बुद्ध गया महाबोधी महाविहार बौद्धांसाठी मुक्त करा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : बिहार येथील बुद्धगयातील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ असून गेल्या कित्येक शतकांपासून हे महाबोधी महाविहार यांचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपविण्यात यावे यासाठी संघर्ष सुरू आहे. परंतु याकडे भारतातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही करिता सध्या ह्या प्रश्नावर संपूर्ण देशव्यापी संघर्ष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत राजूर कॉलरी येथील दीक्षाभूमी बुद्धविहार व बौद्ध बांधवांचे वतीने महामहीम राष्ट्रपती यांना वणी येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले.

बिहार येथील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्धांसाठी पवित्र श्रद्धा स्थान असलेले प्राचीन विहार आहे. त्या ठिकाणी अडीज हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती. ब्रिटिशांचे काळात बौद्ध विचारवंत अनागरिक धम्मपाल (श्रीलंका) यांनी पुनर्जीवित केले होते. गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून ह्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मियांचे हाती येऊ शकले नाही. त्यासाठी बौद्ध धर्मियांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध बांधवांकडे सोपविण्यात यावे आणि सन 1949 च्या बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून बुद्ध गया महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन गैरबौद्धांपासून मुक्त करावे अशी मागणी ह्या देशव्यापी आंदोलनंतर्गत करीत असताना राजूर येथील बौद्ध बांधवांकडून निवेदन देऊन करण्यात आली. 

निवेदन देते वेळेस दीक्षाभूमी बुद्धविहार कमिटी चे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, उपाध्यक्ष पंकज कांबळे, माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे, ॲड. कुमार मोहरमपुरी, यशवंत पाटील, सोमेश्वर जांगडे व अनेक उपासक उपासिका उपस्थित होते.

मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी सौ माधुरी झबाडे तर, शहर महिला अध्यक्षपदी सौ सविता आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली आहे. नियुक्तीपत्र देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, निशांत मेश्राम, अमोल कुमरे, वेणुदास हुसुकले, सुनिल झबाडे, उपस्थित होते.
 
सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे माधुरी झाबाडे व सविता आत्राम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बुद्धगया: महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या मारेगावात मोर्चा!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या मारेगावातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम,भारतीय बौद्ध महासभा, व समता सैनिक दल तालुक्याच्या वतीने आयोजित या शांती मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी व्हावे अशी,प्रसिद्धी पत्रकातून माहिती देण्यात आली आहे. तहसील कार्यालयावर शांती मोर्चा दि.11 मार्च ला दुपारी 12.30 वाजता धम्मराजिका बुद्धविहार ते तहसील कार्यालय असा काढण्यात येणार आहे. यावेळी तहसील कार्यालयाला निवेदन सादर करण्यात येणार असून बौद्ध अनुयायिंच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहे.

१) बुध्दीस्ट टेम्पल ॲक्ट १९४९ रद्द करणे. २) बुद्धगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. 

तरी सर्व सामाजिक संघटना व बौध्द बांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 

'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट आज 10 मार्चपासून आपल्या सेवेत


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शहरात 'गारवा' फॅमिली रेस्टॉरंट या नवीन प्रतिष्ठानची दि.10 मार्च 2025 पासून खास खवैयांसाठी सेवेत येत आहे.

मारेगावकरांसाठी सर्वात उत्तम अशा फॅमिली रेस्टॉरंट च्या उदघाटनचा सोहळा मारेगावामध्येच होत आहे. त्रिवेणी बार च्या बाजूला,मारेगाव मेन रोड वर भव्य शुभारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. 

व्हेज नॉनव्हेज मेजवानी सह भरपूर वेरायटी, तेही चुलीवरच्या जेवणाची अस्सल मजा व आस्वाद "गारवा" मध्ये घेता येणार आहे.

तालुक्यातील खवैयांनी उद्या सोमवारला सायंकाळी 6 वाजता भव्य उदघाटन शुभारंभला उपस्थित राहून शोभा वाढवावी असे, आवाहन पंढरी लांबट, विनीत जयस्वाल, रोशन आवारी, रघुवीर कारेकर यांनी केले आहे.

ग्रामपंचायत कानडा चे वतीने महिला दिन साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : जागतिक महिला दिनानिमित्त कानडा येथे महिला जनजागृती चा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या अध्यक्षा संरपच सौ. सुषमा रूपेश ढोके तर, मार्गदर्शक म्हणून शांताबाई ईंगळे (उमरखेड), नूरता निमसटकार (मार्डी), यांचै महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, महिला सबलीकरण, बालविवाह, दारुबंदी,ग्रामसभा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच गावातील प्रतीक्षा आस्कर, सुवर्णा डाहूले, सुवर्णा येवले, अल्का चामाटे, गीता झीले, अर्चना धोबे, संगीता येवले, पुष्पा ढोके व गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा बदखल तर, आभारप्रदर्शन वंदना येवले यांनी मानलेत.