कोतवाल संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी नुकतीच जाहीर केली. २२ जून रोजी यवतमाळ येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. 
यावेळी या नेमणूका करतांना विभागीय समतोल साधत नेमणुका करण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष शशिकांत निमसटकर यांनी यवतमाळ येथील मंगेश ढकळे यांची कार्याध्यक्ष म्हणून महागाव येथील सुदर्शन गोस्वामी यांची जिल्हा उपाध्यक्ष राळेगाव येथील उमेश चांदेकर सहसचिव, दारव्हा येथील प्रशांत प्रभाते कोषाध्यक्ष, केळापूर येथील राहुल काळे संघटक तर, पुसद येथील श्रीमती शारदा गायमुखे, अमरावती विभागाच्या विभागीय महिला संघटक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली .
महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून राळेगाव येथील छाया दरोडे आणि संगीता काळे तसेच रविना धुळध्वज यांची जिल्हा महिला संघटक म्हणून नेमणूक करण्यात आली.

ओबीसी आरक्षणाकरीता आ.प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राळेगाव, (ता.२६) : भाजपच्या वतीने आज दि.२६ जून २०२१ रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
जिल्हा परिषद पंचायत समिती महानगर पालिका नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण महा विकास आघाडी सरकारच्या ओबीसी द्वेषामुळे आणि नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने रद्द झाले आहे. यासंबंधात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सवलतही दिली आदेशही दिला होता ही मागणी विशेष मागासवर्गीय आयोग स्थापन करून एम्पिरिकल डाटा सादर करण्यात यावा. परंतु राज्य सरकारची ओबीसी बाबत असलेली अनास्था द्वेष यामुळे सदर आयुक्त स्थापन करून एम्पिरिकल डाटा कोर्टाने दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे ओबीसी बांधवाच्या न्याय हक्काचा राजकीय आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

राज्य सरकारमार्फत ओबीसी वर जाणून-बुजून झालेला हा अन्याय ओबीसींचे राजकीय नेतृत्व संपविण्याची हे षड्यंत्र असल्याने या अन्यायाविरुद्ध तसेच सदर आरक्षण पूर्ववत लागू करण्यासाठी महाराष्ट्र भाजपातर्फे राज्य सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन आज आयोजित करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने राळेगाव येथे माजी मंत्री तसेच आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या नेतृत्वात राळेगाव यवतमाळ रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले व राजकीय दृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी मध्यम वर्गीय ओबीसी बांधवांनी आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी सर्व घटकातील समाज बांधवांनी बहुसंख्येने या आंदोलनात सहभाग घेतला व सलग दोन तास रास्ता रोको करून आंदोलन यशस्वी केले.

या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष  चिंतरंजन दादा कोल्हे, जिल्हा महामंत्री ऍड प्रफुलसिंह चौहान, सभापती प्रशांत तायडे, जी.प सदस्या सौ. प्रीतिताई काकडे, सौ.छायाताई पिंपरे, सौ. संतोषिताई वर्मा, सौ.विद्याताई लाड, गजानन लढी, संजय काकडे, अरुण शिवणकर, विनोद मांडवकर, बाळासाहेब दीघडे, संदीप तेलंगे, विशाल पंढरपुरे, सागर वर्मा, विनायक महाजन, आशिष इंगोले, किशोर गारघाटे, शारदानंद, विशाल येनोरकर, जैसवाल, शुभम मुके उपस्थित होते.

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याकरिता भाजपचे चक्काजाम आंदोलन

सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२६) : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज संविधान चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाजाचे आरक्षण परत घेऊनच राहू अशी ठाम भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपच्या नेते मंडळींनी घेतली. यावेळी भाजपच्या नेते मंडळी व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हिरावल्या गेल्याचे भाजपचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षणाचा मुद्दा लावून धरण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही भाजपने केला आहे. भाजपने ओबीसींसाठी वेगळं खातं तयार केलं. मग या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत, असा प्रश्नही यावेळी भाजप नेत्यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोग स्थापन करून ओबीसींचा इम्पेरिकल डाटा सादर करण्यास सांगितले. पण महाविकास आघाडी सरकारने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षणच रद्द केले आहे. ओबीसींना जोपर्यन्त पूर्ववत राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही दिली. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी रुग्णवाहिका व मालवाहू वाहने जाता यावी व वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता सामंजस्यातून एकेरी वाहतूक सुरु केली. 
आंदोलनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, व आवारी, शुभम इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा तालुका काँग्रेस कमिटीकडून निषेध; तहसिल प्रशासनाला दिले निवेदन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी चे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या सर्व प्रकाराला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून केंद्र सरकारने जाणीव पूर्वक ओबीसी चे आरक्षण रद्द केले असा, आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. 
यावेळी बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जि.प.सदस्या अरुणाताई खंडाळकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मारोती गौरकर, जि. प. सदस्य अनील देरकर, पं. समिती सभापती शितल पोटे, शेख युसूफ शेख नबी, शशिकांत आंबटकर, विनोद आत्राम, यादवराव काळे, यादवराव पांडे, रविंद्र पोटे, रविंद्र धानोरकर, आकाश बदकी, शंकर मडावी, दुष्यंत जयस्वाल आदी उपस्थित होते.

खेती बचाओ, लोकतंत्र बचाओ" देशव्यापी आंदोलनंतर्गत वणी येथे किसान सभेचे आंदोलन

सह्याद्री न्यूज |जयंत कोयरे 
वणी, (ता.२६) : दिल्ली येथील कृषी कायदे रद्द व्हावीत यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ७ महिने पूर्ण होण्याच्या अनुषंगाने देशात संविधानिक तरतुदी च्या विरोधात घेण्यात येत असलेल्या धोरणामुळे व केल्या जाणाऱ्या कायद्यामुळे या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालून संविधानाचे रक्षण करावे यासाठी देशव्यापी आंदोलन २६ जून रोजी करण्यात येत आहे, त्याच आंदोलनांर्गत वणी येथेही किसान सभा व माकपचे वतीने एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले.

देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे व भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे करून मोदींच्या भाजप सरकारने भारतीय जनतेला धोक्यात मारण्याचे षडयंत्र चालविले आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी व युवकांच्या विरोधात धोरणे घेत संविधानिक तरतुदी चे विरोधात हुकूमशाही पद्धतीने राजकारभार सुरू आहे. भारत देशाच्या इतिहासात आणीबाणी पुन्हा एकदा लागून राजकारभार सुरू असल्याचे वातावरण आहे. ह्या सर्व प्रकारामुळे या देशात शेतकरी, कामगार, युवक व विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. ह्याच अनुषंगाने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या ७ महिन्यापासून सातत्याने आंदोलन करीत असताना त्यांच्या सोबत कामगार, युवक व विद्यार्थी सहकार्य करीत आंदोलन करीत आहेत. आजच्या आंदोलनात सुद्धा संपुर्ण देशभरात विद्यार्थी, युवक, महिला उतरल्या आहेत.

या आंदोलनाद्वारे मा. राष्ट्रपती यांना निवेदन स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले आहे. वणी येथेही माननीय महोदय राष्ट्रपती यांना मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. 

या आंदोलनात खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, रामभाऊ जिड्डेवार, नंदू बोबडे, मनोज काळे, आनंदराव पानघाटे, भास्कर भगत, दशरथ येनगंटीवार, तुकाराम भगत, ऋषी कुळमेथे, वैभव मजगवळी, गंगाराम मेश्राम आदींनी सहभाग घेतला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने स्त्री पुरुष व युवकांनी सहभाग घेतला.