जागतिक महिला दिन


थोडा तरी वेळ काढ सखी थोडा तरी वेळ काढ ग.....
या धकाधकीच्या जीवनातून थोडा तरी वेळ काढ ग.....
तू आहेस एक स्त्री,आई,मुलगी, बहीण, बायको, आजी, नातीन.....
पण थोडा स्वतःसाठी वेळ काढ ग ही सगळी नाती जपून थोडा तरी वेळ काढ सुख दुख तर येतील जातील.....
लहान होतीस तर बागडायचिस खेळायचीस.....
थोडी मोठी झाली तर शाळा कॉलेज अभ्यास यात रमायचीस.....
वयात आली लग्नाच्या तर घरच्यांनी केले तुझे पिवळे हात.....
कारण तुला जायचं होतं परक्या घरी कुणाला तरी तुला द्यायची होती साथ.....
लहानाची मोठी झाली शिक्षण घेऊन मुलगी झाली.....
शिक्षण झाल्यावर लग्न झाले कुणाची तरी बायको झाली.....
बायको सून म्हणून कर्तव्य निभावत होतीसच.....
तर वेळ आली आई व्हायची वेळ आली आई व्हायची....
तू नारायणी तू अष्टभुजा तूच तुझा परिवाराची रणरागिणी......
खेळणारी बागडणारी झाली आता मोठी .....
प्रत्येक क्षणी भूमिका बदलत गेल्या ती झाली आता आई तुलाच सगळ करायच आहे हेच सांगे तिला सगळे हेच सगळ्यांच्या ओठी.....
आई म्हणून जगताना तिला आईच थोडी व्हायचे होते.....
तिला तर सुन बायको या सगळ्यांचे कर्तव्य निभावायचे होते.....
यात तिला वेळ कुठे स्वत साठी जगायला.....
तिला ही वाटे निघाव बाहेर या मोकळ्या आकाशाखाली आपले स्वप्न शोधायला.....
तिला ही वाटे आपल्या जुन्या मैत्रिणीला भेटायला.....
या सगळ्यात तिला हेच बोलणे की काय करतेस घरीच तर असतेस ते तू नाही तर कोण करेल काम तूच करशील.....
अरे पण एक दिवस जर ती सुट्टी वर गेली तर तुम्हा सगळ्याच जीवनच तर थांबेल कारण मित्रा असे बोलून तू तिथे हरशील.....
नको तिला तुमचे धन द्रव्य नको तिला तुमची संपत्ती.....
तिला हवं थोड प्रेम थोडा तुमचा साथ थोडी प्रेमाची सिंपती.....
बोल थोड प्रेमाने मायेने फिरव प्रेमाचा हात.....
तिला ही वाटेल हवाहवा तुझा साथ.....
तुम्ही तिला बोलून देता टेन्शन त्यामुळे ती होती कुठल्या कुठल्या बिमारीची शिकार.....
कारण ती घेते या सगळ्यात मानसिक टेन्शन नसतो तिला त्यावेळेस मन मोकळ व्हायला आधार.....
म्हणून म्हणते सखी तूच बन तुझा आधार ......
घे हिसकावून स्वतःचा अधिकार.....
बन तू मजबूत तुझात आहे तितकी ताकद......
दाखव या समाजाला तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार तूच घडवू शकते स्वतःला कमजोर नाही तू हाच ठेव तुझा मक्सद.....
नको जावू जीव देण्याच्या आहारी......
खूप काही आहे ग तुझ्या माघारी .....
तूच सांभाळू शकते सगळ.....
तू नसलीस तर काही नाही जी सगळच झालं समज विस्कळीत मोकळ.....
हो मोकळी तू आता गेली ती दाबून राहायची वेळ.....
जग स्वतःसाठी आता तरी सखी काढ थोडा वेळ.....
                                         

  -सौ.स्नेहा प्रवीण नागतुरे 
(कु .स्नेहा अरुण नक्षणे)

जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा.....

मानकीमधील 'शो' अचानक रद्द करण्यात आला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची सौर्यगाथा सांगणारा चित्रपट शनिवारी मानकी गावातील नागरिकांना पाहता यावा यासाठी येथील 'मित्र परिवार' यांच्या तर्फे आज शनिवारी सायंकाळी 8 वा.मोफत पाहण्याचे आयोजन जि. प शाळेत केले असता 'शो' सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या काही वेळापूर्वीच काही कारणास्तव शो रद्द करण्यात आला. याबाबत आयोजकांनी, शो पाहता येणार नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'छावा' सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. मात्र, मानकी येथील आजचा आयोजित शो रद्द करण्यात आल्याने गावाकऱ्यात निरुत्साह जाणवतो आहे. 

आनंदाची बातमी! ‘छावा’ चित्रपट मानकी गावातील नागरिकांना मोफत पाहता येणार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला.या सिनेमात बॉलीवूड अभिनेता विकी कौशल यांनी प्रमुख भूमिका साकारली असून, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ‘छावा’ मध्ये महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकत आहे.

सध्या सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असून, अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान मानकी येथिल "मित्र परिवार" यांनी गावात मोफत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आज दि.8 मार्च रोजी सायंकाळी 8 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा मानकी येथे गावातील व परिसरातील नागरिकांना मोफत सिनेमा पाहता येणार आहे.

"मित्र परिवार" यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्रातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी; यासाठी छावा सिनेमा गावातील नागरिकांना मोफत दाखविण्याचा संकल्प केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपलं दैवत आहे. धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान देऊन एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.त्यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा हा प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे मानकी गावातील नागरिकांना छावा सिनेमा मोफत दाखविण्याचा प्रयत्न आहे.” अशी भावना "मित्र परिवार मानकी" यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री दर्शन भारती विद्यालयात 'जागतिक महिला दिन' संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील गोंडबुरांडा येथिल श्री दर्शन भारती विद्यालयातील सावित्री एकता मंच द्वारा दि.८ मार्च २०२५ शनिवार ला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल आष्टकर सर होते प्रमुख मार्गदर्शका म्हणून प्रतिभा तातेड (सामाजिक कार्यकर्ता व महिला पत्रकार) तर प्रमुख पाहुणे सोनाली जेनेकर, गोदावरी जोशी, संजय मोघे, दिलीप तेलंग, विलास मेश्राम हे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर पाहुण्याचा सत्कार समारंभ व सर्वांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मंचावरिल उपस्थितांनी व विद्यालयातील ज्ञानेश्वरी गेडाम, तनवी गमे व श्रावणी किनाके या विद्यार्थ्यांनीनी महिला दिनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साक्षी सपाट हिने केले प्रास्ताविक, प्रगती पारखी तर आभारप्रदर्शन श्रावणी किनाके हिने केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व शाळेतील नामदेव तोडासे (शिपाई) यांनी परिश्रम घेतले.

स्त्री आणि स्त्रीत्व....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

शनिवार, ८ मार्च २०२५ आज जागतिक महिला दिनाची थिम "त्वरीत करा" ही आहे. महिलांवरील शारीरिक अन्यायाविरुद्ध शिक्षा सुनावणी व अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी या धरतीवर ही थिम ठरवण्यात आलेली आहे. दोन दशकांपुर्वी लेकीची भृणुहत्या टाळा म्हणत खपणार्या शासनापुढे फारच कमी काळात महिला सुरक्षेचे गंभिर आव्हान उभे ठाकले आहे.पुर्वी लेक भृणुअवस्थेत पोटात व आता समाजात ,काळ कोणताही असला तरी स्त्री व तिचे स्त्रीत्व धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे हे नक्की. स्त्री देह पोसणे ,सुरक्षीत ठेवणे व त्यातील स्त्रीत्व जपणे हे हल्ली आव्हानच झाले आहे.ज्याप्रकारे अतिप्रमाणात रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खालावत चालला त्याचप्रमाणे स्त्री देहातील स्त्रीत्वही धोक्यात येत आहे.
 
सामाजिक,मानसिक, आर्थिक, वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांमुळे तरुण मुलींमधुन एक नवा व चुकीचा सुर जन्माला यायला लागला आहे.आम्हा मुलींत व मुलांत समानता आहे.तर आम्ही पुर्णतः मुलांसारखे अधिकार,वागणे बोलणे ठेवून जगणार म्हणत मुली मुलांसारखे जिन्स टिशर्ट,बाईक चालवणे, कोणत्याही प्रकारचे स्त्रीत्व दर्शक शृंगारिक दागिने न घालणे.मोठ्या डायलची मनगटी घड्याळे वापरणे , अर्वाच्य शिवराळ भाषा वापरणे, रात्रीबेरात्री बेधडकपणे बाहेर वावरणे ,डॅशिंग दिसावं ,म्हणजे कुणी पुरुष वाटेला जाणार नाही या भ्रमात जगत आहेत,.क्वचितदा पुरुषांकडुन एखाद्या वाईट अनुभव आलाच तर एकटीने आयुष्य काढायचा निर्णय घेणे.किंवा लग्नाप्रती निरसता बाळगणे.वगैरे वगैरे दुखावलेली स्त्री मानसिकता जन्माला येत आहे.

नवीन आयुष्य जन्माला चालणार्या मुलींच्या मनात स्वतः:घ्या आयुष्याप्रतीची ही नकारात्मकता समाजातील वातावरण कारणी तर आहेच, शिवाय मुलींची चुकीची जडणघडण ही तेवढीच जबाबदार आहे. नर,मादी असे भिन्न देह विधात्याने सृष्टीची रचना करण्याच्या हेतूनेच निर्माण केली आहे .मग आपण रचियेत्याच्या निर्मितीवर साशंक तर व्यक्त करत नाही ना? यावर मंथन व्हायला हवे. आणि मुलामुलींत समानताच ठेवायची आहे तर ती प्रेम ,अधिकार,मानसन्मान,यात असावी हे अपेक्षित आहे.मुलींनीच मुलांची बरोबरी का करावी ? मुलांनी मुलींची बरोबरी का करु नये? शाळा महाविद्यालयांत मुलींना मुलांच्या बरोबरीने न्याय देण्यासाठीचा उपाय म्हणून शर्ट पँट असा गणवेष असतो.प्रश्न जर बरोबरीचा आहे तर, मुलांना मुलींचा पेहराव का नसतो? इथे वैचारिक स्तब्धता येते.विधात्याची उलट चौकशी करणे असा हा मामला आहे.
 
जन्माला घातल्यानंतर मुलीला मुलीसारखे वाढवणे,तिच्यातील नैसर्गिक लज्जा,शृंगार,श्रध्दा,भक्ती या भावना न दडपता तिला खंबीरत्वाचे धडे देणे ही स्त्रीत्व जपताना काळाची गरज आहे..विरांगणा झाशीची राणी पुरुषी पराक्रम करताना पाठीशी मुलं बांधुन ममत्व जपते, राजमाता जिजाऊ शिवरायांना महाभारत,रामायणातील कथा सांगताना त्यांचा एक हात शिवरायांज्या पाठीवर तर दुसरा हात कमेरेतील समशेरीवर दिसतो.पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातात महादेवाची पिंड बघायला मिळते.यावरुन हे लक्षात येते पुरुषी क्षेत्रात भिमपराक्रम गाजवलेल्या या स्त्रीयांनी स्त्रीत्व कसोशीने जपलेले दिसतेय.हल्लीच्या मुलींना स्त्री देहाचा अभिमान वाटत नाही.स्त्रीत्व दर्शक मासिक स्त्राव हा मनोकायिक छळ वाटतो.यातुनच नैराश्य ग्रासित भाव उत्पन्न होतात.पुढे स्त्री शरीरात स्त्रवणारे प्रोजेस्टेराॅन,इस्ट्रोजन,यांचे असुंतलन होते.सतत पुरुषी हावभाव ,पेहराव,पुरुषी विचारधारा यामुळे स्त्री देहात पुरुषत्व दर्शक संप्रेरके स्त्रवायला लागतात.आणि स्त्रीत्व , प्रजननक्षमता ओसरते.आपण महादेवाच्या एका रुपाला अर्धनारीनटेश्वराच्या रुपात पाहतो.यात महादेवाच्या निम्म्या अंगात देवी पार्वती वास करते.प्रत्येक पुरुषात वत्सल माता असते तर प्रत्येक स्त्रीमध्ये उत्पत्ती,स्थिती आणि लयाची शक्ती ठेवणारा खंबीर,प्रसंगी विनाशकारी महादेव ही वसतो.फक्त या दोन्ही तत्वांची सरमिसळ न करता संतुलन गरजेचे आहे.हल्लीचे वाढते वंध्यत्व, प्रजजन अंगाचे कर्करोग,पाळीच्या समस्या, गर्भाशय निर्हरण शल्यक्रिया यांची गरज हे शरीरातील स्त्रीत्वावरील आघात आहे . स्त्रीदेहाची कर्तव्ये,भावनिक गरजा,श्रम,क्लम, श्रमपरिहार ह्या सगळ्या बाबी पुरुष देहापेक्षा कैकपटीने भिन्न असतात.हे समाजास कळणे गरजेचे आहे.
 
मुली शिकुन आर्थिक रित्या संपंन्न होत आहे.त्यांची सहचारी निवड निकष तात्विक आहे.जर हे निकष पुर्णत्वास जात नसतील तर त्या सरळ अविवाहीत आयुष्य जगण्यास तयार आहेत.किंवा करिअर व स्वातंत्र्य यात कौटुंबिक जबाबदाऱ्या नकोत म्हणून पुरुष व स्त्रीया एकत्रीत राहुन देहाच्या गरजा भागवताना दिसत आहे,.कुटुंबसंस्था ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.आर्थिक स्थिरतेनंतरही जेव्हा कधी तरी मानसस्थिरतेची गरज असते तेव्हा स्त्रीपुरूष दोघांनाही एकमेकांच्या आधाराची गरज असते. आत्मिक सुखाची अनुभुती देणार्या भारतीय संस्कृतीचे डोहाळे उगाच लागले नाहीत.
आयुर्वेदामध्ये " नास्ति मुलंविनौषधी"असे म्हटले आहे. पृथ्वीवरील उत्पन्न एखाद्या वनस्पतींचा काहीच उपयोग नाही अशी एकही वनस्पती नाही तर व्दिपाद, चतुष्पाद, किटक, पशुपक्षी यांतील मादी देह निर्मितीचा हेतूही तेवढाच खास आहे. बुद्धीजिवी मानवजातीने स्त्री देहाचा पर्यायाने निसर्गानिर्मितीचा खास आदर करावा,त्यास कसोशीने जपावे.हे स्त्री व पुरुष दोघांचेही कर्तव्य आहे.

-वैद्य सुवर्णा चरपे
सर्वोदय चौक, वणी