भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतिने तिव्र निदर्शने व आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : अदाणी समुहाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारप्रकरणी गौतम अदाणीवर कारवाई करा, मणीपुरमधील हिंसाचारप्रकरणी, मुख्यमंत्री विरेन सिंह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, वाढती महागाई व बेरोजगारीला आळा घाला, ईव्हीएम हटाव-लोकशाही बचाव या आणि अन्य मागण्यांना घेऊन आज 10 डिसेंबर "प्रोटेस्ट डे" म्हणुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याअनुषंगाने आज भाकपने मारेगाव तहसीलसमोर तिव्र निदर्शने करून मा.राष्ट्रपती यांचे नावे तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हा सहसचिव बंडु गोलर,तालुका सचिव विलास ढुमणे,धनराज अडबाले लता रामटेके,सुभाष पंधरे,विनोद ढोके,सुनिल आत्राम,कैलास आत्राम,रंजना टेकाम,संदीप टेकाम,शब्बिर खॉ पठाण,ईरफानभाई,दत्तु कोहळे यांचेसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

कामाच्या शोधात बेरोजगार,शेतकरी शेतमजूरांची भटकंती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या कापूस, सोयाबीन या नगदी पिकांवर अवलंबून असणा या शेतकरी व शेतमजूरांना शेती रिकामी झाल्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. सरसकट सोयाबीनची काढणी झाली असून कापसाची वेचणीही अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने मजुरवगार्ने आपला मोर्चा मोठ्या शहरांकडे वळविला आहे. दिग्रस तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी व शेतमजूर पुणे, मुंबई या महानगरात तर काही उपराजधानीत कामासाठी स्थलांतरित होतात. आपल्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून काही खेडेगावातील लोक आता पोटपाण्यासाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या बाबीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील जनतेला कामाच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा भगीरथ लोकप्रतिनिधी उदयास येईल का, असा सवाल निर्माण होत आहे. तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर  दरवर्षी स्थलांतरित होतात. अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागते. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर कुपरिचित आहे. त्यातच मारेगाव तालुक्याची ओळख आणखीनच आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून होत चालली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासन यंत्रणा लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर बेरोजगारांसाठी एम आय डी सी आणि येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असती तर या कुटुंबावर आपल्या तरुणांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली नसती. मात्र, वास्तव फार भयान असल्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मुंबई : महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे, असे सांगतानाच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पायाभूत सुविधांप्रमाणेच राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठीही स्वतंत्र वॉररूम सुरु करण्याचे निर्देश यावेळी दिले.

विधानभवन येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारच्या सहकार्याचा राज्याच्या प्रगतीसाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. यासाठी अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. याकरिता नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून व्यवस्था उभी करा.

एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच. ही वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची मुख्य सचिवांनी नव्याने रचना करावी. या धर्तीवर राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी पण दुसरी वॉररूम आता असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे. यासाठी प्रयत्न करता येतील. यात जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजेत. आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालविण्यात यावे. जिल्ह्यांच्या पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यांचे तातडीने दौरे सुरु करावेत. पालक सचिवांनी आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून देण्यावर भर द्यावा. वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. अर्थातच यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.

राज्य शासनाची सर्व संकेतस्थळ हे आरटीआय फ्रेंडली करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, 'इज ऑफ लिव्हिंग'वर सर्वाधिक भर द्या. राज्यभरातून नागरिक सर्वाधिक कोणत्या कारणासाठी आपल्याकडे येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर देण्यासाठीचे नियोजन केले जावे. यासाठी सहा-सहा महिन्याचे दोन टप्पे करून उद्दिष्ट गाठता येईल. यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येईल, त्यासाठी त्यांची एक समिती गठित करून अभ्यास अहवाल तयार करण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. त्यांचा थेट सचिवांशी संवाद व्हावा आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यावर भर देण्यात यावा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना त्यांच्या सेवेशी संबंधित जिल्ह्यात पदस्थापना दिल्या जाव्यात. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 

नागरिकांना सुविधा देण्यासाठी तसेच, प्रशासकीय कामांसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यासाठी प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करून तो सादर करावा, असे निर्देशही दिले.

निरागस बाळ 'अहेमान' कायमचा विसावला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : चंद्रपूर, नागपूर, हैद्राबाद व मुंबई असा उपचाराचा त्याचा प्रवास आज कायमचा थांबला.तब्बल अकरा महिने जगण्याचा संघर्ष येथे थिटा पडून क्रूर नियती जिंकली अन मारेगावचा गोंडस व निरागस बाळ अहेमान शेख बरकत (2.5) कायमचा विसावला. दीड वर्षाचा निरागस बाळ. आईच्या कुशीत चारचाकी वाहनात असतांना हे वाहन अपघातग्रस्त होत रस्त्याच्या कडेला जावून पडला असता बालकास गंभीर इजा झाली होती.

मागील जानेवारी महिन्यात शहरातील शेख बरकत कुटुंब अर्टीका वाहनाने चंद्रपूर कडे जात असतांना निंबाळा नजीक अपघात होवून शेख नवाज शेख मुजफ्फर हा जागीच ठार झाला होता तर पाच जन जखमी झाले होते. यात अहेमान बरकत शेख या दीड वर्षीय बालकाची मानेची नस तुटल्याने त्याचेवर शस्रक्रिया करण्यात आली. मुंबई, हैद्राबाद, नागपूर असा उपचाराचा प्रवास नियमित होता. गोंडस बाळ या अपघाताने तब्बल अकरा महिने निपचित होता.

मुंबई येथील उपचाराने केवळ लिक्विड वर त्याचे जगणे अवघड झाले होते. मध्यंतरी अहेमान याला मारेगाव येथे आणून नागपूर येथे हलविले मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी घरी नेण्याचा सल्ला दिला.अकरा महिन्याच्या जगण्याच्या संघर्ष थिटा पडून व क्रूर नियतीने थट्टा करीत अहेमान याची प्राणज्योत मालवून आज (8डिसें.) सकाळी जगण्याला पूर्णविराम मिळाला.

दीड वर्षाचा अहेमान याची जगण्याची झुंज थांबल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

माननीय विश्वासभाऊ नांदेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



आदरणीय साहेब,
आज आपला वाढदिवस.

“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!!!”

“तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि
दीर्घायुष्य लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना करतो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

शुभेच्छुक : अनिल उलमाले
संचालक :वैष्णवी इलेट्रिकल छत्रपती शिवाजी महाराज चौक,वणी