पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : राजमाता अहील्यादेवी होळकर यांनी त्याकाळी कुठल्याही सुखसुविधा नसतांनी 29 वर्ष आदर्शवत राज्यकारभार केला. परंतु आता आपल्याला एवढ्या सुखसुविधा असतांनाही आपण त्यांच्या एक कार्य सुध्दा व्यवस्थीत करून शकत नाही ही आजची स्थिती आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या. कार्यक्रमात दिप पुजन, रॅली, व्याख्यान, नवोदित अधिकारी कर्मचारी यांचा व 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभाचे आयोजन केले होते. या भरगच्च कार्यक्रमासाठी विचारपीठावर उपस्थित डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा सदस्य, क्रिष्णा खोपडे, आमदार पूर्व नागपूर, पांडुरंग मेहर भवानी मंदिर ट्रस्ट्री, राजकुमारी सेलोकर माजी नगरसेविका, मनीषाताई अतकरे माजी नगरसेविका,भगवती पाल अध्यक्ष, डॉ. विनोद बरडे ईत्यादी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी राजमाता अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर आदर्शांवर प्रकाश टाकत आताची परिस्थिती व अहील्यादेवी होळकर यांच्या काळातली परीस्थिती यातील फरक समजावून सांगितला. आपण निव्वळ जयंती साजरी करून जमणार नाही तर, त्यासाठी आपल्याला त्यांच्या आदर्शांवर काम करावे लागेल. त्यासाठी मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. सर्वांनी आपलीं जिवनशैलीत बदल केला पाहिजे,आरोग्यदायी जिवनशैलीचा उपयोग अवश्य केला पाहिजे. 

पुढे बोलताना सौ.बरडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, शाळां बांधल्या, पाणवटे बांधले, न्यायासाठी सुध्दा अहील्यादेवी एकनिष्ठ होत्या, धार्मिक पुजक होत्या, निव्वळ पूजाच करत बसल्या नाही तर कुशलतेने लढाया सुद्धा लढल्यात. अश्या आदर्श राजकारणी, समाजकारणी, रणरागिणी, विरांगणा, लढवैयी अश्या अनेक उपाध्या मिळालेल्या पुण्यश्लोक राजमाता,राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांचा आदर्श घेवुन आपण आपले आयुष्य सार्थकी लावावे,अशाही अधीसेवीका तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे ह्या म्हणाल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, महिला व पुरुष व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

आरटीईसंबधी न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रवेश थांबवा गटशिक्षणाधिकारी कोंडवार यांना दिले निवेदन

सह्याद्री चौफेर | संतोष कदम 

दिग्रस : आरटीई प्रवेशा संबंधित न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कॉन्व्हेंट शाळेतील प्रवेश प्रक्रिया रोखण्यात यावी, यासाठी गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार यांना दि. २४ जून रोजी मो. शहबाज मो. अकिल सह नागरिकांच्या स्वाक्षरीने निवेदन सादर केले. 

आरटीईद्वारे इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे विविध कॉन्व्हेंटमध्ये २५ टक्के अंतर्गत प्रवेश सुरू होते. त्याद्वारे खूप विद्याथ्र्यांची आजपर्यंत आश्चर्यकारकरित्या प्रगती झाली. जगातील काही निवडक देशांमध्ये अशा प्रकारची सुविधा सुरू आहे, हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु सध्या आरटीई प्रवेशाला जी अडचण आलेली आहे. त्याद्वारे शासनच स्वतः केलेल्या विकासात्मक कार्यास अडचण निर्माण करत आहे. सर्वसामान्यरित्या पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश शालेय सत्रात मे ते जूनच्या कालावधीमध्ये घेत असतात. परंतु आरटीई संबंधित निर्णयामुळे येत्या जुलै महिन्यात आरटीई प्रवेशा संबंधित निर्णय येणार, असे झाल्यास पालकांत संभ्रम निर्माण होणार आणि पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या काळजीत, ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना सुद्धा ते व्याजाने पैसे आणून किंवा काहीतरी आर्थीक घडी बसवून विविध कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेणार आणि अशा होतकरू विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व असे नुकसान होणार कारण आपल्या पाल्यांच्या काळजीतून ते काही वर्ष त्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवणार नंतर आर्थिक परिस्थिती विस्कटल्यामुळे त्या विद्याथ्र्यांचे भविष्यातील शिक्षण अपूर्ण राहण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

पंतप्रधान म्हणतात, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ऐकूनच आरटीई प्रवेशा संबंधित होत असलेल्या निर्णयाचा सखोल विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही सार्थ अपेक्षा, अन्यथा ही भारताच्या उज्वल भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मो. शहबाज मो. अकील, मो सोहेल मी अकील, शे.सोएब मो. अकील, मो- नाहीद अ. कादर, मो-शाहिद अ. रशिद, मो. फैजान म. इरफान, मो. हसनैन म. गाझी, अनमोल विलास कांबळे, शे. अकबर अ. मजीद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पहापळ येथील अपात्र, अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेततील लाभार्थ्यांची चौकशी करा - भैय्याजी कनाके यांची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पहापळ येथील शासकीय राशन कार्ड धारक लाभार्थीच्या अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थी डी वन चौकशीची मागणी भैय्याजी कनाके ग्रा. पं. सदस्य तथा पेसा समिती अध्यक्ष पहापळ यांनी तहसीलदार साहेब (पुरवठा विभाग) यांना करण्यात आली.
तालुक्यातील पंचायत समिती, मारेगाव अंतर्गत येणाऱ्या पहापळ येथील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन, शेतमजूर, आत्महत्याग्रस्त, विधवा,आणि अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्याला लाभ न पोहचवता आर्थिकदृष्टया व डी वन मध्ये समाविष्ट असणाऱ्या सक्षम लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत, असा आरोप ग्रा. पं सदस्य भैय्याजी कनाके यांनी थेट रास्त धान्य दुकानदार यांच्या वर केला असून निवेदनात असेही म्हटले की, कोणत्या निकषावर सधन शेतकरी यांना प्राधान्यक्रम तथा अंत्योदय रेशनकार्ड देण्यात आले तसेच अंत्योदय रेशन कार्डची फोड करून फोड केलेले अंत्योदय रेशन कार्ड यांना कोणत्या निकषावर कायम लाभ दिला जात आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी भैय्याजी कनाके सह ग्रामपंचायत सदश्यांनी केली आहे. 

गावातील पात्र लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेऊन अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असून याबाबत दिनांक 27/03/2024 ला ग्रामपंचायतच्या मासिक सभेच्या ठरवात पात्र लाभार्थ्यांची निवड करून अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद त्वरित करण्यात यावा व संबंधित राशन धान्य दुकानदारावर वरील नमूदप्रमाणे याची सखोल चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचेकडे निवेदनातून करण्यात आली आहे. 
निवेदनावर सह्या सौ.वर्षां चौधरी, सौ. वर्षां मांदाळे, श्रीमती शांताबाई ठाकरे, सौ माधुरी ठाकरे, सौ. चंदा शेंडे, सौ संध्या ठेंगणे, सौ संगीता गुरनुले, सौ कौशल्या येरकाडे, सौ. मंगला बोकडे, सौ. सुनीता झोडे,श्रीमती तारा बाई झोडे, सौ. कमल शेंडे, श्रीमती शांताबाई चहारे, श्रीमती सिंधूबाई आत्राम, श्रीमती हिराबाई पिंपळशेडे, सौ तानेबाई झोडे, श्री. प्रफुल शेंडे, श्री. लक्ष्मण शेंडे आदीं च्या आहेत.

शामादादा कोलाम संघटना यवतमाळच्या कार्यकर्त्यांची कळंब-दत्तापूर येथे बैठक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना यवतमाळ जिल्ह्याची बैठक दिनांक 24 ला कळंब तालुक्यातील दत्त निरंजन माहूर दत्तपूरात जिल्हा अध्यक्ष राहुल आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मा. धाबेकर साहेब, पंडीत घोटेकर, मा. राड्रॉ साहेब, मा.सुरेश मुंडाली, मा गुजाराम दादा, श्री. चांदेकर साहेब, कोलाम समाजाचे जेष्ठ परमपूज्य मोकशे महाराज, समाजसेवक हरिभाऊ रामपुरे, हभप लोणसावले महाराज (सालेभट्टी), श्री.अंकुश कासारकार, श्री. दिलीप मलांडे, श्री. ईश्वर दादा (शा. को. घा ता. अ) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या 1 ऑगस्ट 2024 ला शामा दादा कोलाम यांची जयंती निमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासह राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम शामदादा यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

सन 1990 पासून कोलाम समाजातील तीन व्यक्तींनी निवडणूक लढविली होती, त्यांना मिळालेली मते व समाज कुठे मागे पडतो आणि आता काय करायला पाहिजे याबाबत विस्तृत चर्चा झाली, समाज एकजूट असेल आणि आर्थिक भांडवल कमी असले तरी निवडणूक लढवता येत असा मौलिक मंत्र बैठकीत मांडण्यात आला. चांदेकर साहेब यांनी सन 1992 ला लढवलेली निवडणूक आणि त्यातील गोडकडू अनुभव विषद केली. उमेदवार कसा असावा यावर मार्गदर्शन करण्यात आले, जयंती निमित्ताने समाजाने एकत्रित राहण्याचे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप मलांडे तर आभार प्रदर्शन अंकुश गाडेकर यांनी मानले. या आयोजित बैठकीला मारेगाव,कळंब, राळेगाव व घाटंजी तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंब व राळेगाव तालुक्यातील माकपाच्या कार्यकर्त्यांची मेटिखेडा येथे बैठक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मेटीखेडा : कळंब व राळेगाव तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा ची संयुक्त बैठक दिनांक २३ ला मेटीखेडा येथील श्यामदादा कोलाम चावडीत कॉ. सदाशिव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम कॉ. शंकरराव दानव यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वनात राहणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक भूमिहीन नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भूमी सुधार कायदा करून जमीन देण्याचे ठरविले. परंतु भूमी सुधार झालाच नसल्याने आदिवासी व अन्य वनात राहणाऱ्या इतर पारंपरिक लोकांनी वन जमीन, रेव्हेन्यू जमीन, देवस्थान जमीन आदी जमिनीवर उदरनिर्वाहासाठी अतिक्रमण करून शासनाच्या कुठल्याही मदतीविना शेती वाहून देशाच्या अन्न उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टात ते शेती करून उपजीविका चालवीत आहेत. परिणामी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने व अखिल भारतीय किसान सभा देशभरातील ह्या भूमिहीन अतिक्रमित शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. सन २००४ साली डाव्या आघाडीचे ६१ खासदार निवडून आले होते. त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचा रेट्याने वनाधिकार कायदा २००६ करण्यात येऊन अंमलात आणला. ह्या कायद्यानुसार प्रत्येक वन जमीन कसनाऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून कम्युनिस्ट पक्ष सातत्याने संघर्ष करीत आहे. पुरावे गोळा करताना आदिवासी बांधवांना अडचण येते म्हणून त्यामध्ये २००८ व २०१२ मध्ये आंदोलनाचे मार्गातून सरकारला कायद्यात बदल करायला लावला. असे असताना आता अनेक भामटे ह्याचा फायदा घेत अतिक्रमण धारकांकडे जाऊन त्यांना जमिनीचे पट्टे मिळवून देतो म्हणून पैसे उकळण्याचे कार्य करीत आहेत. ह्यापासून अतिक्रमण धारकांनी सावध राहून अश्या लोकांना हाकलून लावावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.

या बैठकीला कळंब व राळेगाव तालुक्यातील अनेक प्रमुख स्त्री व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.