युवक काँग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सह्याद्री न्यूज | राजविलास 
यवतमाळ, (२ जुलै) : जिल्ह्यात युद्घपातळीवर कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, कोविशिल्ड लसींचा तुटवडा असल्याने कर्मचारी व विद्यार्थ्यांना लस मिळत नाही.

या संदर्भात युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात केवळ १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या अधिक असताना त्यांनाही केंद्रावरून माघारी पाठविण्यात येत आहे.

उपलब्ध असलेल्या लसींची संख्या लक्षात घेता सरसकट सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

जावयाच्या प्रेमात पडली सासूबाई, महिलेचा पती आणि मुलीचे कडाक्यात झाले भांडण

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
मुझफ्फरनगर (२जुलै) : उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरच्या भौराकलां पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे नात्यांमधील सर्व मर्यादा तुटून नात्याला कलंक लागला आहे. येथे एका ५० वर्षीय सासून तिच्या २५ वर्षीय जावयासोबत प्रेमविवाह केला.

मात्र, या महिलेचा पती आणि मुलीने या प्रकाराला विरोध केल्याने कुटुंबामध्ये कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन शांतता भंग केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली. (The 50-year-old mother-in-law fell in love with the 25-year-old Son-in-law, then They got married)

भौराकलां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या एका महिलेने तिच्या मुलीचा विवाह करून दिला होता. मात्र, विवाहानंतर ही महिला जावयाच्या प्रेमात पडली. या प्रेम प्रकरणामुळे सासू आणि जावई दहा महिन्यांपूर्वी घरातून फरार झाले. कुटुंबीयांनी ते फरार झाल्यानंतर कुठलीही तक्रार दिली नाही. दरम्यान, दहा महिन्यांनंतर ते परत आले. तेव्हा त्यांनी आपण कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले. मात्र,त्या महिलेचा पती आणि मुलीने आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस या दोघांना ठाण्यात घेऊन आले. तिथेही ते एकमेकांसोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊ लागले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

दरम्यान, सासूने आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या जावयासोबत विवाह केल्याचे प्रकरण आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणी दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्यापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांमधील नाते हे कलंकित करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान भौराकलां पोलीस ठाण्यातील ठाणाध्यक्ष जितेंद्र तेवटिया यांनी सांगितले की, एका सासूने तिच्या जावयासोबत विवाह केल्याची आणि ते जबरदस्तीने घरात घुसल्याची माहिती आम्हाल मिळाली होती. त्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन संबंधितांना समवजावण्याचा प्रयत्न केला. मात्र सासू आणि जावयाने एकमेकांपासून वेगळे होण्यास नकार दिला. तेव्हा आम्ही त्यांना दंड ठोठावला.

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लांबविला पावणे दोन लाखांचा मुद्देमाल

                            (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता. १ जुलै) : घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटयांनी घरफोडी केल्याची घटना आज १ जुलैला वणी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे उघडकीस आली. बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
मारेगाव (कोरंबी) येथील रहिवाशी असलेले डॉक्टर सुरेंद्र शिवनारायण भोगे (४३) हे आजारपणामुळे शहरातील मारूती टाऊनशिपमध्ये रहात होते. त्यांचे मूळगाव असलेल्या मारेगाव (कोरंबी) येथील घरी अज्ञात चोरटयांनी संधी साधून चोरी केली. बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, व सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांना शेजाऱ्यांनी फोन करून घराचे दार खुले असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी गावाकडील राहत्या घराकडे धाव घेतली. तेथील सर्व प्रकार बघून घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या आत जाऊन बघितले असता रोख रक्कम व दागिन्यांवर चोरटयांनी डल्ला मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ५० हजार रुपये रोख रक्कम, ५५ ग्राम सोने (१ लाख ३० हजार रुपये) व दोन तोळे चांदी (५ हजार रुपये) असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला. डॉ. सुरेंद्र भोगे यांनी घरफोडी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.

सूतगिरणी प्रकल्प पूर्णत्वास आणण्याच्या हालचालींना वेग, सुनिल कातकडे यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१ जुलै) : तालुक्यात रोजगाराच्या वाटा अतिशय कमी असल्याने बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. उद्योग, कंपण्या व कारखाण्यांची तालुक्यात वानवा आहे. त्यामुळे रोजगार मिळणे कठीण झाले आहे. बेरोजगारांच्या फौजा तयार होऊ लागल्या आहेत. युवकांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होऊ लागलं आहे. कुटुंबाचा आधार असलेले युवकच बेरोजगार असल्याने कुटुंबाला हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. तालुक्यात मोठे उद्योग व कारखाने निर्माण होईल यावर जोर देण्याची आज नितांत गरज आहे. म्हणूनच अनेक वर्षांपासून रेंगाळलेले सूतगिरणीचे काम पूर्ण करणे आता जरुरी झाले आहे. सूतगिरणीचे अर्धवट काम पूर्ण झाल्यास येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे सूतगिरणीच्या कामाला गती मिळावी म्हणून इंदिरा सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष व शिवसेना विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनिल कातकडे यांनी प्रयत्न चालवले आहे. सूतगिरणी निर्माणातील आर्थिक व तांत्रिक अडचणी सोडविण्याकरिता त्यांनी खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेतली. सूतगिरणीचे काम पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या निधी बाबतही सुनिल काटकडे यांनी पालकमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. सूतगिरणीचा विषय मार्गी काढण्याच्या दृष्टीने समाधानकारक चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. 
वणी मुकुटबन मार्गावरील शिरगिरी शिवारात १८ नंबर रेल्वे पुलाजवळ इंदिरा सूतगिरणी तत्कालीन आमदारांच्या कार्यकाळात मोठ्या थाटात उभी करण्यात आली. २४ एप्रिल १९९१ ला इंदिरा सूत गिरणीची नोंदणी झाली, व ८ व्या पंचवार्षिक योजनेनुसार राज्य शासनाने सूत गिरणी उभारणीला मंजुरी दिली. परंतु कित्येक वर्षे झाली तरी या सूतगिरणीचे काम पूर्णत्वास आले नाही. ही सूतगिरणी आजही राम भरोसे आहे. या सूतगिरणीचे काम पूर्ण करण्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आता या सूतगिरणीचे अध्यक्ष पद सुनिल कातकडे यांच्याकडे आहे. वणी तालुक्यात कापसाचे भरगोस उत्पन्न होते. ही सूतगिरणी तयार झाल्यास त्याचा कास्तकारांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच तालुक्यातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता ही सूतगिरणी बेरोजगार युवकांकरिता वरदान ठरू शकते. याकरिता सुनिल कातकडे यांनी ही सूतगिरणी पूर्णत्वास आणण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्याकरिता २३२.६६ लाख सभासद भाग भांडवल गोळा करण्यात आले आहे. या गिरणीला आज पर्यंत ११९३.८५ लाख शासकीय भाग भांडवल प्राप्त झाले आहे. आता प्रकल्प सुरु करण्याकरिता २५ कोटी रुपये अपेक्षित आहे. शासकीय भाग भांडवल मिळविण्याकरिता ५ टक्के भाग भांडवल, सभासदाचा सहभाग व ५० टक्के दीर्घ मुदती कर्ज, त्यानंतर ४५ टक्के शासनाचे भाग भांडवल असणे गरजेचे आहे. प्रथम संस्थेला २.३२ लाख सभासद भांडवल गोळा करणे जरुरी आहे, नंतर आणखी तेवढेच भांडवल जमा करण्याचे अध्यक्षांसमोर आव्हान आहे. भाग भांडवल जमा झाल्याशिवाय शासनाकडून उर्वरित निधी मिळणे शक्य नाही. सध्याची परिस्थिती भाग भांडवल मिळविण्याकरिता पूरक नसून गिरणी प्रकल्प पूर्णत्वास येणे शक्य नसल्याने यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांच्याकडे दीर्घ मुदतीचे कर्ज मिळण्याकरिता सुनिल कातकडे यांनी अर्ज केला आहे. माजी आमदार वामनराव कासावार हे या सूतगिरणीचे डायरेक्टर असल्याने व वस्त्रोउद्योग मंत्री पद काँग्रेसकडेच असल्याने सूतगिरणीच्या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा सुनिल कातकडे यांची आहे. गिरणी प्रकल्प किमतीच्या ४५ टक्के रक्कम ४०.९३ लाख रुपये शासकीय भाग भांडवल म्हणून प्राप्त होणे अपेक्षित असून त्या पोटी मिळालेले ११९३.८५ लाख रुपये वगळता २८.९९१५ लाख शासनाकडून भाग भांडवल मिळाल्यास सूतगिरणी उत्पादनाखाली येऊ शकते. सूतगिरणी प्रकल्प पूर्णत्वास आणण्याकरिता लागणाऱ्या निधीचा तपशील पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या समोर निवेदनातून सादर करून हा प्रकल्प पूर्ण कारण्याकरिता शासकीय भांडवल उपलब्ध करून देण्याची मागणी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनिल कातकडे यांनी केली आहे.