सेल... सेल... सेल... खादी कॉटन महासेल...

सेल... सेल... सेल...

"खादी कॉटन महासेलमध्ये तुम्हाला सर्वोत्तम रेडिमेड कपडे मिळतील! एक पेक्षा एक...व्हेरायटी घेता येईल. नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी. अवघे काही दिवसच आपल्या वणी शहरात! उशीर करू नका! आत्ताच भेट द्या आणि या खादी कॉटन महासेलच्या उत्तम ऑफर्सचा लाभ घ्या."


~सतीश पाटील 
स्थळ - जैताई मंदिर, यवतमाळ रोड, साई मंदीर चौक वणी
 संपर्क :- 8378934466

भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना पदावरून निलंबित करा – इरशाद खान


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

 वणी : महाराष्ट्र आंध्रप्रदेशच्या सिमेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील पिंपळखुटी येथे स्थापन करण्यात आलेला सिमा तपासणी नाका हे येथे कार्यरत अधिकाऱ्यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाल्या सारखा दिसून येत आहे. 

पिंपळखुटी येथे, महाराष्ट्राच्या परिवहन खात्याने गेल्या अनेक वर्षा आधी आर. टी. ओ. चेक पोस्टची निर्मिती केली होती.ओव्हरलोड वाहतुक, वाहनांची कागदपत्रे, वाहन टॅक्स, वाहन चालकाचे परवाने, व शेजारच्या राज्यातून किंवा आपल्या राज्यांतून कोणत्याही जिवनावश्यक वस्तुंची तस्करीवर खास करून लक्ष ठेवण्याची जबाबदारी या सिमा तपासणी नाक्यावरकार्यरत अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. मात्र येथील अधिकारी वाहन तपासणीच्या नावावर फक्त वाहन चालकांची आर्थिक लुट करतांना दिसून येत आहे. काही वाहनांचे सर्व कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा त्याना या ठिकाणी पैसे द्यावेच लागतात. यामुळे तालुक्यात व जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंची तस्करी तथा ओव्हरलोड वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हा सिमा तपासणी नाका अत्याधुनिक सुविधेसह पाटणबोरी गावापासून एक की. मी. अंतरावर स्थापन करण्यात आला आहे. आर. टी. ओच्या दलालांचे जीवनावश्यक व आमली पदाथांची तस्करी करणाऱ्यांशी लागेबांदे असल्यानेच ते कार्यवाही करण्यास टाळत असून त्यांच्या या कामचुकार व भ्रष्ट वृत्तीमुळेच या मार्गावरून जीवनावश्यक तथा आमली पदाथार्ची तस्करी वाढत आहे. त्यामुळे येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कृत्य हे देशाला लुटणारे असून देशद्रोही कृत्य असल्याने येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची चौकशी करून येथील अधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी क्षेत्रीय परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

 ओव्हरलोड वाहतुकीवर फक्त केसेस दाखविण्यापुरतीच कार्यवाही करण्यात येत असून इतर ओव्हरलोड वाहनांना हजारो रुपए घेवून सोडून देण्यात येत असल्याने या राष्ट्रीय महामार्गाची पुरती वाट लागलेली आहे. तसेच ओव्हरलोड वाहनांमुळे गाड्यांचे संतुलन बिघडल्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी ट्रक व इतर वाहन चालकाकडून अवैद्यरित्या पैसे वसूल करण्याकरितां गुंड प्रवृत्तीच्या लोकांची नियुक्ती केलेली आहे. ते स्वतःला परिवहन विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगुन वाहन चालकाकडून बळजबरीने पैसे उखळत आहे. दररोज या अवैद्य वसुलीचा आकडा लाखाच्या घरात जात असल्याने हे आर. टी. ओ. चेक पोस्ट येथील अधिकाऱ्यासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडी सारखेच झाले आहे.
या चेक पोस्टच्या जवळच वणी आणि चंद्रपूर येथे कोळसा, लाईमस्टोन, डोलामाईट खाणीतून निघणारे गौण खनिज अवैद्यरित्या वाहतूक केली जाते. या ट्रकला ओव्हरलोड माल नेण्यासाठी आर. टी. ओ. कडून पास दिल्या जाते. त्यासाठी आर.टी.ओ या ट्रक चालकाकडून कडून ४००० /- रुपये हप्ता वसूल केल्या जाते. तर याच भागात मोठ मोठ्या विस्तीर्ण पात्र असलेल्या नद्यातून निघणारी रेती सुद्धा मोठ मोठ्या वाहनातून अवैद्य रित्या ओव्हरलोड नेल्या जाते. याही वाहनाकडून आर.टी.ओ वसुली करतात. 
सीमावर्ती भागातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त भाग असून दुसर्या राज्यातून आपल्या राज्यात हत्यारांची ने –आन करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून नक्षल आणि दहशतीला सुद्धा पाठबळ मिळत असल्याचे बोलण्यास हरकत नाही. बाहेर राज्यातून येणारा आणि जाणारा गुटखा, कोळसा, लाईमस्टोन, डोलामाईट, सागवान, बोगस दारू, गांजा, अफिम, ड्रग्स, देह व्यापार करणारे टोळ्या, नकली नोटा, या सह अन्य तस्करांना मूकसंमती देऊन येथील आर.टी.ओ. गैरव्यवहाराला वाढवत आहे. आणि यातून देशाची संपती लुटण्याचे काम हे अधिकारी करत आहे. त्यामुळे हे सर्व कृत्य देश विरोधीच आहेत. त्यामुळे या सदर विषयात आपण स्वतः लक्ष घालून येथील सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून या भ्रष्ट व लुटमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर करावी. असे न झाल्यास येत्या ८ दिवसात, राष्ट्र संपतीची होत असलेली लुट व नुकसान रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने येथे सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन मनुष्यबळ उभे करून सर्व प्रकार आपल्या निदर्शनास आणून देण्यात असल्याचे मत इरशाद खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेबांनी चिन्हीत केलेल्या शत्रूकडे दुर्लक्ष केल्यानेच आजची दैन्यावस्था - अरुण भेलके

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजुर कॉलरी : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवजातीचा व भारतीय समाजाचा ऐतिहासिक अभ्यास करून भारतीय समाजातल्या बहुजन - शोषित - पीडितांना सांगितले की, ' तुमचे ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे दोन शत्रू आहेत...या शत्रूंचा नायनाट करण्याची क्रांतिकारी चळवळ केल्यानेच तुमची सर्व प्रकारचा शोषणातून मुक्ती होईल.' परंतु आपल्या देशात या दोन शत्रूंशी शोषित वर्ग मिळून लढण्याऐवजी कम्युनिस्ट आणि आंबेडकरी एकाकी लढले किंवा त्यांनी दुर्लक्षच केले.म्हणूनच आज हे दोन्ही शत्रू सत्तेवर विराजमान होऊन थैमान घालत आहेत." असे मत आशा व गटप्रवर्तक संघटना (लाल बावटा) सिटू चंद्रपूर चे जिल्हा संघटक कॉ. अरुण भेलके यांनी १मे जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन व ५ मे कार्ल मार्क्स यांच्या जयंती दिनानिमित्त येथील रमाई सभागृहात राजूर विकास संघर्ष समिती द्वारा आयोजित वैचारिक प्रबोधन कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले. प्रसंगी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ता व आशा वर्कर सुनीता राहुल कुंभारे उपस्थित होत्या.

पुढे बोलताना कॉ.भेलके म्हणाले की, " मानवी सभ्यता, संस्कृती  विकासात कामगार चळवळीचा संघर्षमय योगदान राहिलेला आहे.कामगार चळवळीनेच शोषणमुक्त समाज निर्माणाचे आदर्श, प्रेरणा व ध्येय मानवजातीला दिले व यातूनच जनतेचे अनेक नायक, कलाकार, बुद्धिजीवी निर्माण होत राहिले. आज आपल्या देशात ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही संगनमताने फॅसिस्ट राज्य करीत आहेत. तेव्हा ह्यांना रोखण्यासाठी कम्युनिस्ट, पुरोगामी, लोकशाहीवादी व  आंबेडकरी चळवळींची आघाडी करून लढणे ही एक ऐतिहासिक जबाबदारी झालेली आहे. 

जनतेला महापुरुषांचे विचार पोहोचवून वास्तववादी परिस्थितीचे जाणीव करून देऊन त्यांच्या मध्ये पुरोगामी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावी हा उद्देश ठेवून येथील राजूर विकास संघर्ष समितीने प्रबोधन कार्यशाळेची माला सुरू केली असून दर शनिवारला विविध विषयांची महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचा निमित्ताने श्रम करणाऱ्या वर्गाचे प्रश्नच, त्यांचा चळवळीवर  दिनांक ३ मे रोजी प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली.
 
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी तर सूत्र संचालन महेश लिपटेसर यांनी केले, तसेच राहुल कुंभारे यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानले.
 कार्यशाळेला प्रामुख्याने पीएचडी स्कॉलर पल्लवी धम्मप्रिय, पीएचडी स्कॉलर व शिक्षिका रक्षा अमोल वानखेडे, विजय तोताडे, सुनील सातपुते, प्रफुल मेश्राम, अर्चना मून, अल्का भोंगाडे, रजनी धोटे, ताई बलकी, सुकेशनी धाबर्डे, सुनीता वाळके, संजय कवाडे, ताई लोखंडे आदी उपस्थित होते.

गुरुवारी वणी करांच्या सेवेत होणार लालपरी दाखल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

 वणी : वणी आगाराला नवीन लालपरी बसेस मिळवण्याकरिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने १५ दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, आता परिवहन मंत्र्यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मागणीची दखल घेतली असून वणी आगाराला नवीन ५ बसेस मिळाल्या असून त्या बसेस आणण्याकरिता आज रविवारी दुपारी चार वाजता चालक आणि वाहक दापोली (पुणे) येथे रवाना होणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांना एका पत्राद्वारे दिली. त्यामुळे सोमवारी होणारे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची माहिती राजु धावंजेवार मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष यांनी माध्यमाना दिली असून एसटी महामंडळाचे त्यांनी आभार मानले आहे.
वणी आगाराचे उत्पन्न हे यवत‌माळ जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे आहे.परंतु वणी आगाराचा डोलारा फक्त ३२ बसेसवर सुरु आहे. ३३ बसेस स्क्रैप झाल्या आहे त्यामुळे लालपरी ही धक्का परी बनली, लालपरीची डागडुगी करून टिनपत्रे लावले तरी जागोजागी पावसाळ्यात गळती होत असून चालक, वाहक आणि प्रवाशांना अतोनात हाल होत असल्याने अखेर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांनी याची दखल घेतली आणि येत्या १५ दिवसात जर लालपरी न मिळाल्यास परिणामी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला व सोमवार दि ५ मे पासुन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण महाराष्ट्र-प्रदेश मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार हे करणार होते. परंतु महाराष्ट्राचे परिवहन मंत्री यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या आमरण उपोषणाची दखल घेवुन ५ नवीन लालपरी बसेस वणी आगाराला पाठविण्याचे एका पत्राद्वारे सांगीतले.त्यामुळे उद्या होणारे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले असुन मानवी हक्क सुरक्षा परिषदेने एसटी महामंडळाचे आभार मानले.

संकेत नानाजी येलपूरवार यांची भारतीय रिज़र्व बँकेत "वर्ग अ अधिकारी" म्हणून निवड !

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भारतीय रिज़र्व बँकेच्या (RBI) पदोन्नती परीक्षेत यश मिळवून वणी येथील संकेत नानाजी येलपूरवार यांची क्लास वन ऑफिसर (Grade A Officer) पदासाठी निवड झाली आहे. ते सध्या मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. ही निवड संबंधित अधिकाऱ्याच्या सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि कार्यक्षमता याचे फळ मानली जात आहे.  

या पदोन्नतीमुळे त्यांना बँकेतील धोरणात्मक निर्णयांमध्ये अधिक सक्रिय भूमिका निभावता येणार आहे. रिझर्व बँकेच्या अंतर्गत आयोजित होणाऱ्या या परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक व कठीण मानल्या जातात.संकेत यांनी मागील चार वर्षांत विविध विभागांमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या यशामुळे बँकेत तसेच कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.  

बँकेतील सहकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नम्रतेने सर्वांचे आभार मानले व अधिक जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.