शिवसेनेत इनकमिंग सुरूच...वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक युवकांचा शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रवेश


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख तसेच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन वरोरा तालुक्यातील विविध गावातील युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.

पूर्व विदर्भ महीला सघंटीका तथा प्रवक्ता सौ. शिल्पाताई बोडखे, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे, युवासेना पूर्व विदर्भ सचीव निलेश बेलखेडे यांचे मार्गदर्शनात तथा वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या कार्यप्रणालीने आकर्षित होवून त्यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत या तरुणांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.

याप्रसंगी तालुक्यातील वंधली ग्रामपंचायत सदस्य सागर संजय भोयर, मंगेश दिलीपराव  कुंडलकर, नितेश नालवटकर, वैभव शंकरराव ठावरी, मयुर भास्करराव महल्ले, हरिभाऊ पांडुरंगजी बुरघाटे, चंद्रकांत दिलीपराव कुंडलकर, अरुण जनार्धनराव ठाकरे, मंगेश अंनतराव शास्त्रकार, पवन बबनराव चौधरी, अंकित अशोकरराव झुंझुरकर, गौरव शंकरराव मेश्राम, सुरज गणेशराव फुनकर, गोमेश वसंतराव कन्नाके, रोकेश मोहनराव सलाम, श्रीधर निवृत्तीजी पिसाळकर, विजय लोडबाजी क्षिरसागर, बबली बाबाराव वाघमारे, सुभाष भैय्याजी ठाकरे, पंकज विठ्ठलराव चौधरी, शंकर रामभाऊ झाडे, मानस तुळशिराम ठावरी, विशाल अरुणराव भोयर, प्रज्वल दिवाकर बुरघाटे, वैभव अरुण भोयर आदींनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.
यावेळी रविंद्र शिंदे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करा, असा शिवसेनेचा मूलमंत्र युवकांना दिला. जिथे आपत्ती, समस्या व गरज असते, तिथे शिवसैनिकांनी जनसेवेकरीता तत्पर रहावे, अशा सूचना केल्या. या क्षेत्रात शिवसेनेच्या कार्यपध्दतीने व युवकांच्या साथीने झंझावात तयार करू असे रविंद्र शिंदे म्हणाले.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, विधानसभा उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, उपतालुका प्रमुख खेमराज कुरेकार, विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले, शिवसेना शहर प्रमुख अरुण महल्ले, वरोरा शहर संघटीका सरला मालोकर, जिल्हा युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर, ओंकेश्वर टोंगे, अभिजीत कुडे, निखील मांडवकर, युवासेना भद्रावती तालुका अध्यक्ष राहुल मालेकर, प्रशांत कारेकर, रोहीत वाभिटकर, संतोष माडेकर, गोपाल सातपुते व पदाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

वरोरा-भद्रावती शिवसेना (उबाठा) तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.

शिक्षण स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते- विजय चोरडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. शिक्षणाचा स्तर सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढवतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे विद्यार्थ्यानो शिका आणि मोठे व्हा, असे प्रतिपादन वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी स्थानिक शेतकरी सुविधा केन्द्र मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे तर, उद्घाटक म्हणून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया उपस्थित होते. तसेच सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव न्यायालयाचे न्यायधीश निलेश वासाडे, मारेगाव पंसचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, वनपरीक्षेत्राधिकारी शंकर हटकर, नायब तहसीलदार ओसिन मडकाम, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, महिला व बाल कल्याणचे विस्तार अधिकारी दिपक कळमकर, ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे, स्वागताध्यक्ष तथा पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विशेष कार्य करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी तर संचालन स्नेहलता चुंबळे यांनी केले. आभार आयोजक प्रतिभा तातेड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल कुमरे, पंकज साठे, बेबी आत्राम, मनीषा मोहुर्ले, गणेश तातेड, कवडू मोहुर्ले, आदेश तातेड, पंकज नेहारे आदींनी अथक परिश्रम घेतले.


वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्तनपान सप्ताहाचा दुसरा दिवस अशा प्रकारे पार पडला

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : उपजिल्हा वरोरा रुग्णालययाच्या वतीने 'स्तनपान सप्ताह' सुरु आहेत. सप्ताहाचा दूसरा दिवशी बाळंतपणासाठी भरती माता व बाळंतपण झालेल्या माता यांच्यासाठी आरोग्य शिक्षण आणि स्तनपान विषयींचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. खूजे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसेविका वंदना बरडे यांनी आयोजित केला.
आज बुधवार २ ऑगस्ट २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात बायकांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना स्तनपान विषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले. दरम्यान, रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या विषयावरती आरोग्याचे मार्गदर्शन केले. 
यामध्ये सप्ताहात सहभागी झालेल्या आरोग्य कर्मचारी वंदना बरडे (सहाय्यक अधिसेविका) यांनी स्तनपान देतानाच्या पोझिशन आणि बाळासोबत संवाद कसा साधावा त्या बद्दल माहिती दिली. संगीता नकले (परिसेविका) यांनी मातेच्या पूरक आहाराविषयी मार्गदर्शन केले. प्रियांका दांडेकर (अधिपरीचारिका) यांनी स्तनपान विषयी संपूर्ण माहिती दिली. अंकिता टोंगे (अधिपरीचरिका) यांनी ६ महिन्यांनंतर बाळाला पूरक आहाराबद्दल समजावून सांगितले.
अश्विनी बागडे (अधिपरीचारिका) यांनी स्तनपान चे फायदे काय याबाबत सांगितले. ढोक मॅडम (आहारतज्ज्ञ) यांनी पूरक आहारामध्ये काय काय द्यावे आणि काय देऊ नये याबद्दल याचे माहिती दिली. मुक्ता मुंडे (अधिपरीचारिका) यांनी कांगारू मदर केअर बद्दल सविस्तर माहिती दिली.तर वंदना बुरेवार यांनी कांगारू मदर केअर विषयी प्रात्यक्षिक करून दाखविले. 

अवैद्य मटका, जुगार व गोवंश तस्करी विरोधात भारतीय जनता पार्टीचा एल्गार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज 3 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी च्या वतीने मारेगाव तालुक्यातील अवैध सट्टा मटका व्यवसाय बंद करा,या मागण्यासाठी येथील पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. यावेळी निवेदन देताना मारेगांव तालुक्याचे सर्व पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. 

सद्य स्थितीत तालुक्यात अवैद्य धंद्याला उत आलेला असून या अवैद्य धंदेवाल्याची अरेरावी सुरु आहे. मारेगांव, कुंभा, मार्डी, नवरगांव व पिसगांव इत्यादी ठिकाणी अवैद्य वरली मटका व्यवसाय जोमात सुरु आहे, त्याचसोबत मारेगांव शहरात ठिकठिकाणी अवैद्य जुगार सुरु आहे. तसेच मारेगांव तालुक्यातुन रात्री बेरात्री लाखो रुपयाची लपुन छपुन गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे सर्व प्रकार तात्काळ बंद करावी,अशी मागणी निवेदनातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस (महा. राज्य) यांना करण्यात आली आहे. 
सततच्या पावसामुळे पहीलेच शेतकरी व शेतमजुर आर्थीक विवंचनेत असुन, त्यात तालुक्यात हे अवैद्य धंदे सुरु असल्यामुळे नागरिक भरकटल्या जात आहे. त्यामुळे सर्व ठिकाणचे अवैद्य वरली मटका, जुगार, व गोवंश तस्करीला लगाम, येत्या 7 दिवसाच्या आत कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल. व याची सर्वस्वी आपणावर राहील असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. 

भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चिकटे, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, युवामोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकार, संचालक अविनाश लांबट, जेष्ठ नेते शशीकांत आंबटकर, तालुका सरचिटणीस पवन ढवस, तालुका सरचिटणीस आनंद पचारे, युवामोर्चा जिल्हा सचिव प्रसाद ढवस, युवामोर्चा शहर सरचिटणीस रवि टोंगे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष गणेश झाडे, भाजपा शहर उपाध्यक्ष वत्तु लाडसे, युवामोर्चा शहर सरचिटणीस सुहास वरारकर,
युवामोर्चा शहर उपाध्यक्ष दुष्यंत निकम,भा.ज.पा. ता. उपाध्यक्ष विजय खिरटकर, किसान आघाडी लीलाधर काळे, मारोती तुराणकर, ज्ञानेश्वर सामनकर, शेखर चिंचुलकर,राजु मिलमीले, विनोद ठावरी, मिलेश चौधरी, प्रविण दातारकर, चंद्रकांत थोबे, भाऊराव शेळके, प्रवीण दातारकर,सचिन दावारकर, जगदीश ठेंगणे, आदर्श संगार यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 


मच्छिन्द्रा ग्रामपंचायतला पडला विसर, रोगराई नियंत्रण फवारणी वर दुर्लक्ष

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतला विसर पडल्याचे निदर्शनास येत असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील किरकोळ समस्या सोडवण्यात पदाधिकारी अपयशी ठरत आहे. कोणाचा कोणालाही ताळमेळ दिसून येत नसून आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या पावसाळा सुरु आहे, सतत पाऊस पडत असतांना रोगराई डोकं वर काढत आहे. त्यामुळं गावात आरोग्याच्या दृष्टीने डास नियंत्रण औषधं फवारणी करणं आवश्यक झाले असून सुद्धा याकडे सरपंच दुर्लक्ष करित असल्याचे बोलल्या जात आहे. तालुका प्रशासन ऍक्शन मोड वर आहे. मात्र, स्थानिक मच्छिन्द्रा येथील पदाधिकारी कधी ऍक्शन मोड वर येतात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसापासुन संपूर्ण तालुक्यात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ सुरू आहे. शहरात अनेक वार्डात सध्या डोळ्याची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. डोळ्याचा विषाणु ससंर्गजन्य हा सौम्य प्रकारचा ससंर्ग असला तरी देखील याबाबत आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.डोळे येण्याची परिस्थिती ग्रामीण भागातही दिसून येत असल्याने गावात रोगराई नियंत्रण औषधं फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आरोग्यच्या दृष्टीने तात्काळ डास व रोगराई नियंत्रण औषधं फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.