अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : साळ्याला पोहोचवून आपल्या गावी परत निघालेल्या दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहणाने समोरून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोणी ते जळका दरम्यान असलेल्या डाम टेकडीजवळ आज शुक्रवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.या घटनेने आवळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रदीप गुणवंत राऊत (अंदाजे वय 40) रा.आवळगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव आहेत.प्रदीप हा आज दिनांक 30 मे 2025 रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजता आवळगाव येथून साळ्याला सोडण्यासाठी खंडणी येथे गेला होता.तेथील काम आटोपून तो बोटोणी-करंजी मार्गे स्वगावी आवळगाव येथे जाण्याकरिता निघाला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात डांबरी रस्त्यावर पडून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्त्याने ये - जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्रदीप याला तपासून मृत घोषित केले. मृतक प्रदीप याच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

नाल्याची माती मिश्रित रेती न देता लाभार्थ्यांना वर्धा नदी घाटातील रेती द्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रॉस रेतीची योजना नाल्यावरून चालू केली असून त्या नाल्याच्या रेतीमध्ये संपूर्ण पणे माती मिश्रित रेती आहे. अशा आशयाचे निवेदन दि. 28 मे रोजी खनिज प्रतिष्ठान, यवतमाळ यांना देण्यात आले.  

यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, कार्याध्यक्ष तथा सरपंच रामचंद्र जवादे, उपसरपंच प्रशांत भंडारी आदींची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटलं आहे की, नाल्याच्या रेतीमध्ये संपूर्णपणे माती मिश्रित आहे. हे सॅम्पल आणले आहे ते बघा, रेती योग्य आहे की नाही? आपल्या स्तरावर याची चौकशी किंवा टेस्टींग करून ती रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावी की नाही? याबाबत योग्य निर्णय दयावा अशी संघटनेची मागणी आहे. पुढे असंही निवेदनात नमूद आहे की,वर्धा नदीचा घाट हा मारेगांव तालुक्याच्या गावावरून २० ते २५ किमी अंतरावर असून शासनाने दिलेल्या दापोरा नाल्याची रेती रू. ६०००/- ब्रॉस पडत असून ती नाल्याची रेती असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना समाधानकारक नाही. त्यामुळे वर्धा नदीची रेती याच भावामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी, अशी घरकुल लाभार्थी व सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी मागणी केली आहे.
मारेगांव तालुक्याच्या शेवट च्या टोकावरून वाहणारी वर्धा नदी असून नाल्याची रेती देत आहे व राळेगांव तालुक्यात वर्धा नदीची रेती शासन उपलब्ध करून देत आहे,हे दोनही तालुके यवतमाळ जिल्ह्यातच असून हा दुजाभाव कसा? असा सवाल केला असून वरिल सर्व बाबीची चौकशी करून मारेगांव तालुक्याला योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. मात्र, असे न झाल्यास वर्धा नदीची रेती मिळवण्यासाठी सरपंच संघटना व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही, असे अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सांगितले आहे.

वीज कोसळून शेतकऱ्याची म्हैस दगावली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील वेगाव (जुनी वस्ती) येथे दि. 28 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली.
अरुण नानाजी टोंगे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावाशेजारील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात म्हैस चरत होती. याचवेळी मेगर्जनेसह पाऊस सुरू झाला आणि अचानक वीज थेट चरत असलेल्या म्हशीवर पडली. ती जागीच मृत्यूमुखी पडली.
या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली आहे. शेतकरी टोंगे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची घोषणा करावी, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

175 शेतकरी कुटुंब येत्या 9 जूनला करणार जल समाधी आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कोळसा खाण बाधित उकणी गावाची पुनर्वसन प्रक्रिया शेवटच्या टप्यात असताना मात्र उकणी येथील 175 शेतकऱ्याची 600 एकर शेतजमीन घेण्यास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड टाळाटाळ करीत आहे. 

गावाचा पुनर्वसन झाल्यास सर्व नागरिकांना गाव सोडावं लागणार आहे. अशातच त्या जमिनीवर ते वहिवाट करु शकणार नाही. कोळसा मंत्रालयसह वेस्टर्न कोलफिल्डच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार व निवेदने देऊन ही वेकोलि उर्वरित शेतजमीन संपादित करण्यास तयार नसल्याने उकणी येथील 175 शेतकरी कुटुंब येत्या 9 जूनला जल समाधी आंदोलन करणार आहेत. याबाबत निळजई कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मंगळवार 27 मे रोजी येथिल वसंत जिनिंग च्या हॉल मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ता संजय खाडे यांनी सांगितले की, वेकोलि वणी एरिया अंतर्गत निलजई ओपनकास्ट माईन्स करिता उकणी परिसरातील तब्बल 4 हजार एकर आतापर्यंत संपादित केली. तर उकणी गावातील खंड 1 मधील 600 एकर जमीन शिल्लक राहिली आहे. कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओव्हर बर्डन मुळे उकणी गावाच्या चारही बाजूने मातीचे उंच ढिगारे लागले आहे. मातीच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन उकणी गावाचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित 600 एकर शेतजमीन वेकोलिने संपादित करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ग्राम पंचायत उकणी व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत उर्वरित शेतजमीन संपादित करण्यासाठी वेकोलि प्रशासन, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी खासदार हंसराज अहिर, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना अनेकदा निवेदन देऊन व चर्चा करुनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी कुटुंबासह सोमवार 9 जून 2025 रोजी उकणी गावालगत वर्धा नदीवर पाण्याच्या टाकीजवळ जल समाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसमाधी आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासन व वेकोलि प्रशासनाला कळविण्यात आले आहे. अशी माहिती कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला उकणी चे माजी सरपंच संजय खाडे, कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती चे अध्यक्ष सुरेश ढपकस, सचिव सचिन जुनारकर व शेतकरी उपस्थित होते.

गोंड गोवारींना संविधानीक हक्क द्या'आरक्षण संरक्षण समितीची मुख्यमंञ्यांकडे मागणी

सह्याद्री चौफर | ऑनलाईन

यवतमाळ : 26 मे रोज सोमवार ला आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती चे अध्यक्ष माधव कोहळे यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे माध्यमातून मा.ना.श्री.देवेंद्र फडणविस,मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले. 

मा.सर्वोच्च न्यायालयाचा सिविल अपिल क्र.4096/2020 चा अंतिम आदेश दि.18/12/2020 नुसार त्यात सांगितलेल्या अनुसुचित क्षेत्रातील व गोंड जमातीसोबत आप्तभाव दाखविणाऱ्या गोवारी जमातीला त्वरीत अनुसुचित जमातीचे गोंड गोवारी नावाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाली पाहीजे अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली.

नुकतेच राज्य शासनाने स्पेशल लिव पिटिशन क्र.16513/2023 अंतर्गत बबन लसुंते केस मध्ये मा.सुप्रिम कोर्टात एक काउंटर ॲफिडिविट सादर करुन आपली गोंड गोवारी जमाती बद्दल ची भुमिका स्पष्ट केली आहे.यात जे गोवारी लोक गोंड जमाती सारखी संस्कृती जपते ते गोंड गोवारी सवलती साठी पाञ असल्याचे नमुद आहे व त्याचे 1950 पुर्वीचे कागदोपञी पुरावे अथवा नोंद गोवारी असली पाहीजे.त्यामुळे आम्ही या सवलतीसाठी पाञअसुन आम्हाला आमचे संविधानीक अधिकार त्वरीत मिळावे या आशयाची मागणी निवेदनातुन यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केली.

यावेळी निवेदन देतांना जिल्हाधिकारी कार्यालय तथा निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी विश्राम गृह यवतमाळ येथे सर्वश्री दादाराव बोटरे,राजाभाऊ ठाकरे,सिताराम मंडलवार, चंद्रशेखर ठाकरे,जितेश राऊत,सतिश दुधकोहळे, कमलाकर नेवारे,सुभाष लसंते,धनराज खंडरे,महादेवराव नेवारे,राजेश नागोसे,संतोष बोटरे,प्रविण मोगरे,सचिन कोयरे,गोलू आडे,संतोष वाघाडे,भुषण ठाकरे,विजय नेवारे,राहुल नेवारे,अंचल भोयर,प्रशांत नेवारे इत्यादी अनेकजन हजर होते.