पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : राजमाता अहील्यादेवी होळकर यांनी त्याकाळी कुठल्याही सुखसुविधा नसतांनी 29 वर्ष आदर्शवत राज्यकारभार केला. परंतु आता आपल्याला एवढ्या सुखसुविधा असतांनाही आपण त्यांच्या एक कार्य सुध्दा व्यवस्थीत करून शकत नाही ही आजची स्थिती आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 वी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शनपर भाषणात त्या बोलत होत्या. कार्यक्रमात दिप पुजन, रॅली, व्याख्यान, नवोदित अधिकारी कर्मचारी यांचा व 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व समारंभाचे आयोजन केले होते. या भरगच्च कार्यक्रमासाठी विचारपीठावर उपस्थित डॉ. विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा सदस्य, क्रिष्णा खोपडे, आमदार पूर्व नागपूर, पांडुरंग मेहर भवानी मंदिर ट्रस्ट्री, राजकुमारी सेलोकर माजी नगरसेविका, मनीषाताई अतकरे माजी नगरसेविका,भगवती पाल अध्यक्ष, डॉ. विनोद बरडे ईत्यादी उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे यांनी राजमाता अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर आदर्शांवर प्रकाश टाकत आताची परिस्थिती व अहील्यादेवी होळकर यांच्या काळातली परीस्थिती यातील फरक समजावून सांगितला. आपण निव्वळ जयंती साजरी करून जमणार नाही तर, त्यासाठी आपल्याला त्यांच्या आदर्शांवर काम करावे लागेल. त्यासाठी मुलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे. सर्वांनी आपलीं जिवनशैलीत बदल केला पाहिजे,आरोग्यदायी जिवनशैलीचा उपयोग अवश्य केला पाहिजे. 

पुढे बोलताना सौ.बरडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, शाळां बांधल्या, पाणवटे बांधले, न्यायासाठी सुध्दा अहील्यादेवी एकनिष्ठ होत्या, धार्मिक पुजक होत्या, निव्वळ पूजाच करत बसल्या नाही तर कुशलतेने लढाया सुद्धा लढल्यात. अश्या आदर्श राजकारणी, समाजकारणी, रणरागिणी, विरांगणा, लढवैयी अश्या अनेक उपाध्या मिळालेल्या पुण्यश्लोक राजमाता,राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या उपस्थितांना शुभेच्छा देत त्यांचा आदर्श घेवुन आपण आपले आयुष्य सार्थकी लावावे,अशाही अधीसेवीका तथा सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे ह्या म्हणाल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, महिला व पुरुष व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.