गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणाली नुसार आदर्श विवाह सोहळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वैदिक संस्कृती शिवाय बहारदार लग्न सोहळा नाही. "आज दि. 22 मे रोजी गौरकार आणि खापणे परिवाराचा बहारदार सोहळा धनोजे कुणबी मंगल कार्यालय वरोरा येथे संपन्न झाला आणि या लग्न सोहळ्याचे आपण साक्षीदार ठरले. आज दोन हृदये एका धाग्याने बांधली गेली आहेत. हे बंधन फक्त दोन व्यक्तीचे नाही, तर दोन कुटुंबांचे, दोन संस्कृतीचे आहे.वैदिक विधींच्या साक्षीने, हे बंधन काळाच्या कसोटीवर उतरेल, अशी खात्री आहे."

जीवनातल्या प्रत्येक टप्प्याला एक नवा सूर्योदय असतो. आणि आज, या नव्या सूर्योदयाला साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण चि सौ का तृष्णा मारोती गौरकार आणि ग्रामगीताचार्य अडव्होकेट चि अतुल संभाजी खापणे यांच्या विवाह समारंभा प्रसंगी उपस्थित झाले. प्रेम आणि आशिर्वादांच्या या सागरात, दोन मनांचे संगम आज होताना आपण पाहत आहे. वैदिक संस्कृतीच्या पावित्र्यात, एक नवा अध्याय या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू होत आहे."आणि या नव्या अध्यायाला आपल्या शुभेच्छा आणि उपस्थिती आणि आशीर्वाद या ठिकाणी लाभले जात आहे, म्हणून मारोती गौरकार आणि संभाजी खापणे परिवाराच्या वतीने प्रत्येक पाहुण्यांचा मान्यवरांचा आप्तेष्टांचा नातेवाईक इष्टमित्र सगेसोयरे या सर्वांच सहर्ष मनःपूर्वक स्वागत चि सौ का तृष्णा व चि अतुल यांचा आदर्श विवाह सोहळा गुरूदेव सेवा मंडळाच्या वैदिक पद्धतीने धार्मिक वातावरणात समधुर संगीत साई प्रकाश म्युझिकल ग्रुप प्रकाश पिंपळकर व संच यांच्या सुगम संगीतात पार पडला. 

या सोहळ्याला माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र, मा. श्री वामनरावजी कासावार माजी आमदार वणी, विधानसभा क्षेत्र माननीय श्री संजीव रेड्डी बोदकुरवार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र, सौ किरण ताई देरकर अध्यक्ष महिला बँक वणी मा. श्री नरेंद्र ठाकरे अध्यक्ष शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, सौ अरुणाताई खंडाळकर माजी सभापती महिला व बालकल्याण जि प यवतमाळ, मा. श्री आशिष भाऊ खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी, मा. श्री देविदास जी काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्था वणी, मा. श्री गौरीशंकर खुराना सभापती कृषी उत्पन्न बाजार मारेगाव, मा. श्री भास्करराव ढवस माजी सदस्य जि प यवतमाळ, मा. श्री मुकेश जी जीवतोडे शिवसेना नेते वरोरा, मा. श्री संजय भाऊ खाडे वसंत जीनिग संचालक वणी,मा. श्री राजाभाऊ कासावार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी,टिकाराम कोंगरे माजी अध्यक्ष य.जि.म. बँक यवतमाळ,अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ संध्याताई बोबडे, शहराध्य महिला काँग्रेस कमिटी वणी, शामाताई तोटावार गुरुकुंज आश्रम मोझरी येथून सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे सर, प्रचारक रुपलालजी कावळे सर,ईश्वर पाटील घानोडे दादा, श्री गुणवंत दादा कुत्तरमारे, श्री विशालजी गावंडे सर, श्री गजानन दादा डंभारे व गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत पाहुणे उपस्थित होते.

विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता तथा तालुका काँग्रेस कमिटी चे मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती माधवराव गौरकार हे गुरुदेव प्रेमी असल्यामुळे त्यांनी महाराजांच्या विचारावर प्रेरित होऊन त्यांनी आपल्या थोरल्या मुलीच्या लग्न प्रसंगी वैदिक विधींची संकल्पना राबविली.तसेच जावई सुद्धा ग्रामगितचार्य असल्याने हा सोहळा शक्य झाले.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विवाह संस्कार या अध्याया मध्ये विवाहाची व्याख्या खूप सुंदर करतात ईश्वराच्या इच्छेचे पूरक समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती,चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा,स्त्रीपुरुष ही दोन चाके । जरि परस्पर सहायकें । तरीच संसाररथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श| 

या विवाह सोहळ्यानंतर आर्या कुत्तरमारे हिने राष्ट्रवंदना घेतली. या विवाह सोहळ्यानंतर आर्या कुत्तरमारे हिने राष्ट्रवंदना घेतली विवाह सोहळ्यात येणाऱ्या उपस्थित प्रत्येक पाहुण्यांचे आदरतिथ्य ग्रामगीता व संविधान देऊन या परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ वणीत तिरंगा रॅली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरांमध्ये दि. 22 मे रोजी "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. हातामध्ये तिरंगा झेंडा घेत घोषणा देत वणीकर नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

पहेलगाम येथे भारतीय पर्यटकांवर धर्म विचारत हल्ला करत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. महिलांच्या समोर त्यांच्या पतींना निर्दयीपणाने गोळ्या मारण्यात आल्या होत्या. याचा बदला घेण्यासाठी भारत सरकार व भारतीय सैन्य दलाच्या वतीने मिशन सिंदूर हे अभियान राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. भारताने घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे पाकिस्तानला अखेर नमते घेऊन माफीनामा द्यावा लागला. भारतीय सैनिकांनी केलेल्या या शौर्याबद्दल व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र मिशन सिंदूर अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली जात आहे. वणी शहरात देखील माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकारातून काल गुरुवारी रोजी सायंकाळी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात हजारो नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. महिलांची संख्या उल्लेखनीय होती.
याप्रसंगी कॅप्टन महादेव गाताडे, किरण बुजोने, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ऑपरेशन सिन्दुर मधील वीर सैनिकांच्या शौर्याचा व पराक्रमाची माहिती उपस्थितांना देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण देश ठामपणे उभा असल्याचा उद्घोष केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला. त्या ठिकाणी काही माजी सैनिक व वीरपत्नी यांचा देखील शाब्दिक सन्मान करण्यात आला.

लोकनेते संजय खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

अ|भि|ष्ट|चिं|त|न | वा|ढ|दि|व|स

काँग्रेसचे दिलदार नेते, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नशील असणारे, सामाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या मनमिळाऊ स्वभाने छाप पडणारे संचालक - महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. मुंबई, संस्थापक अध्यक्ष जय जगन्नाथ मल्टी स्टेट केडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. वणी, जनरल सेक्रेटरी- यवतमाळ जिल्हा कॉग्रेस कमिटी, तथा समाजकारिणी, कामगार लोकनेते, तरुणांईच्या गळ्यातील ताईत, आदरणीय संजय भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!
आज आपला वाढदिवस, या वाढणाऱ्या प्रत्येक दिवसगणिक आपलं यश, आपलं ज्ञान, आपली कीर्ती अशीच वाढत जाओ...हिच सदिच्छा...
भाऊसाहेब आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..💐🙏🙏


शुभेच्छुक:-
संजय_खाडे मित्र परिवार, वणी विधानसभा क्षेत्र

विद्युत स्पर्शाने बार कामगार ठार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आज गुरुवारी दुपारी येथील राज्य महामार्गावरील एका बिअर बार मध्ये असलेल्या कामगाराला जिवंत विद्युत स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
गणेश गणपत मेश्राम (28) रा. पेंढरी असं विद्युत स्पर्श झालेल्या मृतकाचे नाव आहे.या दुःखद घटनेने मेश्राम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. 

गेल्या अनेक दिवसापासून मारेगाव करणवाडी रस्त्यालगत असलेल्या एका बिअरबार मध्ये गणेश हा कामगार म्हणून कार्यरत होता.
आज गुरुवार ला दुपारी बारा वाजताचे सुमारास बार समोर असलेल्या संरक्षण जाळीला विद्युत स्पर्श होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात हलविले मात्र,डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका होतकरू युवकाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

गणेश याच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व तीन महिन्याची मुलगी आहे.

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शेतीचा हंगाम तोंडावर आणि त्या शेतकऱ्याने कडू निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज गुरुवारी मारेगाव तालुक्यात दुपारी घडली.
प्रभाकर आत्माराम निखाडे (68) रा. चोपण असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक यांचे 5.5 एकर शेती आहे. त्यावर ते आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकलाचे. मात्र,सतत उत्पन्न घटत असल्यामुळे कर्जाचे डोंगर वाढले, या विवंचनेत त्याने आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे. 
त्यांनी दोन दिवसापूर्वी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असं समजते. त्याच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त लिहेपर्यंत पंचनाम्याची कारवाई व्हायची होती.