वणी-यवतमाळ मार्गावर रास्तारोखो, अर्धा तास मार्ग ठप्प

सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (ता.२६) : स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुकीतील ओबीसीचे रद्द केलेले आरक्षण पूर्वरत करा या मागणी साठी तालुका भाजपाचे वतीने मारेगाव येथे रास्ता रोखो आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

स्थानिक स्वराज्य सस्था निवडणुका मधील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले. त्यामुळे ओबीसी समाजात आपला हक्क हिरावला गेला ही भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपनामुळे ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित राहिला, असा आरोप भाजपाने केला असून आज राज्यव्यापी आंदोलन केले.

तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांचे नेतृत्वात येथील मार्डी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी वणी-यवतमाळ या जिल्हा मार्ग अर्धा तास रास्तो रोखो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एक तास वाहणे रोडच्या दोन्ही बाजुला अडकून पडली होती. त्या नंतर तहसील व पोलिस प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आंदोलनात तालुका भाजपा अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, अनुप महाकुलकर, विलास चिंचूलकर, प्रशांत नांदे, आनंद पचारे, गणेश झाडे, पवन ढवस, सुभाष खडसे, मारोती राजुरकर, मंगेश देशपांडे, सुनिता लालसरे, सविता दरेकर, शोभा नक्षने, सुनिता पांढरे, शालिनी दारुंडे आदीची उपस्थिती होते.
   

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२६) : आरक्षणाचे जनक व थोर समाज सुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वणी एमआयडीसी परिसरातील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी समस्त शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम शाहू महाराजांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकवृंदांनी त्यांना अभिवादन करून त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांची शिक्षणासाठीची तळमळ व त्यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी घेतलेला पुढाकार तसेच शिक्षण क्षेत्रात सर्वप्रथम लागू केले आरक्षण ही त्यांनी केलेली सामाजिक उत्थानासाठीची क्रांती असल्याचे विचार यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे होत्या. कार्यक्रमाचे संचालन अनिता टोंगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिल गेडाम यांनी केले.

महागांव पोलिसांची गुटखाविरोधी कारवाई २९ हजार ३०६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागांव, (ता. २६) : महागांव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महागांव शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करुन लगतच्या खेडेगावात विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. मंगळवारी (ता. २२) रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सहायक पोलिस निरीक्षक प्रताप भोस व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील संशयित आरोपी आकाश विठ्ठल बेलखेडे वय २४ वर्षे रा.महागांव यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता
एका प्लॅस्टीक बॅगेमध्ये क्रेज तंबाखु जर्दाचे १२० पॉकेट किंमत अंदाजे १८० रूपये प्रमाणे २१ हजार ६०० रुपये, विमल १२ पॉकेट किंमत १९८ रूपये
प्रमाणे २ हजार ३७६ रूपये, व्ही - १ तंबाखु ५४ पॉकेट किंमत ३० रूपये प्रमाणे १ हजार ६२० रूपये, एन ०५ प्रिमीयम जाफरानी तंबाखु २३ पॉकेट किंमत ७० रूपये प्रमाणे १ हजार ६१० रुपये, एस आर - १ तंबाखु ३५ पॉकेट किंमत ६० रूपये प्रमाणे २ हजार १०० रूपये असा एकुण २९ हजार ३०६ रूपयांचा किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी तो गुटखा जप्त करुन (ता. २३) रोजी अन्न व औषध विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पंचनामा होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील महागांव व फुलसावंगी ही व्यापारी केंद्र प्रामुख्याने गुटखा व्यवसायासाठी प्रसिद्धी आहेत. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात आर्णी येथून गुटख्याचा गड राखला जातो हे सर्वश्रुत आहे. आर्णी येथील काही प्रतिष्ठित मंडळींनी गुटखा व्यवसाय मजबूत केल्याने या बेकायदेशीर व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. शासनाने प्रतिबंधित केलेले व शरीरास अपायकारक असलेला गुटखा व पानमसाला साठवणूक केलेला गुटखा महागांव शहरात मिळून आल्यामुळे गुटख्याचे मालक महागांव येथील संशयित आरोपी आकाश विठ्ठल बेलखेडे यांच्याविरुद्ध (ता. २३) रोजी अन्न व सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यवतमाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, चालक प्रविण इंगोले, रायटर नारायन पवार, जमादार विनोद जाधव, पोलिस अमंलदार संतोष जाधव करीत आहे. पोलिसाच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व्यवसायिकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून व्हाईट कॉलर गुटखा व्यवसायिकांनी चार दिवस मैदान सोडून जाण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्याच्या केंद्रस्थानी महागांव येथील गुटखा माफियांच्या सराईत टोळीमधील केवळ एक बडा मासा हाताला लागला आहे. या चौकडीतील इतर पार्टनर अजून तरी मोकळेच आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे योगसंस्कार शिबीर संपन्न

                        (संग्रहित फोटो) 

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 
वणी, (ता.२६) : शिक्षण प्रसारक मंडक विध्याळ्यातर्फे दि.१५ जून ते २१ जून २०२१ ह्या कालावधीत सर्व विद्यार्थ्यांसाठी योग्य संस्कार शिबिराचे आयोजन आभासी स्वरूपात करण्यात आले होते. आभासी स्वरूपातील या योह शिबिराच्या माध्यमातून योगासने सूक्ष्म संधी व्यायामप्रकार आणि सूर्य नमस्काराची माहिती व समंत्र सराव घेण्यात आला.

संस्काराच्या दृष्टीने बीजारोपण म्हणून विद्यार्थ्यांपुढे एका सुभाषितांचे वाचन व त्याचा अर्थ सांगणे,प्रार्थना पठण व तिची आवश्यकता समजावणे आणि रोज एक बोधकथा असे स्वरूप ठरवून त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच दंडस्थिती बैठक स्थिती शयनस्थिती व विपरीत शयनस्थिती करण्यात येणारी आसने,वर्णन,कृती,व फायदयांसह समजावून सांगण्यात आली.

विद्यालयातील श्री.मडावी व गारघाटे सर, सौ.कचवे, नवघरे व मेश्राम या शिक्षकांनी संस्कारक्षम बोधकथा सांगितल्या. शिबिराचे सूत्रसंचालन शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री.किरण बुजोने ह्यांनी केले.

श्री.प्रमोदजी क्षीरसागर मुख्याध्यापक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय ह्यांनी उद्घाटनपर व समारोपीय उदबोधन करून शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाचे व पालकांचे आभार मानले. सदर उपक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्माच्यारी सहकार्य लाभले आंतरराष्ट्रीय योगदिनी योगासनाच्या सरावनंतर शिबिराची सांगता करण्यात आली..

लाखापूर ते आकापूर रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहेत तरी कुठे?


सह्याद्री न्यूज | विवेक आवारी
मारेगाव, (ता.२६) : तालुक्यातील लाखापूर ते आकापूर या गावाचा रस्ता बहुतांश उखडून गेल्याचे चित्र आहे. तर ठिकठिकाणी खड्डे ही पडलेत. 'एक ना धड भाराभर चिंद्या' अशी अवस्था आहे.

लाखापूर ते आकापूर या रस्त्याकडे संबधीतांचे अजिबात लक्ष नसून दुर्लक्षित असल्याचे लोकं सांगतात. या मार्गाने प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करणे हेच सध्याचे चित्र पहावयास मिळते आहे. हा 
जवळपास तीन ते चार किमी अंतरा च्या ही पलीकडे या रस्त्याची गिट्टी उखडून कुठे कुठे खड्डे पडले आहे. या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या च्या कमरेत,मानेच्या मणक्यात दुखणे वाढवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची साधी डागडुग्गी सुद्धा केली नसल्याचे बोलल्या जात आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे?, असा प्रश्न या उखडलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून साहजिक च उपस्थित होतो.

वेळेची बचत, आरोग्याच्या दृष्टीने, शालेय विद्यार्थी, तालुक्यातील शासकीय कामं अशा विविध सोयीकरिता मार्ग सुखकर व्हावा या उद्देशाने ग्रामीण रस्ते शहराला जोडले तर गेलेत, मात्र या रस्त्यांची पूर्ण वाट लागली असून या मार्गाने चारचाकी वाहन घेऊन जाणे येणे कठीण काम झाले आहे. सदर रस्ता निदान दगडूग्गी तरी करून द्यावा अशी मागणी आहे.