ज्योती धावंजेवार यांचे निधन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रंगारीपुरा येथील ज्योती राजु धावंजेवार यांचे काल रात्री दिर्घ आजाराने रात्री 11.30 वाजता नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 57 वर्षाचे वय होते.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजुभाऊ धावंजेवार यांच्या त्या अर्धांगिनी होत. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांचे राहते घरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. ज्योती धावंजेवार यांच्या पाठीमागे पती, मुलगा, मुलगी, नातवंड अशा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे : उत्तम निलावाड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9.30 वाजता मारेगाव येथील तहसील कार्यालयात मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमास तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. ते म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन ही समाजातील मोठी समस्या आहे. व्यसनमुक्तीसाठी सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील. शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, डोल ताशासह मिरवणूक काढून ध्वजारोहण केले.

तहसील कार्यालयात ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रजासत्ताक दीन साजरा केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली. तहसीलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व गाणी सादर केली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयाचे कर्मचारी, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामस्थ व इतर मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

घरकुल लाभार्थी झिजवत आहे पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोंड बुरांडा येथील मोदी आवास घरकुल योजनेच्या घरकुल यादीत लाभार्थ्यांची नावं असून सुद्धा वारंवार वगळण्यात येत असल्याने त्रस्त झालेले लाभार्थी, घरकुल आज मिळेल, उद्या मिळेल म्हणून..अखेर ते पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी इतर समाज बांधव बहुसंख्येने राहतात. त्यातल्या त्यात घरकुल योजनेचे लाभार्थी बहुसंख्येने सर्वसामान्य गरजू भूमिहीन असून त्या लोकांना घर राहायला नाही, त्यामुळे काही लाभार्थी आपल्या हक्काच्या घरासाठी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारताहेत. परंतु त्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायत पदाधिकारी घरकुल यादीतून डावलत असल्यामुळे ते आपली कैफियत मांडून संबंधित कार्यालयातून आल्या पावली परत जात आहे.

विशेष म्हणजे घरकुल योजनेच्या यादीत त्यांची नावं दोनदा समाविष्ट करण्यात आले,अशी गोंड बुरांडा येथील लाभार्थी प्रमोद अतकर, राजू अतकर व पंढरी दगडे ह्यानी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले. गावात राजकारण आड येत असल्याचेही ते म्हणाले. याबाबत आम्ही रीतसर अर्ज पंचायत समिती कडे मागणी साठी करण्यात आला असून संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव मनमानी कारभार करित असल्याबाबत त्यांची तक्रार आहे. त्यामुळे निकषाप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ आम्हा गरजू लोकांना देण्यात यावा व चिरीमिरी करण्याऱ्यावर कडक शासन करावे अशी मागणी लाभार्थ्यांची आहे. 

वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर OBC, VJ, NT, SBC, चा एल्गार मोर्च्याच आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सरकारने OBC (VJ,NT, SBC) वी जातनिहाय
जनगणना करावी तसेच मराठा समाजाल सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व त्यांचा 'ओबीसी' मध्ये समावेश करण्यात येऊ नये या प्रमुख मागन्या व इतर 18 मागण्या घेऊन OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महिला समन्वय समिती, वणी-मारेगोव-झरी जि. यवतमाळ यांनी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर "एल्गार मोर्चा" चे दि. 11 फेब्रु 2024 ला दुपारी आयोजन करण्यात आलेले आहेत.

मागिल अनेक वर्षापासून मागणी होत असलेली ओबीसीची जात‌निहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने करावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना कररावी ही मागणी जातनिहाय जनगणना कृती समिली क्रीत आहेत. परंतू आत्तापर्यंत केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. तसेच मराठा समाजाच्या दबावामुळे सरकारकडून त्यांना ओबीसीत समावेश करण्याचा घाट घातल्या जात आहे. ही बाब ओ बी सी साठी अन्याय‌कारक असून आहे. त्याचबरोबर विद्याथ्र्यांचे प्रश्न, शेतकयांचे प्रश्न, सरकारी कर्मचारी यांचे विविध प्रश्स घेऊन ओबीसी जातनिहाय जनगणना कृती समितीकडून सरकारविरोधात एल्गार पुकारलेल आहेत. तरी OBC (VJ, NT, SBC) बलवेव ओबीसी तील विविध जातसमूहाने आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी, समाजाच्या भवितव्यासाठी लाखोंच्या संख्खेने मोर्च्यात मुलाबाळासहित सहकुटुंब सहपरिवार,. आप्तस्वकीय, नातेवाईक, मित्रमंडळीसह सहभागी व्हावे' असे आवाहन OBC (VJ, NT SBC) ज्ञातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष, निमंत्रक यांचेसह सर्व सभासदानी केलेले आहेत, शासकीय मैदान, वणी येथुन मोच्यान प्रारंभ करून समारोव सुद्धा शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे होणार आहेत. समारोप सुद्धा शासकीय मैदानात होणार आहे त्यानंतर सदर मोर्च्याच रुपांतर सभेत होऊन त्याठिकाणी सभेला डॉ. लक्ष्मण यादव (प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचावंत, दिल्ली) हे संबोधित करणार आहेत. सभेनंतर शिष्टमंडळ मा उप‌विभागीय अधिकारी, वणी योना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

शासकीय मैदानावरुन प्रारंभ करून पुरुष व महिला हयानी रांगेत संपूर्ण शहरात विविध घोषणाबाजी करित शांततेत मोच्या करावा मोर्च्या दरम्यान कोणीही हूल्लडबाजी, कोणत्याही सामाजिक संघटना वे पक्षा विरुद्ध शेरोबाजी करुन मोर्च्याला गालबोट लावू नये. हा मोर्चा कोणत्याही पक्ष व समाजाविरुद्ध नसून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आहे याची सर्व OBC CVT, NT, SBC) च्या समाज‌बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन एल्गार मोर्चा'च्या आयोजकांनी केलेले आहेत.


प्रजासत्ताकदिनी सागर जाधव यांचा गौरव


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील सामाजिक क्षेत्रात 'स्माईल फाउंडेशन' ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य असून सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे.
या सगळ्या कार्याची दखल महसूल प्रशासनानं घेतली. गणराज्यदिनानिमित्त शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांचासह त्यांच्या चमूचा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री गणेश किंद्रे, तहसीलदार, निखिल धुरदळ, ठाणेदार, अजित जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. सोबतच पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्यात. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.