कानडा येथे "ग्रामजयंती" महोत्सव पर्वाला सुरुवात...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानडा ग्रामपंचायत सरपंचा सौ सुषमा रूपेश ढोके यांच्या सुबक संकल्पनेतून ग्रामजयंती पर्व दि.२४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे. 
जानावे ग्राम हेची मंदिर|
ग्रामातील जन सर्वेश्र्वर||
पूजा हिच सेवा समग्र|
हाची विचार निवेदावा||
                 -ग्रामगीता

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस "ग्रामजयंती" म्हणून देशभरात साजरी करण्यात येते. या सात दिवशीय पर्वामधे ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्त गाव, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, सांडपाणी व्यवस्थापन व शेती विषयक मार्गदर्शन इत्यादी विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे. 

महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहून तो गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. ग्रामगीतेतील ४१ अध्याय ग्रामीण भागातील जनतेशी निगडित आहे. ग्रंथामधील अध्याय ११: ग्राम रक्षण, अध्याय १२: ग्रामशूध्दी, अध्याय १३: ग्रामनिर्माण कला व अध्याय १४: ग्राम आरोग्य अशा अनेक विषयांवर ग्रामगीतेमध्ये मानवाला कळेल अशा सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.

गाव हा विश्वाचा नकाशा |
गावावरून देशाची परीक्षा||
गावची भंगता अवदशा | 
येईल देशा ||
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संरपचा सौ सुषमा रूपेश ढोके, ऊदघाटक सुनिलभाऊ देऊळकर तालूका सेवाधिकारी, प्रमूख उपस्थित किसनभाऊ मत्ते भजन प्रमुख मारेगाव तालुका तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डाहूले, माजी सरपंच प्रमोदजी धोबे, माजी सरपंच बंडू भाऊ ढोके, खरेदी विक्री संचालक अरूण आस्कर, रूपेश ढोके, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक व कर्मचारी व गावातील असंख्य नागरिक हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ग्रामधिकारी ज्ञानेश्वर जाधव यांनी केले, प्रास्ताविक सुरज येवले, आभार रूपेश ढोके यांनी मानले.