८ ऑक्टोबरला कवितेच्या घराचा पुरस्कार वितरण सोहळा व राष्ट्रीय काव्यसंगिती

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कवितेसाठी वाहिलेल्या अभिनव अशा कवितेच्या घराचे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार कवींना प्रदान करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कवी सहभागी होणार आहेत. बापुरावजी पेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी कवितेचे घर, शेगांव ( बुद्रुक ), त. वरोरा, जि चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सकाळी ७.३० वाजता काव्यदिंडी निघणार आहे. या काव्यदिंडीत जि. प. प्राथमिक शाळा, शेगांव
नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव, संत काशिनाथ महाराज कन्या विद्यालय, शेगांव नॅशनल इंग्लिश स्कूल, शेगांव या शाळांचे विद्यार्थी सहभाग घेतील. सकाळी ९.०० वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड कवितेवर बोलू काही या सदरात विद्यार्थ्यांशी काव्यसंवाद साधणार आहेत. सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित असून सोहळ्याचे अध्यक्षस्थान विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व अंमळनेर येथे होणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, सुप्रसिद्ध कवी व मराठी भाषा विभागप्रमुख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील डॉ. पी. विठ्ठल, वर्ध्याचे प्रसिद्ध गझलकार विद्यानंद हाडके, अविनाश मेश्राम पोलिस उपनिरीक्षक, शेगांव उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात बापुरावजी पेटकर काव्यपुरस्कारप्राप्त मान्यवर कवी डॉ. अशोक इंगळे ( अकोला ), अे. के. शेख ( पनवेल ), एकनाथ आव्हाड (मुंबई ), रजनी राठी (अमरावती ), शृंखल खेमराज ( नागपूर ) हे सन्मानित होणार आहेत. तसेच बापुरावजी पेटकर काव्य सन्मानाचे मानकरी
आबासाहेब पाटील ( बेळगाव ), बाळासाहेब लबडे ( गुहागर ) अमोल देशमुख ( परभणी ), गीतेश शिंदे ( ठाणे ), हर्षदा सुंठणकर ( बेळगाव ), मंदाकिनी पाटील ( बदलापूर ), डॉ. अरविंद पाटील ( वर्धा ), प्रशांत खैरे ( गडचांदूर ), डॉ. प्रभाकर लोंढे ( गोंदिया ), नोमेश नारायण ( ब्रम्हपुरी ), वैभव भिवरकर ( कारंजा लाड ), शशिकांत हिंगोणेकर ( जळगाव ), मुकंद वेलेकर ( सोलापूर ), डॉ. श्रद्धा वाशिमकर ( नागपूर ), बापुरावजी पेटकर गझल सन्मानाचे मानकरी डॉ. अविनाश सांगोलेकर ( पुणे ), डॉ. मनोज सोनोने ( काटोल, नागपूर ), सुनंदा पाटील ( ठाणे ), रवींद्र सोनवणे ( पनवेल ), एजाज शेख ( अमरावती ), बापुरावजी पेटकर बालकाव्य सन्मानाचे मानकरी वसुधा वैद्य ( नागपूर ), मंजुषा दरवरे ( चंद्रपूर ), सुजित कदम ( पुणे ), सचिन बेंडभर ( पुणे ) यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय काव्यसंगितीचे दोन सत्र आयोजित असून दुपारी १. ३० वाजता पहिल्या कविसंमेलनाचे व गझल मुशायराचे अध्यक्षस्थान रमेश धनावडे (अलिबाग ) हे भुषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यंगचित्रकार जयवंत काकडे (वरोरा ), राजन लाखे ( अध्यक्ष, मसाप, पिंपरी चिंचवड ) वैभव धनावडे ( पेण, रायगड) उपस्थित राहतील. या संमेलनात निमंत्रित कवी म्हणून 
लालसिंग वैराट ( मुंबई ) शशिकांत पाटणकर ( बदलापूर , संजय पाटील ( ठाणे ), जीविता पाटील (अलिबाग), चित्ररेखा जाधव (नवी मुंबई ), स्मिता शिंदे (बदलापूर ), सीमा पाटील ( मुंबई ), अर्चना गोरे.( पुणे), किसन पेडणेकर ( सिंधुदुर्ग), वेदांती मुणनकर (सिंधुदुर्ग), सुरेश खैरे ( मुंबई), प्रांजली मोहिते (पुणे), स्मिता हर्डीकर ( नवीमुंबई ), कल्पना म्हापुस्कर ( मुंबई), अश्विनी बोलके (पनवेल ), मयूर पालकर (मुंबई ), सोनाली शेंडे ( मुंबई ) विनया सावंत (मुंबई), अश्विनी वराळे (पुणे) प्रतिक धनावडे सहभागी होतील. सूत्रसंचालन राहुल तवटे ( मुंबई ) हे करतील तर आभार धर्मराज लोडे ( शेगांव ) मानतील. दुपारी ३.०० वाजता दुसऱ्या कवीसंमेलन व गझल मुशायऱ्याचे अध्यक्षस्थान सुधीर चित्ते (मुंबई ) हे भुषवतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ आव्हाड, (मुंबई ) उपस्थित राहतील. निमंत्रित कवींमध्ये शालिक जिल्हेकर ( नागपूर ) संजय गोडघाटे ( नागपूर ), प्रशांत ढोले ( वर्धा ), प्रकाश बन्सोड ( आर्वी ), माणिक खोब्रागडे ( नागपूर ), प्रदीप देशमुख, (चंद्रपूर ) गीता रायपुरे (चंद्रपूर ), मालती सेमले ( गडचिरोली ), सुनिल बावणे ( चंद्रपूर ), कविता बेदरकर (वर्धा ), प्रिती वाडीभस्मे ( वर्धा ), रत्ना मनवरे ( यवतमाळ ), विजय वाटेकर, (चंद्रपूर ) , गोपाल शिरपुरकर, (चंद्रपूर ), ज्योती चन्ने ( वरोरा ) शेष देउरमले, (चंद्रपूर ) , निरज आत्राम ( आनंदवन ), पंडित लोंढे (वरोरा ), गजानन माद्युसवार ( गडचिरोली ), परमानंद तिराणिक ( आनंदवन ), गौतम राऊत (ब्रम्हपुरी ), सिमा वैद्य ( वरोरा ), आरती लोडे ( वरोरा ), छाया जांभुळे (ब्रम्हपुरी ), मंगेश गोवर्धन ( ब्रम्हपुरी ), रोशनी गणवीर ( नागपूर ), सुषमा कळमकर ( नागपूर ), प्रीतीबाला बोरकर ( नागपूर ), सरलाताई ठमके ( वरोरा ), रजनी संबोधी ( नागपूर ), भारती लखमापुरे ( वरोरा ), जितेश कायरकर ( वरोरा ), अभिजित ठमके ( वरोरा ), राजू मांडवकर ( शेगांव, खुर्द ) कविता सादर करतील. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर ( चंद्रपूर ) हे करतील. तर आभार प्रा. अर्चना लोडे मानतील. समारोपीय कार्यक्रम सायंकाळी ५.०० वाजता प्रा. भालचंद्र लोडे ( शेगांव ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दीपक लोणकर (वरोरा ), सुमेर शेख, अमोल दातारकर ( शेगांव ), नितीन वैद्य ( नागपूर ), डॉ. राकेश बांगडकर ( शेगांव ) उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन डॉ. संदीप भेले (बदलापूर ), तर आभार सूर्यकांत पाटील (वरोरा ) मानतील. या पुरस्कार वितरण सोहळ्याला व राष्ट्रीय काव्यसंगितीला मोठया संख्येने काव्यरसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, (कल्याण ), संकल्पनाकार किशोर पेटकर (नागपूर ) कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, (वर्धा ), कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले ( बदलापूर ), प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील, (वरोरा ) यांनी केले आहे.

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात अवयव दानाची घेतली शपथ

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 
       
वरोरा : दिनांक १आक्टोबर २०२३ ला रविवारी कटारिया सभागृहामध्ये जेष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघाचे वतीने घेण्यात आला.ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून रक्त तपासणी, ब्लडप्रेशर,आभा कार्ड, ह्या सेवा देण्यात आल्या. व्हिल चेअर सेवा देण्यात आली. यावेळी मंचावर श्री वि.गो.सोनेकर अध्यक्ष,सौ मीरा वानखेडे, मा.कि.मगरे, छोटूभाऊ, स्मिता सोनेकर, वंदना बरडे अधिसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर उपस्थित मान्यवर होते.
   
अधिसेविका वंदना बरडे सह. उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनी सुंदर आरोग्यदायी जीवनाची सकारात्मक शपथ दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शानाची सुरवात गूरुवंदनाने केली. त्यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या, आपले आरोग्य चांगले राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली. ते आपल्या मार्गदर्शनात आरोग्यदायी जीवनशैली विषयी माहिती दिली. अवयव दानाची माहीती देऊन अवयव दिनाविषयी गैरसमज दूर केले. अवयव दानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. यावेळी अवयव दान,रक्त दान, नेत्र दान इतर अवयव दान करण्याचे आव्हान करण्यात आले.

अवयव दान फार्म भरण्याची प्रक्रिया समजावून सांगितले.हे वर्ष त्रुणधान्य, भरड धान्य वर्ष आहे त्याचा अवलंब करावा. शेवटी जेष्ठ नागरिक संघाचे खूप कौतुक केले. आणि जेष्ठ नागरिकांना मान सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे याचे आव्हान केले. यावेळी अवयव दानाची शपथ सर्वांना देण्यात आली.

ऑटो अनियंत्रित होऊन घडला अपघात, एक ठार तर चार जखमी

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : पलटी झालेल्या ऑटो अपघातात एक जण ठार, तर चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज 4 ऑक्टोबर ला सकाळी 7.15 वाजता च्या सुमारास रांगना-नांदेपेरा मार्गावर घडली. मृतक गणपत धोंडू सातपुते (55) रा. सेलू असे ठार झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ऑटो चालक शंकर पारटकर हा सकाळी 7 वाजता नेहमी प्रमाणे ऑटोमध्ये प्रवासी घेऊन सेलूहून रांगना मार्गे वणीच्या प्रवासाला निघाला. दरम्यान, नांदेपेरा येथून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याने ऑटोत बसविले. त्यानंतर तो रांगना मार्गे वणीकडे ऑटो घेऊन निघाला. रांगना जवळ ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटला. यात गणपत सातपुते हा प्रवासी जागीच ठार झाला तर, वणी येथे महाविद्यालयीन शिक्षणाकरिता ऑटोने प्रवास करणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चारही विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. निष्काळजीपणे व भरधाव ऑटो चालविल्याने चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व हा अपघात घडला असे बोलल्या जात असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

उपसरपंच सुधाकर डाहुले यांचे निधन

सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर 

मार्डी : येथील द्वितीय नागरिक व ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुधाकर महादेव डाहुले (ता.वणी) यांचे आज बुधवारी (ता. ४) ला सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे ६४ वर्षचे होते. त्यांच्या निधनाने डाहुले परिवार आणि मार्डी पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन-जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज बुधवारी वणी येथील मोक्षधाम वर दुपारी ३.३० वा. होणार आहे. 

सचिव-सरपंचाची तक्रार मारेगाव गटविकास अधिकारी यांच्या दालनात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोलडोंगरगाव गटग्रामपंचायत कडून मनमानी कारभार व अन्य सदस्यांना डावलून कामे करित असल्याबाबत चे निवेदन तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय यांना दीडशे नागरिकांच्या स्वाक्षरीचे देण्यात आले.
सचिव-सरपंच हे कामे योग्यरित्या करीत नाहीत, शिवाय ग्रामपंचायतचे उपसरपंच व अन्य सदस्य यांना विश्वासात न घेता आपल्याच मताने मनमानी कारभार करित असल्याचे त्यांची तक्रार आहे. निवेदनातून त्यांची तक्रार अशी आहे की, 
आमदार फंडातील पाण्याची १०० कॅन लिलाव न करता परस्पर सरपंच सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विकल्या, उपसरपंच यांना शिक्का बनवण्यास टाळाटाळ केल्या जात आहे, आमदार फंडातील फिल्टर पाण्याची वसुली दर महिन्याला जमा वसुलीचा हिशोब देत नाही, जल मिशन योजनेंतर्गत कामे पाईप बोरवेल ट्यूबवेल न करता साधे बोरवेल केले, लाखापूर येथील जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीचे काम अपुरे, मात्र काम पूर्ण केल्याचे बिल काढण्यात आले, ग्रामसभेचा ठराव न घेता शबरी घरकुल योजनेमध्ये समाविष्ट यादी तयार न करता लाभार्थ्यांची परस्पर निवड करण्यात आली, व ग्रामसभेमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तलाठी, आरोग्य सेविका, कृषीसहाय्यक, महावितरण, कर्मचारी, शिक्षक वर्ग, पोलीस पाटील, या कर्मचाऱ्यांना हजर राहण्याबाबतच्या नोटीस दिल्या जात नाहीत. 
त्यामुळे गट ग्रामपंचायत सचिव-सरपंच व कर्मचारी यांनी गावातील कामे योग्यरीत्या न करता व सदस्यांना विचारात न घेता योग्यरित्या कामे करीत नसून ग्रामपंचायत हद्दीतील कामाची चौकशी करून संबंधितावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मडावी यांना व तहसीलदार निलावाड यांना देण्यात आले आहे.
यावेळी उपसरपंच शोभा बलकी, ग्रामपंचायत सदस्य आकाश भोसले, बेबीबाई पवार, अरुण बट्टे, यांचेसह योगीराज बलकी, पंकज बलकी, अमोल डावे, विनोद मेश्राम, स्थानिक बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व गावातील असंख्य महिला, पुरुष उपस्थित होते.