राजुर येथे प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

राजूर कॉलरी : भारतातील जातीवाद व धर्मांधवादाने देशातील संतांना आणि महापुरुषांना जातीमध्ये व धर्मामध्ये विभागून टाकण्याचे महापाप केले आहे. परिणामी संत व महापुरुषांच्या जयंत्या ह्या त्यांचे विचार अंगिकारून कृती करण्याऐवजी निव्वळ धूमधडाक्यात डीजे लावून नाचगाणे करून आम्ही त्यांना किती डोक्यावर घेतले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापुरुषांचे विचार जनमानसात रुजण्याऐवजी व्यवस्था पुरोगामी न होता प्रतिगामित्वाकडे वळत आहे. व्यक्ती तर्कशील, विवेकवादी होण्यापेक्षा अंधभक्त बनत चालला आहे. 
       
शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला हे सर्व आज भयंकर परिस्थितीत आपल्या प्रश्नांना घेऊन जगत आहेत. असे असताना मात्र आपल्या देशातील जनता महापुरुषांच्या योग्य प्रबोधनाअभावी एकजूट होऊन आपल्या मानवी हक्काचा मूलभूत अधिकारासाठी संघर्ष करताना दिसत नाही. हाच धागा पकडून येथील राजूर विकास संघर्ष समितीने संत व महापुरुषांनी दिलेले विचार, त्यांनी विचारासोबत केलेली कृती ह्याचे प्रबोधन करण्याचा निर्धार केला आहे. सध्याचा घडीला उद्भवणारे प्रश्न ह्यांना जोडून काय केल्याने देशाचा विकास योग्य दिशेने होईल हा सुद्धा ह्या प्रबोधन कार्यशाळेचा उद्देश आहे. त्याकरिता सातत्याने ह्या प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन केल्या जाणार असून वेगवेगळ्या विषयातील पारंगत बुद्धिजीवींना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. 

दिनांक २६ एप्रिल २०२५ रोज शनिवारला सायंकाळी ६ वाजता राजूर येथील महिला मंडळ हॉल येथे "डॉ. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद" ह्या विषयावर अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी पंस सदस्य मा. अशोक वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मा. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी सरपंच मा. प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बल्की, महादेव तेडेवार, दीक्षाभूमी बुद्धविहारचे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम, मारोती पाटील बल्की, अनिल डवरे,दिनेश बलकी उपस्थित राहणार आहे.

या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे गुरुजी, जयंत कोयरे, राहुल कुंभारे, अमित करमणकर, नंदकिशोर लोहकरे, बंडू ठमके, विजय तोताडे व अन्य सदस्यांनी केले आहे.

भाजपचा आठ दिवसाचा अल्टीमेटम!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : सध्या कडक उन्हाळा सुरु असल्यामुळे विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवुन मारेगांव तालुक्यात १३२ के. वी. विद्युत उपकेंद्राचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनी कार्यालय मारेगांव यांना करण्यात आली.

मारेगांव तालुक्यात अनेक दिवसापासुन विजेचा खेळखंडोबा चालू आहे. दिवसातुन ५० ते ६० वेळा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक विद्युत बद्दल संपर्क साधून विचारपूस केली असता कर्मचारी फोन उचलण्यास तयार राहात नाही. तसेच वणीवरून लाईन गेली, पांढरकवढ्या वरून लाईन गेली असे उडवाउडवीचे उत्तर देतात. असा आरोप नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

मागील २ वर्षापासुन १३२ केवी उपकेंद्र मंजुर होऊन सुध्दा मारेगाव स्तरावरून स्तरावरून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. 

येत्या ८ दिवसात मारेगांव तालुक्यातील विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवण्यात यावी व १३२ केवी विद्युत उपकेंद्राचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, जर हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

यावेळी अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व मारेगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केला पहलगाम घटनेचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या आंतकवादी हल्ल्याचा मानवी हक सुरक्षा परिषदेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविला यावेळी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरीकांच्या आत्म्याला शांती लाभो याकरिता मेनबत्ती लाउन श्रध्दांजली वाहिली.

२८ पर्यटकांचा जागीच मृत्यु झाला. समामन सुन्न करणाऱ्या या घटनेचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने तिव्र स्वरुपात निशेध व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विजय नगराळे होते तर कार्यक्रमाचे संचालन वामनराव कुचनकार यांनी केले. 

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, वामनराव कुचनकार, डॉ विजय नगराळे, अमोल कुमरे, श्रीकांत हनुमंते, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सौ सुमित्राताई गोडे, सौ. प्रेमिला चौधरी, सौ सुनिता काळे, पुष्पाताई कुळसंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

वणी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 4 लाखांच्या वरील दागिण्यावर हात साफ...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत चिखलगाव परिसरात चोरट्यांनी डॉक्टर च्या घरात चोरी करत सोन्या चांदीचे दागिने, व रोख रक्कम चोरून नेले. 17 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोढाले ले आउट, चिखलगाव येथे ही घटना घडली. हेमंत पुरुषोत्तम देठे (वय 37, रा. बोढाले ले आउट, चिखलगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्यांनी चिखलगाव परिसरातील बोढाले ले-आऊट येथे एका घरातून सोन्याचे दोन मंगळसुत्र 20 ग्रॅम किमंत अंदाजे 1,60000/-रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅम असे एकुण 10 ग्रॅम 80000/-रुपये, लहान मुलीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 2 ग्रॅम एकुण 4 ग्रॅम 32000/-रुपये, सोन्याचा गोप ग्रॅम किंमत अंदाजे 32000/-रुपये, चांदीचे चाळ 6 नग किमंत अंदाजे 10000/-रुपये व नगदी 135000/-रुपये, असा एकुण 4,49000/-रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. कलम 331(4), 305(a) बि एन एस नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तूर्तास प्रभार असलेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे, यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जम्मू काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्याचा तीव्र निषेध येथील शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने वणी शिव तिर्थावर करण्यात आला. 

या वेळी वणी शहर व तालुका शिवसेना शिंदे गटाचे मनिष सुरावार, किशोर नांदेकर, सुनील डोंगरे, प्रेम ढवळे, संजू तोमस्कर, सुमीत केशवाणी, मनोज नवले, नोमेश्वर पाणघाटे, अमृत पुरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार झाला. त्यात 27 पर्यटक मृत्यू मुखी पडले. या घटनेची देशभरात संताप व्यक्त होत आहे व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वणी येथेही त्या घटनेचा निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शांती लाभण्याकरिता श्रद्धांजली वाहिली व तेथील जखमीना बरे होण्याची प्रार्थना सुद्धा करण्यात आली.