राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धाकांचे जोरदार प्रदर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वर्धा येथे दिनांक 25 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान तीन दिवशीय राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धा "नृत्योत्सव-3" या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय कला मंच व सचिन डान्स अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चिमुकल्या स्पर्धाकांनी आपल्या नृत्याचे जोरदार प्रदर्शन करत वणीची शान उंचावली आहे. 

 या राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये कु. भार्गवी विरेंद्र महाजण,कु.युक्ता सहारकर, कु.क्रिष्मा चाणना,दिशा केशवाणी.कु. उर्वी प्रणित बांगडे, कु. सिया सचिन डोर्लीकर, कु.मुग्धा सचिन डोर्लीकर, चि. आरुश सुधीर पांडे,कु सिद्धी कोंडावार कु.ध्रुवीया रासेकर यांनी "नृत्योत्सव-3" या स्पर्धेमध्ये सहभाग घेवुन राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत वणीतील कु भार्गवी वीरेंद्र महाजन वय 7 वर्ष,युक्ता सहारकर,क्रीष्मा चाणना,दिशा केशवाणी या चिमुकल्यानी आपल्या कलेचे जोरदार प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावीला तर कु.उर्वी बांगडे ,कु.सिया डोर्लीकर,कु मुग्धा डोर्लीकर, कु.ध्रुवीया रासेकर,चि.आयुश पांडे ,कु.सिद्धी कोंडावार, या चिमुकल्याणी तृतीय पारितोषिके पटकावीत कलेचे जोरदार प्रदर्शन करत वणीची राष्ट्रीय पातळीवर शान उंचाविली.

नृत्य प्रशिक्षिका गुरुरत्न कु. पुजा धनवटे यांनी मोलाची कामगिरी करत चिमुकल्याना घडविल्याबद्दल तसेच बालकांना घडविण्याचा वसा घेतल्याने या प्रसंगी त्यांचा गौरव करत गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बाबत असे की, अशा नृत्य स्पर्धा दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येत असुन या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील स्पर्धक भाग घेत असतात.याआधी हिच स्पर्धा छत्तीसगड येथील दुर्ग,महाराष्ट्र राज्यातील नांदेड व गोवा येथील पणजी येथे तसेच भारतातील अनेक राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये सुद्धा याच स्पर्धाकांनी पारितोषिक पटकाविले होते. राष्ट्रीय पातळीवरील अखिल भारतीय नृत्य स्पर्धेमध्ये वणीतील चमूंनी बाजी मारणे, हे वणीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. वणीतील चमुंनी राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत विजय मिळवित पारितोषीके पटकाविल्याने सर्वच स्पर्धकांचे व नृत्य प्रशिक्षिका यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. स्पर्धकांनी या विजयाचे श्रेय त्यांचे आई वडील व नृत्यगुरु पूजा धनवटे व गुरूजनांना दिले आहे.

भाकप च्या आंदोलनापुढे जि.आर.एन.कंपनी झुकली, बेलोरा (निलजई) येथील बेरोजगारांना सात दिवसात नौकरीवर घेण्याचे आश्वासन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : बेलोरा (निलजई) परिसरात जि.आर.एन.कंपनी सुरु असुन या कंपनीत परीसरातील तरुण बेरोजगारांना व स्थानिक लोकांना नौकरीत सामावून घेण्यासाठी शुक्रवार 25 एप्रिल पासुन कंपनीसमोर भाकपचे नेत्रुत्वात बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत कंपनीने प्रतिसाद न दिल्याने दुसरे दिवशी 26 एप्रीलला आंदोलकांनी कंपनी बंद करण्याचा ईशारा देताच कंपनी प्रशासनाने झुकते माप घेत मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली व भाकपला चर्चेचे आमंत्रण दिले.

झालेल्या बैठकीत वेकोली वणी क्षेत्राचे महाव्यवस्थापक, कंपनी व्यवस्थापन प्रतिनीधी व भाकपचे शिष्टमंडळात वणी विधानसभा क्षेत्राचे भाकप नेते काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,शिंदोला जि.प. सर्कलचे भाकप नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार, काॅ.रवि गोरे, काॅ.मिलींद रामटेके हे सहभागी झाले. चर्चेमध्ये बेलोरा (निलजई) येथील स्थानिक बेरोजगारांना सात दिवसात नौकरी देण्याचे कंपनीने आश्वासन दिले. त्यानुसार तिसरे दिवशी 27 एप्रिल रविवारला भाकपने कंपनीला बेरोजगारांची यादी सोपवुन राज्य कौंसिल सदस्य काॅ.सुनिल गेडाम,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे यांचे उपस्थितीत आंदोलकांनी आंदोलनाच्या विजयाच्या घोषणा देत आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 

याप्रसंगी शेकडो युवकांनी व गावकरयांनी भाकपची सभासद नोंदणी केली. यशस्वितेसाठी काॅ.मोरेश्वर कुंटलवार,रवि गोरे,मिलींद रामटेके,महेश ईंगोले,संदीप ईंगोले,सुनिल मडावी,प्रभाकर डंबारे,संतोष ईंगोले,हुसेन ईंगोले,गजाजन कोयचाडे,हनुमान भोयर,विकास कोडापे,अविनाश पचारे,अविनाश ईंगोले,प्रकाश पारशिवे,अनिल मडावी,गोसाई पारशिवे,बंडु मडावी,आनंद कोयचाडे,संताष ईंगोले,शैलेष कांबळे,ज्ञानेश्वर चौधरी,दिनेश चिट्टलवार,दिपक पारशिवे,सुरेश ईंगोले,विजु पोतराजे,शुभम टेकाम,प्रविण कामरे,शिवराम बरडे,संतोष दुर्वे,विजय डवरे,अमोल रेगुंडवार,बाबाराव पचारे,ईश्वर ईंगोले,आशिष ईंगोले,गोपाल चिटपल्लीवार,गौरव बोबडे,विनोद उईके,रवी मडावी यांचेसह शेकडो युवकांनी अथक परिश्रम घेतले.

मायलेकी बेपत्ता, पोलिसात तक्रार...


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वरोरा : बेपत्ता होण्याची अनेक घटना सध्या समोर येत आहेत. अशातच केळी येथील एक मायलेकी बेपत्ता झाल्याची बातमी आहे. या घटनेत प्रियंका संदीप किनाके(30) आणि अडीच वर्षांची मुलगी रियांशी 27 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. संतोष बापुना गेडाम रा. वडकी ता. राळेगाव, यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

प्रियंका आणि रियांशी ही 27 एप्रिल पासून सासरी किरकोळ वाद निर्माण झाल्यामुळे माहेरी जाते असं सांगून सकाळी दहा वाजता गेल्या आहेत.मात्र, त्या वडिलांकडे पोहचली नसल्याने सर्वत्र विचारपूस करून तिची बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या मायलेकी कुठे आढळून आल्यास 7057839682 या मोबाईल क्रमांकावर कळवावे व पोलिसांनाही माहिती द्यावी असे, आवाहन तक्रारकर्त्यांसह पोलिसांनी केले.

प्रिंकाचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फुट, केस लांब, अंगात सलवार सुट, चेहयावर थोडे डाग व रियांशी हिचा सावळा रंग उंची 2 फूट,केस बारीक, अंगात डंगरी घातलेली. 

आता फक्त 5 दिवस उरलेत!, त्वरा करा...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीः आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. इयत्ता 3 री ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे. हे शिबिर शहरातील, जनता शाळेजवळील, गुरूनगर येथील, हनुमानमंदिर जवळ, टागोर चौकातील के.बी.सी. हाईट्स बिल्डिंग, नवीन महाराष्ट्र
बँकेच्यावर,राईजअप कॉम्प्युटर, सुरेश बदखल यांच्या घरी जैन ले-आऊट, छोरिया ले-आऊटमधील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल, आनंदनगर येथील बालविद्या मंदिर, चिखलगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे होईल.
या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल. इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल. नोंदणी 7038204209 या मोबाईल नंबरवर 20 एप्रिल ते 1 मे दरम्यान करता येईल.या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील. 

शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. अधिक माहितीसाठी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात प्रा. सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. तेव्हा या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

"शोषणविरहित समाजव्यवस्थेसाठी बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद" - गीत घोष

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : राजुर विकास संघर्ष समितीच्या वतीने येथील माता रमाई सभागृहात प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली. या प्रबोधन कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष होते तर अध्यक्षस्थानी माजी पं. स. सदस्य मा. अशोक वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विद्याताई डेव्हिड पेरकावार, पो. पा. वामन बलकी, मारोती पाटील बलकी, वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे, ॲड. अरविंद सिडाम हे होते. 

"भारतीय समाजव्यवस्था चातुर्वर्ण पद्धतीनुसार जन्माधिष्ठित असल्याने शूद्रांचे जीवन जगण्याचे मानवी हक्क हिरावून घेण्यात आले होते. त्यामुळे शोषण हे ह्या व्यवस्थेचा मुख्य गाभा होता. संधी नाकारलेल्या शोषित लोकांना प्रत्येक ठिकाणी समान संधी मिळाली पाहिजे, राज्याकडून मूलभूत हक्क हिरावून घेतल्या जाऊ नये, ह्यासाठीच बाबासाहेबांनी राज्य समाजवादाची मांडणी करून उत्पादनाची साधने कारखाने, शेती, जड उद्योग, विमा, शिक्षण व आरोग्य हे सर्व राज्याचा म्हणजेच जनतेच्या मालकीची असावीत, असा मूलभूत गाभा असलेल्या पायावर उभे असलेले संविधान अपेक्षित होते." असे प्रतिपादन प्रबोधन कार्यशाळेचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवाद" ह्याची मांडणी करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून गीत घोष यांनी केले.

राज्य आणि समाजवाद ह्याचा परस्पर खुलासेवार मांडणी करताना घोष पुढे म्हणाले की, "राज्य ही संकल्पना मुळात ही राज्य करण्यासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही विचाराचा सत्ताधारी राज्यात कार्यरत झाला तरीही त्यांच्याकडून देशातील नागरिकांसोबत कसा व्यवहार केल्या जाईल हे सांगता येत नाही, म्हणून बाबासाहेबांनी राज्य समाजवाद ही मांडणी करून संविधानाचा पायाच मुळात समाजवादी असावा असे सांगितले. सत्तेवर कोणत्याही विचाराचे लोक असले तरीही त्यांना समाजवादी व्यवस्था बदलविता येणार नाही अशी व्यवस्था बाबासाहेबांना करायची होती. परंतु तत्कालीन संविधानसभेतील सदस्यांना हे मान्य नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी संविधान अर्पण करताना इशारा दिला की, आज आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय वंचित जनता ह्याला इजा पोहोचवतील. आज आपल्या देशात सामाजिक विषमता, धर्मांधता वाढून एक दुसऱ्याचा शत्रू झाला आहे. प्रचंड खाजगीकरणामुळे आर्थिक विषमता वाढली आहे. उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांच्या हातात एकवटली असून ७० टक्के संसाधनावर कब्जा केला आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार हे देशाचा विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत मात्र त्याला खाजगी क्षेत्रावर सोपवून देशातील नागरिकांना ह्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य केल्या जात आहे. त्याच बरोबर सांप्रदायिकतेचा वापर करून लोकशाहीलाच धोक्यात आणल्या जात आहे. यावर एकच उपाय असून बाबासाहेबांनी सांगितलेला राज्य समाजवाद आणावा लागेल त्यासाठी जनतेनी चळवळ उभारली पाहिजे," असे आवाहन केले.

यावेळेस या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांकडून मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचसोबत MPSC परीक्षेत पास झालेल्या येथील प्रशिक अजय कांबळे ह्याचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे व आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रबोधन कार्यशाळेची प्रस्तावना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केली तर सूत्र संचालन राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश लिपटे सर यांनी केले.

प्रबोधन कार्यशाळेला प्रामुख्याने नंदकिशोर लोहकरे, राहुल कुंभारे, जयंत कोयरे, विजय तोताडे, विनायक येसंबरे, सुनील सातपुते, सुनीता कुंभारे, अर्चना कडुकर, नंदकिशोर मुन, कैलास पाईकराव, अमर्त्य मोहरमपुरी, पीयूष कांबळे, सौरभ पाईकराव, सौरभ मजगवळी, वैभव मजगवळी, नाना लोहकरे, आदी व अनेक गावकरी उपस्थित होते.