शिक्षण स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करते- विजय चोरडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. शिक्षणाचा स्तर सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढवतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे विद्यार्थ्यानो शिका आणि मोठे व्हा, असे प्रतिपादन वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी स्थानिक शेतकरी सुविधा केन्द्र मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

सावित्रीबाई फुले गुणगौरव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे तर, उद्घाटक म्हणून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया उपस्थित होते. तसेच सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मारेगाव न्यायालयाचे न्यायधीश निलेश वासाडे, मारेगाव पंसचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, वनपरीक्षेत्राधिकारी शंकर हटकर, नायब तहसीलदार ओसिन मडकाम, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, महिला व बाल कल्याणचे विस्तार अधिकारी दिपक कळमकर, ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे, स्वागताध्यक्ष तथा पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी कनाके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विशेष कार्य करणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी तर संचालन स्नेहलता चुंबळे यांनी केले. आभार आयोजक प्रतिभा तातेड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल कुमरे, पंकज साठे, बेबी आत्राम, मनीषा मोहुर्ले, गणेश तातेड, कवडू मोहुर्ले, आदेश तातेड, पंकज नेहारे आदींनी अथक परिश्रम घेतले.