युवासेना (उबाठा) च्या वतीने वणीत पहलगाम हल्ल्याचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध युवासेनाचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात येथील शिवतीर्थावर करण्यात आला. 

यावेळी सबिर शेख, कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, गौरव पांडे, मिलिंद बावणे, आशुतोष नागभिडकर, विनोद दुमणे, धनराज येसेकर, आकाश तमिलवार, संदीप बावणे, शुभम नागपुरे, मयूर खांडरे, राजू चिंचोलकर, सचिन कळमनकर, आकाश पेंदोर, अनिकेत बदकल, अभिषेक गुंडावार, बादल येसेकर, आर्या राऊत, संघर्ष शेंडे, बबन केळकर, यासह मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत पाकिस्तानी ध्वज जाळून निषेध केला. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यमान सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या अपयशाचा निषेधही केला. 

देशाच्या सीमा सुरक्षित असल्याची बढाई मारणाऱ्या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 

कानडा येथे "ग्रामजयंती" महोत्सव पर्वाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानडा ग्रामपंचायत सरपंचा सौ सुषमा रूपेश ढोके यांच्या सुबक संकल्पनेतून ग्रामजयंती पर्व दि.२४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे. 
जानावे ग्राम हेची मंदिर|
ग्रामातील जन सर्वेश्र्वर||
पूजा हिच सेवा समग्र|
हाची विचार निवेदावा||
                 -ग्रामगीता

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस "ग्रामजयंती" म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. या सात दिवशीय पर्वामधे ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्त गाव, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, सांडपाणी व्यवस्थापन व शेती विषयक मार्गदर्शन इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. 

महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून तो गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. ग्रामगीतेतील ४१ अध्याय ग्रामीण भागातील जनतेशी निगडित आहे. ग्रंथामधील अध्याय ११: ग्राम रक्षण, अध्याय १२: ग्रामशूध्दी, अध्याय १३: ग्रामनिर्माण कला व अध्याय १४: ग्राम आरोग्य अशा अनेक विषयांवर ग्रामगीतेमध्ये मानवाला कळेल अशा सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.

गाव हा विश्वाचा नकाशा |
गावावरून देशाची परीक्षा||
गावची भंगता अवदशा | 
येईल देशा ||
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपचा सौ सुषमा रूपेश ढोके, ऊदघाटक सुनिलभाऊ देऊळकर तालूका सेवाधिकारी, प्रमूख उपस्थित किसनभाऊ मत्ते भजन प्रमुख मारेगाव तालुका तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डाहूले, माजी सरपंच प्रमोदजी धोबे, माजी सरपंच बंडू भाऊ ढोके, खरेदी विक्री संचालक अरूण आस्कर, रूपेश ढोके, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक व कर्मचारी व गावातील असंख्य नागरिक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी केले, प्रास्ताविक सुरज येवले, आभार रूपेश ढोके यांनी मानले.

तहसीलदार निलावाड याचं मारेगाव तालुक्यातील नागरिकांना आवाहन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात मारेगाव तालुक्यातील पर्यटक अडकले असतील अशा व्यक्तींच्या नातेवाईकांना मारेगाव तहसीलदार यांनी मोठं आवाहन केले आहे. 

सदरील घटनेत तालुक्यातील पर्यटक तिथे अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत करता येईल. या साठी संपर्क साधावा असें तहसीलदार उत्तम निलावाड,मारेगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. 

त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की,श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेमुळे मारेगांव तालुक्यातील त्याठिकाणी पर्यटक अडकलेले असतील, त्यांचे नातेवाईकानी त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक आणि सध्या जिथे आहेत तेथील पत्ता मला उपलब्ध करून द्यावा,जेणेकरून मला (तहसीलदार मारेगाव) त्यांची माहिती मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांचे मार्फत शासनास, जम्मू आणि श्रीनगर प्रशासनास विहित वेळेत कळविता येईल. 
 

शिवसेनेचा पहलगाम येथील आतंकी हल्याचा निषेध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा निषेध येथील शिवसेना-युवासेना (शिंदे गट) यांच्या वतीने मार्डी चौकात करण्यात आला. 

दरम्यान, त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरिता श्रध्दांजली वाहिली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथिल वैसरन येथे दोन दहशतवादी लष्करी गणवेशात तेथील पर्यटकांवर गोळीबार केला.त्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले व 15 च्या वर पर्यटक जखमी झाले. या घटनेची निंदा देशभरात होत असताना मारेगाव येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शांती लाभण्या करिता व जखमी पर्यटकांची प्रकृती लवकरात लवकर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो, याकरिता शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन परमेश्वरास प्रार्थना केली व आतंकी हल्याचा तीव्र निषेध केला.

या वेळी मारेगाव तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, विजूभाऊ मेश्राम, धनराज भट, उमेश उलमाले, धर्मा जाधव, राजू खडसे, राजेंद्र ठक, भीमरावभाऊ मेश्राम, प्रवीण गमे, मनोहर मोहुर्ले, महादेव लोणारे, गणपत वाढई, किशोरभाऊ शेंडे, महेश ढुमणे, संतोष नागोसे, संदीप शिरामे, नितीन कापसे, प्रशांत भंडारी, अमोल मत्ते तसेच युवासेनेचे शंकर नागोसे, तेजस कापसे, बाळू चावके, कार्तिक नेहारे, वेदांत सिडाना, तन्मय सरोदे, गोलू कापसे, अक्षय कोयचाडे, मनोज नेहारे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

भालेवाडीत पाण्याची भीषण समस्या...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी येथे जलवाहिणीचे ऐशी तैशी होत पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेली ग्रामपंचायत व प्रशासनाच्या तकलादु धोरणाच्या परिपाक नागरिकांच्या घशाला कोरड निर्माण करीत आहे. किंबहुना येथील पाण्याची समस्या बिकट बनली असून ग्रामपंचायतीच्या बेताल भूमिकेने येथील पाणी पेटत असून नागरिक या मूलभूत प्रश्नांवर आंदोलनाच्या तयारीत आहे. 

भालेवाडी 500 लोकवस्तीचे कोलाम गोंड आदिवासी जमातीचे गाव मूलभूत गरजे पासून कोसो दूर असलेल्या गावात समस्यांचा डोंगर आवासून उभा आहे. येथे जुन्या जलकुंभाची पूर्वी निर्मिती करण्यात आली, मात्र जलवाहिणीचे काम तोडक्या पद्धतीने करण्यात आल्याने पाणी समस्यांनी तोंड वर काढले आहे. मागील अनेक महिन्यापासून जवळपास 50 घरांना पाणी समस्यांचा फटका बसत आहे. ऐने उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करीत येथील बहुतांश नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीचे येथे सपशेल दुर्लक्ष होत असून तोंडी सूचना करूनही मूग गिळूण बसून आहे. नव्याने जलकुंभाची निर्मितीचे नियोजन अतिशय संथ गतीने होत असतांना पाण्याचा फटका बसण्याचे कारण हे जलकुंभ ठरत आहे. एकूणच पाण्याच्या भीषण कृत्रिम टंचाईने जलकुंभ बांधकाम येथे वांझोटे ठरत आहे. 

गावातील अर्ध्या लोकांना पाणी मुबलक मिळत असतांना अकार्यक्षम ग्रामपंचायत सचिव, सरपंच, कर्मचारी व इतर सदस्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीने पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तूर्तास रखरखत्या उन्हात येथील पाणी पेटले असून नागरिकांच्या घशाला कोरड निर्माण झाली आहे. ही गंभीर समस्या तत्काळ निकालात काढून नागरिकांचा घसा ओला करावा,अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.