रस्ते बनले पार्किंग प्लेस ; युवासेनेची कारवाईची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट वित्तीय संस्थांकडे पार्किंगची व्यवस्था नाही, जवळपास सर्वच संस्था शहराच्या मुख्य रस्त्यालगत आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांचे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर पार्क करतात, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. परिणामी अशा वित्तीय संस्थांना चालवण्यास परवानगी देवू नये, असे युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शहरातील संस्थांचे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करून तासंतास संस्थांमध्ये घालवतात, त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होत आहे. सहकारी बँका, पतसंस्था आणि मल्टीस्टेट वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा देत नाहीत. रस्ते पार्किंग प्लेस बनल्याने याकडे संबंधित विभागाने या लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी युवासेने च्या वतीने करण्यात आली.

यावेळी सुरेश शेंडे, तेजस नागपुरे, आर्या राऊत, बादल येसेकर, रुद्राक्ष सिडाम, श्री चौधरी, चैतन्य लोडे, निकेश कडुकर, निरज घागी, श्री बदखल, मशिष मंदे यासह युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवरात्रीच्या दिवसांत त्रास वाढेल
नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहेत. त्यानंतर दिवाळी येत आहे. या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. नवरात्रीच्या दिवसात रस्त्यावर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नागरिकांना वाहनांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. यासाठी महापालिकेने संबंधित बँकेला कळवून पार्किंगची व्यवस्था करावी. तसेच ज्या संस्थांमध्ये पार्किंगची सुविधा नाही अशा संस्थांना परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वणीत अनुलोम मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अनुगामी लोकराज्य महाभियान अनुलोम भाग वणी च्या वतीने सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी येथील शेतकरी मंदिराच्या सभागृहात अनुलोम मित्र मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
या मेळाव्याला संबोधित करताना आ.बोदकुरवार यांनी म्हणाले की, अनुलोम संस्थेचे उद्देश म्हणजे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम अनुलोमच्या माध्यमांतून केले जाते. प्रगतशील समाजापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न अनुलोम करित असून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम अनुलोम मित्र करतो आहे,असेही त्यांनी सांगितलं. तर इतरही मान्यवरांनी अनुलोम मित्र परिवाराचं कौतुक केलं.

यावेळी अनुलोम चे विभाग प्रमुख गजानन शिंदे, सहविभाग प्रमुख प्रवीण पोहणे, उपविभाग प्रमुख सुनील दालवनकर,भाग जनसेवक वैभव सूर, भाग समन्वयक वैभव मेहता, तसेच वणी तालुक्यातील अनुलोम ची संपूर्ण टीम, वस्ती मित्र स्थान मित्र व अनुलोम मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन: अतिरिक्त बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी ; विद्यार्थ्यांसह प्रवाशांची होत आहे गैरसोय


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : अकोला, नागपूर, राळेगाव,चंद्रपूर यासह ग्रामीण भागात पुर्वी पासून चालु असलेली एस.टी. बससेवा महामंडळाने बस अभावी बंद केली. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी वणी आगार यांना एका निवेदनद्वारे केली आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारात बसेसचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे घुग्घूस-कोरपना-गडचांदूर व शिंदोला या परिसरातील ग्रामीण प्रवाशांची गैरसोय होत असून खासगी वाहणाकडून आर्थिक लूटही होत आहे. सदर बस फेऱ्या सुरु करावी, अशी मागणी नांदेकर यांनी केली. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्याना शाळा सुटल्यानंतर घरी जायला उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय तासंतास एसटी ची वाट पाहावी लागत आहे. याचा फायदा खासगी वाहने घेत असून मनमानी कारभार करतात ही गोष्ट सोमवारी माजी आमदार विश्वास नांदेकर यांना समजल्यानंतर त्यांनी बसस्थानकात जाऊन ई-बस रोखली. दरम्यान, आगार प्रमुखांशी चर्चा करून सर्व विद्यार्थ्यांना ई-बसमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकले.

वणी आगाराला जिल्ह्याधिकारी यांनी नवीन एसटी बस उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा शिवसेना विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरेल, असा ईशारा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी दिला आहे.

यावेळी तालुका प्रमुख प्रसाद ठाकरे, उप तालुका प्रमुख मोरोपंत पोतराजे, विजय ठाकरे, विजय गेडाम, नरेंद्र बखल, संदीप थेरे, अनिल आसुटकर, विशाल आवारी, राजू झाडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण डोहे, शिवराम चिडे, सुवास दरवेकर, अमोल चिकनकर, तेजस भगत, किशोर किनाके, हेमंत पत्रकार, महिला आघाडी संघटिका सीमा वारी, भाग्यश्री वैद्य, मनीषा कोंगरे, पौर्णिमा राजुरकर, स्वाती झाडे, सोनू डावरे, रंजना मोरे, निलिमा डाके, यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गळफास लावून नवविवाहितेची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : एका नवविवाहित सात महिन्याच्या गरोदर मातेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वणी तालुक्यातील परसोडा येथे घडली. 

पायल गौरव उरकुडे (वय 21) असे या गळफास घेतलेल्या विवाहीतेचे नाव आहे. दि.30 सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवाहितेने घरी कुणी नसतांना घराच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून जगाचा निरोप घेतला. कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर पायल ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

पायल हिचा एक वर्षापूर्वी गौरव उरकुडे या तरुणाशी प्रेम विवाह झाला होता. अशातच ती सात महिन्यांची गर्भवती राहिली. तिने ममतेचा गळा घोटून मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. घरी कुणी नसतांना विवाहित तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. 

सदर घटनेची माहिती मुकुटबन पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. गरोदरपणात असलेल्या तरुणीच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.

देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींचा मारेगाव येथे नारीशक्ती मेळावा संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : भगिनींनो घाबरण्याचं कारण नाही, कारण देवेंद्रजी उर्फ देवाभाऊ तुमच्या आमच्या पाठीशी आहेत, लाडकी बहीण योजना ही कायम असणार आहे, आज समाधान आहे सरकार आपलं आहे, अशा आणखीन योजना भविष्यात आपल्याला भाजप सरकार देतील,असे प्रतिपादन प्रदेश महामंत्री भाजप महिला मोर्चाच्या अलका आत्राम यांनी केले.

मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल मध्ये आयोजित नारीशक्ती मेळावा समारंभात त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मारेगाव तालुकाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा ता. अध्यक्ष शालिनी दारुण्डे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा नक्षीने,जिल्हा सचिव सुनीता पांढरे, संध्या अवताडे, किसान चे दिनकर पावडे, भाजपा चे नितीन रासेकर, ता.अध्यक्ष अविनाश लांबट, सुशीला भादीकर, संध्या लोडे, सुनीता नेपलवार, रजू कुरेशी, पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही आमिषास बळी न पडता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात अनेक योजना राबविण्यात येत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. गरिबी काय असते हे मला चांगल माहितीये, कारण गरिबीतून मी याठिकाणी आलेली आहे. महिलांना सन्मानजनक वागणूक दिली जात असेल तर फक्त आणि फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी मध्ये. भाजपा मध्ये महिलांना ताई म्हटलं जातं आणि इतर पक्षात वहिनी म्हणून बोललं जातं यावरून त्यांची मानसिकता काय आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपलं सरकार शेतकरी, विद्यार्थी, कामगार, गरोदर माता यांनाही योजना राबविण्यात येते. आज तुम्ही माझ्या माता भगिनीं ताई इतक्या मोठ्या संख्येने या मेळाव्यात आल्या याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रदेश महामंत्री अलका आत्राम यांनी सांगितले. विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी सरकार आणि मी तुमच्या पाठीशी आहे. कुठलंही कामे असुद्या एकदा या भावाला सांगा भेटा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या भावाला शुभेच्छा दिल्या व दहा वर्ष प्रेम केलं, आणि असेच पुढेही असुद्या असे गौरोद्गार त्यांनी काढले. तसेच जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी विरोधाकावर निशाणा साधत म्हणाले आमच्या माता बहिणी व मुलीवर जर कोणी अश्या वाईट जनरेने पाहील त्यांचे "ऐनकाउंटर" च होतील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा नक्षीने, प्रास्ताविक सुनीता पांढरे तर आभार प्रदर्शन शालिनी दारुण्डे यांनी केले. या प्रसंगी भाजपचे मंगेश देशपांडे, शंकर लालसरे, ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, प्रसाद ढवस, गणेश झाडे, सुनील देऊळकर, सूर्यभान ठोबरे, पवन ढवस, गंगाधर कुंटावार, राहुल राठोड, यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेविका, मदतनीस तसेच शेकडो महिला व भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या, यावेळी कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.