मारेगाव: काँग्रेसची भारत जोडो यात्रेनंतर आता 'जनसंवाद यात्रा'

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत लक्ष वेधून घेतले होते. त्याच धर्तीवर प्रदेश काँग्रेसने 3 ते 11 सप्टेंबर दरम्यान जनसंवाद पदयात्रा काढण्याचे घोषित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यात्रेचे नियोजन केले आहे. याच अनुषंगाने मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र पा ठाकरे यांनी आयोजन विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने वणी विधानसभेचे समन्व्यक आशिष खुलसंगे, सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, घनश्याम पावडे, रविंद्र धानोरकर, यादव पांडे हे विचारपीठावर होते. 

महाराष्ट्र प्रदेश कमिटी च्या वतीने आयोजन केलेल्या यात्रेत मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी होणे अनिवार्य असल्याचे त्या अनुषंगाने काल सोमवारला एक सभा आयोजित करण्यात आली होती. विभागीय समन्वयकांनी या सभेला उपस्थिती दर्शविली, मात्र स्थानिक काही नेत्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने पुन्हा गट बाजीचा विषय राजकीय वर्तुळातून समोर आला. 

पक्षाचे नेते राहुल गांधी पक्षाची मोट बांधण्यात रात्रंदिवस एक करत आहे. मात्र स्थानिक गट बाजीने सहभागी पदाधिकारीच्या नाराजीने पक्षाला धुळीस मिळविले जात आहे. अशी सामान्य कार्यकर्त्या मध्ये चर्चा आहे. मात्र पक्ष श्रेष्टीने दिलेल्या आदेश सर्वांनाच पाळणे अनिवार्य असून त्याचे पालन होते की, नाही हे पाहणं या निमित्ताने औचित्याचे असणार आहे. पदयात्री आरंभ ते समारोपपर्यंत यात्रेत सहभागी सर्व हेवेदावे विसरून हजर असतील. असे तालुका कमिटी कडूनच निर्विवाद अपेक्षा आहे.

यावेळी आकाश बदकी, गंगाधर ठावरी, सय्यद समिर, आनंद मसराम, अंकुश माफूर, मारोती सोमलकर यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.