सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
सद्य स्थितीत तालुक्यात अवैद्य धंद्याला उत आलेला असून या अवैद्य धंदेवाल्याची अरेरावी सुरु आहे. मारेगांव, कुंभा, मार्डी, नवरगांव व पिसगांव इत्यादी ठिकाणी अवैद्य वरली मटका व्यवसाय जोमात सुरु आहे, त्याचसोबत मारेगांव शहरात ठिकठिकाणी अवैद्य जुगार सुरु आहे. तसेच मारेगांव तालुक्यातुन रात्री बेरात्री लाखो रुपयाची लपुन छपुन गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे सर्व प्रकार तात्काळ बंद करावी,अशी मागणी निवेदनातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस (महा. राज्य) यांना करण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे पहीलेच शेतकरी व शेतमजुर आर्थीक विवंचनेत असुन, त्यात तालुक्यात हे अवैद्य धंदे सुरु असल्यामुळे नागरिक भरकटल्या जात आहे. त्यामुळे सर्व ठिकाणचे अवैद्य वरली मटका, जुगार, व गोवंश तस्करीला लगाम, येत्या 7 दिवसाच्या आत कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल. व याची सर्वस्वी आपणावर राहील असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.
भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चिकटे, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, युवामोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकार, संचालक अविनाश लांबट, जेष्ठ नेते शशीकांत आंबटकर, तालुका सरचिटणीस पवन ढवस, तालुका सरचिटणीस आनंद पचारे, युवामोर्चा जिल्हा सचिव प्रसाद ढवस, युवामोर्चा शहर सरचिटणीस रवि टोंगे, युवामोर्चा तालुका अध्यक्ष गणेश झाडे, भाजपा शहर उपाध्यक्ष वत्तु लाडसे, युवामोर्चा शहर सरचिटणीस सुहास वरारकर,
युवामोर्चा शहर उपाध्यक्ष दुष्यंत निकम,भा.ज.पा. ता. उपाध्यक्ष विजय खिरटकर, किसान आघाडी लीलाधर काळे, मारोती तुराणकर, ज्ञानेश्वर सामनकर, शेखर चिंचुलकर,राजु मिलमीले, विनोद ठावरी, मिलेश चौधरी, प्रविण दातारकर, चंद्रकांत थोबे, भाऊराव शेळके, प्रवीण दातारकर,सचिन दावारकर, जगदीश ठेंगणे, आदर्श संगार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.