वेकोलिच्या सकारात्मक प्रतिसादानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : उकणी येथील प्रकल्पग्रस्त भूसंपादनाच्या प्रश्नावर 9 जून रोजी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याने सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे शेतकरी संघर्ष समितीद्वारा जाहीर करण्यात आली. गेल्या आठवड्यात खा. प्रतिभा धानोरकर यांच्याशी वरोरा येथे तर शनिवारी ताडाळी येथे वेकोलिच्या वरिष्ठ अधिका-यांशी बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 

उकनी या क्षेत्रातील 85 टक्के जमीन वेकोलीने संपादित केली. परंतु 15 टक्के जमीन जी 600 एकर आहे. या भूमीवर 175 शेतकरी उदरनिर्वाह करतात. ही जमीन वेकोलीने संपादित न केल्याने या शेतकऱ्यांना ही जमीन सोडावी लागेल. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबत शेतक-यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर वेकोलि विरोधात 9 जून रोजी जलसमाधी आंदोलनाची घोषणा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. 

बुधवारी दिनांक 4 जून रोजी शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने खा. प्रतिभाताई धानोरकर यांची वरोरा येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. खा. धानोरकर यांनी वेकोलि अधिका-यांना याबाबत सूचना केल्या होता. त्यानंतर शनिवारी चंद्रपूर ताडाळी येथे वेकोलि मुख्यालयात प्रकल्पग्रस्तांनी भेट घेतली. यावेळी अधिका-यांनी जमिनीचे सर्वेक्षण झाले असून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याची माहिती दिली. सकारात्मक चर्चेअंती उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या चर्चेला वेकोलिचे महाप्रबंधक संचालन सुजीत कुमार पीशारोड़ी, क्षेत्रीय योजना अधिकारी प्रदीप राघोटे, क्षेत्रीय योजना अधिकारी, क्षेत्रीय स. महाप्रबंधल समीर बारला, क्षे. सर्वे प्रबंधक आर बी सिंह, वरीष्ठ प्रबंधक एल एस थोरात ,वे.को.ली. सुरक्षा समिति सदस्य मा.श्री.संजय खाड़े तसेच शेतकरी संघर्ष समितीच अध्यक्ष श्री.सुरेश विट्ठलराव ढपकस, कार्याध्यक्ष श्री.अमोल विठ्ठलराव पुरडकर, उपाध्यक्ष श्री. पराग मनोहर तुराणकर, सचिव श्री. सचिन जुनारकर , सहसचिव श्री.सचिन परशुराम लोड़े,कोषाध्यक्ष श्री. मनोज घनश्याम खाडे, सदस्य श्री. चंद्रकांत बापुजी जिवतोडे,सदस्य श्री.प‌द्माकर बाबाराव झाडे,सदस्य श्री. महेश मोतिराम पाटिल, सदस्य श्री. विकास रमेश लालसरे,सदस्य श्री. संतोष मारोती धांडे,सदस्य श्री. किसन सिताराम पारशिवे,कायदेशीर सल्लागार श्री. अॅड. सुरज महातळे, मिडीया प्रमुख श्री. संजय बाळकृष्ण बांदुरकर, दीपा संतोष टिंगे,उषा राहू ठाकरे,सचिन शिरसागर,दीपा संतोष टिंगे, उषा राहू ठाकरे इत्यादींची उपस्थिती होती.

600 एकर जमिनी तत्काळ संपादित करून त्याचा मोबदला व आश्रितांना नोकरी देण्यात यावी. उकणी गावाचे पुनर्वसन तत्काळ पूर्ण करण्यात यावे, 2025 चे सी एस आर रेटनुसार मूल्यांकन करून त्यानुसार मोबदला द्यावा. इत्यादी मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. .

राजूर येथे एक दिवसीय इंग्रजी क्लास संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : येथील सामाजिक संघटन राजूर विकास संघर्ष समिती गेल्या दहा वर्षापासून कार्यरत असून 'जनतेचे हक्क व गावाचा विकास ' हे ब्रिद वाक्य घेऊन कार्य करते आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांचे विविध विषयांवर प्रबोधन झाले पाहिजे आणि विवेकवादी बनून देशाचा योग्य नागरिक बनून त्याने आपले कर्तव्य बजावावे हा उद्देश ठेवून दर आठवड्याला विविध विषयावर प्रबोधन कार्यशाळा घेऊन वाटचाल सुरू आहे. ह्याचाच एक भाग म्हणून या आठवड्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी इंग्रजी बद्दलची विद्यार्थ्यांचा मनातील भीती नष्ट करून इंग्रजी सोप्या पद्धतीने कशी शिकता येईल ह्याचे क्लास ह्या प्रबोधन कार्यशाळेचा माध्यमातून घेण्यात आले. 

राजूर विकास संघर्ष समितीच्या ह्या प्रबोधन कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक येथील राजेंद्र पुडके सर हे होते, तर ह्या कार्यशाळेचे अध्यक्ष विजय तोताडे आणि उद्घाटक म्हणून अशोक भगत सर उपस्थित होते. 

इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळखल्या जाते. आपल्या देशात सुद्धा अनेक भाषा बोलल्या जात असल्याने तसेच भाषिक प्रांत असल्याने शासकीय भाषा म्हणून इंग्रजीचाचं वापर केल्या जाते. आंतरराष्ट्रीय असो की आंतरराज्य मग ती नोकरी असो की व्यापार तिथे इंग्रजीशिवाय पर्याय नसतो अश्या वेळेस इंग्रजी बोलायला, लिहायला आल्या शिवाय गत्यंतर उरत नाही. ह्याच परिस्थिती मुळे आता बालवाडी पासूनच इंग्रजी शिकवायला सुरुवात झाली आहे. परंतु जे मराठी माध्यमातून शिकले आहेत, त्यांना मात्र इंग्रजी नेहमीच कठीण विषय राहिला आहे. त्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर आपल्या शाळांमधून केला जातो त्यामुळे मुलांना इंग्रजीचा धाक जास्तच असतो. आणि म्हणून इंग्रजी भाषा बोलणे आणि लिहिणे यामध्ये अँक्टीव व पॅसिव्ह ह्या दोन्ही प्रकारच्या पद्धतीच्या वापर करायचा असतो. पण शाळांमध्ये फक्त ऍक्टिव व्हॉईस हाच प्रकार शिकवला जात असल्याने चालत असताना एकाच पायाचा उपयोग होत असल्याने भाषा सुद्धा लंगडी होते. त्यामुळे इंग्रजी शिकताना कठीण वाटते आणि त्याची भीती सुद्धा वाटते. या करीताच राजूर विकास संघर्ष समितीने इंग्रजी विषयावर येथील इंग्रजीचे अभ्यासक राजेंद्र पुडके सर यांची कार्यशाळा घेऊन इंग्रजी विषयाची गोडी निर्माण करण्याचा दृष्टिकोनातून क्लास घेण्यात आला.

या कार्यशाळेला अशोक भगत सर, वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, संचालन महेश लिपटे सर, तर आभार राहुल कुंभारे यांनी मानले. या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी सुनील सातपुते, विनायक येसंबरे, अक्षांत मोहरमपुरी यांनी अथक परिश्रम घेतले.

वणीत थेट खादी कॉटन महोत्सव सेल....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तंत्रज्ञानाच्या जगात ऑनलाईन खरेदीची डोखेदुखी ही आता मोठी समस्या बनत चालल्याने सतीश पाटील यांनी स्वदेशी खादी कॉटन महोत्सव सेल मध्ये एक नवनवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी एकाच छताखालीभरपूर व्हेरायटी ऑफलाईन सुविधा सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त 250 पासून ते 1400 रुपये पर्यंतचे मनपसंत खादी कॉटन कापडं खरेदी करू शकतात. ही सुविधा विशेषतः अवघ्या काही दिवसासाठी आहे. या महोत्सव सेल ला आजतागायत मिळालेला उत्तम प्रतिसाद,यापुढेही मिळावा व भारतीय उद्योगाला भरभरून चालना मिळावी यासाठी ग्राहकांनी आणखी या सेल ला अवश्य भेट देऊन खादी कॉटन व्यवसायाला हातभार लावावा, असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे. 

खादी कॉटन महोत्सव सेल हे एक थेट खरेदी चे ऑफलाईन प्लॅटफॉर्म आहे.जे वैयक्तिक,संपूर्ण कुटुंब, व इष्टमित्रा सह खरेदी देखील करता येते. हा महोत्सव सेल वणी मारेगाव झरी येथील अनेक लोकांसाठी एक सोपा आणि उत्तम पर्याय असू शकते. 
खादी कॉटन महोत्सव सेलची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत:

आलिशान ट्रॅकमधून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर शिरपूर पोलिसांची कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यात अवैध रेतीची चोरी ट्रॅक्टर, टिप्पर अशा वाहनाने होतेय, हे काही नवीन नाही. अशा वाहणावर अनेकदा कार्यवाही झालेली वाचण्यात आल्या आहेत. मात्र, आलिशान लांब पल्ल्याचा ट्रक मधून चक्क अवैध रेती वाहतूक करताना शिरपूर पोलिसांनी चारगाव ते पुनवट रोडवर ताडपत्री झकलेले दोन ट्रक जप्त करून हे दोन्ही आलिशान ट्रक शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहे. पुढील कारवाईबाबत पत्र वणी तहसील कार्यालयात देण्यात आले.

शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे हे शुक्रवारी 6 जुन रोजी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, चारगांव ते पुनवट रोडवर आलिशान ट्रक मधून अवैध्यरित्या रेती वाहतुक होत आहे. अशी माहिती मिळताच ठाणेदार शिंदे यांनी क्षणाचा विलंब न करता तत्काळ आपल्या पोलिस ताफ्या सह शेलु (बु) येथे नाकाबंदी केली. काही वेळातच चारगांव ते पुनवट रोडने दोन ट्रक येताना दिसताच येणा-या संशयित तपकिरी रंगाच्या अशोक लेलॅन्ड कंपनीचे दोन्ही वाहन थांबवुन सदर दोन्ही ट्रकची तपासणी केली. तेव्हा त्यांना सदर ट्रकमध्ये लाल रंगाची रेती दिसली, सदर रेती बाबत परवाना बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर दोन्ही ट्रकमध्ये अवैद्यरित्या लाल रेती वाहतुक करीत आहेत, अशी खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन नमुद वाहनातील इसमांना त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सैय्यद शहाबुद्दीन सैय्यद अफसर (वय 33 वर्ष) रा. पुसद (खादी वॉर्ड) जि. यवतमाळ व शेख हसन इमाम शेख उवेदुर रझाक (वय 51 वर्ष) जि. यवतमाळ असे त्यांनी सांगितले व सदर अवैध्य रेती ही ट्रक मालक  उमर फारुख (चय अं.45 वर्षे) रा. पुसद, यवतमाळ यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगितल्याने वरील इसमांविरुध्द दोन्ही ट्रक क्रमांक (MH 29, BE-6296 व MH -29, BE- 6296) अंदाजे किंमत 50 लाख व त्यामध्ये एकुण 24 ब्रास रेती 1 लाख 92 हजार रुपये ची लाल रंगाची रेती असा एकुण 51 लाख 92 हजार रुपये चा मुद्देमाल सहीत दोन्ही ट्रक ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी शिरपूर पोस्टे च्या आवारात जमा करण्यात आले असून दोन्ही ट्रक वाहनचालकांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अवैध्यरित्या रेती बाबत पुढील कारवाईसाठी अहवाल तहसिल कार्यालय वणी येथे पाठविण्यात येणार आहे.

सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे, पोलीस निरीक्षक सतीश चवरे सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवंत, प्रशांत झोड, पंकज कुळमेथे यांनी पार पाडली.

मारेगाव: नैसर्गिक आपत्ती २०२५ च्या अनुषंगाने "मॉक ड्रिल" संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : हवामान बदल, पुराच्या वेळी बचाव कार्य कसे करायचे, सुरक्षित ठिकाणी कसे जायचे, इत्यादी प्रशिक्षण "मॉक ड्रिल" आयोजित करण्यात आले होते.या ड्रिलमध्ये सहभागी लोकांनी आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी सराव केला.

विकास मिना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार, नितीशकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आपत्ती २०२५ च्या अनुषंगाने नवरगांव (धरण) येथील प्रकल्पात वर्धा नदी पात्राचे लगत असलेल्या मारेगांव, वणी तालुक्यातील मौजा सावंगी, कोसारा, आपटी, शिवणी (धोबे) इत्यादी गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल आधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील, पट्टीचे पोहणारे व्यक्ती आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत माॅक ड्रील यशस्वीरित्या पार पडले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगांव, भिमराव व्हनखंडे गटविकास अधिकारी प.स. मारेगांव, गावंडे पोलीस उपनिरीक्षक, सतीश मुन्न आपत्ती व्यवस्थापक प्रमुख जिल्हा कार्यालय यवतमाळ आणि त्याचे चम्मू उपस्थित होते. उपस्थित चम्मूने तलावात बोट टाकून पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी/ठिकाणी हालवून त्यांचा कसा बचाव करायचा या बाबत सविस्तर माहिती देऊन बोट चालविण्याचे प्रशिक्षण दिले. तहसीलदार यांनीही प्रशिक्षण मोठ्या उत्साहाने प्रशिक्षण घेतले असल्याचे समजते.

तहसीलदार मारेगांव यांचे तालुक्यातील नागरिकांना आवाहन 

तालुक्यातील मागील दोन वर्षात आलेला अनुभव असा आहे की, पावसाळ्याच्या काळात नदी, नाल्यांना पुर येऊन, पुलावरुन, रस्त्यावरुन पाणी वाहत असताना काही वाहन धारक विचार न करता वाहने टाकतात त्यामुळे वाहन वाहुन जाऊन जिवितहानी होण्याची शक्यता असते, असे न करता पाणी उत्तरे पर्यंत वाहन पुलावरुन/रस्त्यावरुन घेऊन जाऊ नये असे, आवाहन केले आहे.