आयुष भारत डॉक्टर असो.जिल्हाध्यक्ष पदी डॉ. विवेक चौधरी यांची निवड

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

यवतमाळ : आयुष भारत डॉक्टर असो.च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी डॉ. विवेक चौधरी यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आमीर मुलाणी साहेब यांनी केली. ही नियुक्ती राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉ. शाहीर मुलाणी, राष्ट्रीय सचिव डॉ.आनंद भोसले,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास वाघमारे,राष्ट्रीय नॅचरोपॅथी सचिव डॉ. जलील शेख,राष्ट्रीय कार्याध्यक्षा डॉ.सुतार मॅडम,राष्ट्रीय अल्टरनेटिव्ह मेडिसिन अध्यक्ष डॉ. सुतार सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.मनीषा गुरव,राष्ट्रीय कायदेविषयक अध्यक्ष डॉ. गणेश पाटील,डॉ. फैयाज शेख,डॉ. तन्वीर देशमुख,डॉ. नामदेव मोरे,डॉ. राजेंद्रकुमार नवले,डॉ. स्वाती राजे मॅडम,डॉ. फैझान इनामदार,डॉ. सेंड्रा डिसोझा मॅडम,डॉ. शब्बीर पठाण,डॉ. फिरोझ पठाण,विदर्भ अध्यक्ष डॉ. विनोद देशमुख सर,तसेच राष्ट्रीय विधी सल्लागार कमिटी,राष्ट्रीय पद नियुक्ती समिती,राष्टीय फोर ऍक्शन कमिटी,तसेच सर्व कमिटी च्या सहमतीने नियुक्ती करण्यात आली आहे.संपूर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढाणारी देशातील सर्वांत मोठी आयुष भारत असोसिएशन /संघटना आहे.आयुष भारत संघटनेचे कार्य आणि उद्दिष्ट असे आहे आयुष भारत फिरते हॉस्पिटल तसेच औषधांवर संशोधन,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय शिक्षण सेवा पुरवीने,वैद्यकीय क्षेत्रात नौकरी,वैद्यकीय क्षेत्रात कार्यान्वित असणाऱ्या सर्व डॉक्टर साठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी,प्रत्येक जिह्यात वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणे, गरीब लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवीने,२४ तास मोफत ऍम्ब्युलन्स सेवा,डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्वरित मदत,डॉक्टरांना वैद्यकीय कायदेविषयक सल्ला-मदत देणे तसेच डाक्टरांच्या समस्या, डाक्टरांच्या विविध प्रश्नासाठी कार्य करणारी देशातील सर्वांत मोठी संस्था म्हणून "आयुष भारत असोसिएशन "म्हणून ओळखल्या जाते...
डॉ विवेक चौधरी यांची आयुष भारत डॉक्टर असो जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी अभिनंदन केले आहे.

मारेगाव: काँग्रेसची भारत जोडो यात्रेनंतर आता 'जनसंवाद यात्रा'

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत लक्ष वेधून घेतले होते. त्याच धर्तीवर प्रदेश काँग्रेसने 3 ते 11 सप्टेंबर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्याचे घोषित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. याच अनुषंगाने मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र पा ठाकरे यांनी आयोजन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने वणी विधानसभेचे समन्व्यक आशिष खुलसंगे, सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, घनश्याम पावडे, रविंद्र धानोरकर, यादव पांडे हे विचारपीठावर होते. 

महाराष्ट्र प्रदेश कमिटी च्या वतीने आयोजन केलेल्या यात्रेत मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होणे अनिवार्य असल्याचे त्या अनुषंगाने काल सोमवारला एक सभा आयोजित करण्यात आली होती. विभागीय समन्वयकांनी या सभेला उपस्थिती दर्शविली, मात्र स्थानिक काही नेत्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने पुन्हा गट बाजीचा विषय राजकीय वर्तुळातून समोर आला. 

पक्षाचे नेते राहुल गांधी पक्षाची मोट बांधण्यात रात्रंदिवस एक करत आहे. मात्र स्थानिक गट बाजीने सहभागी पदाधिकारीच्या नाराजीने पक्षाला धुळीस मिळविले जात आहे. अशी सामान्य कार्यकर्त्या मध्ये चर्चा आहे. मात्र पक्ष श्रेष्टीने दिलेल्या आदेश सर्वांनाच पाळणे अनिवार्य असून त्याचे पालन होते की, नाही हे पाहणं या निमित्ताने औचित्याचे असणार आहे. पदयात्री आरंभ ते समारोपपर्यंत यात्रेत सहभागी सर्व हेवेदावे विसरून हजर असतील. असे तालुका कमिटी कडूनच निर्विवाद अपेक्षा आहे.

यावेळी आकाश बदकी, गंगाधर ठावरी, सय्यद समिर, आनंद मसराम, अंकुश माफूर, मारोती सोमलकर यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोषण आहार सप्ताहामध्ये सहभाग नोंदविण्याचे अधिक्षिका बरडे यांचे आवाहन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका, आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधीसेविका वंदना बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा या नं. ९९२२०१३२४३ संपर्क करावा. या कार्यक्रमात डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन, अधीसेविका वंदना बरडे, आहारतज्ज्ञ गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे, आवाहन आयोजिका वंदना बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे.

...तर तालुका उपाध्यक्ष पदी उदय खिरटकर यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुकाच्या मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी चोपण येथील युवा कार्यकर्ते उदय खिरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निवडीबद्दल उदय खिरटकर यांचे अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मान्यतेने उदय खिरटकर यांची नियुक्ती पक्ष नेते राजू उंबरकर यांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढील कार्यात जनतेच्या न्याय हक्कासाठी सैदव लढण्याची तप्तपरता दाखवून सक्रिय राहावे असे, मत नियुक्ती पत्र देतांना उंबरकरांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा सर्व टीम च्या वतीने देण्यात आल्या. आमच्या प्रतिनिधीने नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर यांच्याशी संवाद साधला ते म्हणाले की, पक्ष स्थापनेपासून मी पक्षात आहे, पक्षाची धोरण, आदेश मी एकनिष्ठाने पाळली. सोबत सर्वसामान्य जनतेचे कार्य करित असल्यामुळे, माझ्या पक्ष मित्र परिवाराकडून यासाठी खूप मोठी साथ मिळाली, त्याचे चीज झाले. विशेषतः आमचे लाडके नेते राजू भाऊंचे खूप खूप आभार.. त्यांनी मला उपाध्यक्ष पदाची ही जबाबदारी दिली. तसेच सर्वांचे आपल्या माध्यमातून धन्यवाद, आभार मानतो. 
यावेळी धनंजय त्रंबके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, माजी तालुका अध्यक्ष अनंताभाऊ जुमडे, मारेगाव नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते.


सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार; अखेर शिक्षक भरतीची तारीख फायनल!


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली असून उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सहा वर्षांच्या भरतीची प्रतीक्षा आता संपणार असून ५ सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे 'पवित्र' पोर्टल उघडले जाणार आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये जवळपास ६२ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील ५० टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावरून भरली जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे. 
अशी होणार प्रोसेस...
◆ सुरवातीला प्रोफाईल तयार करून घ्यावे लागेल. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. 
◆ दुसरीकडे खासगी अनुदानित संस्थांना रिक्तपदांची जाहिरात 'पवित्र'वर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार त्या खासगी संस्थेत पाठविले जातील. त्यांची निवड मुलाखतीतून होणार आहे.

आता तातडीने बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली जात आहे. पाच-सहा दिवसांत ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टल सुरू होईल..
अंदाजे २३ हजार जागांची भरती
राज्यात मागे २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली होती, त्यानंतर टीईटी, टेट होऊनही भरती झाली नाही. विद्यमान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षकांअभावी हाल होवू नये या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानुसार युद्धपातळीवर कार्यवाही सुरु आहे. नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: २३ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्तपदांचाही समावेश आहे.