विद्यार्थांनी हिच चिकाटी कायम ठेऊन प्रशासकीय सेवा करावी - भैय्याजी कनाके


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत आज चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आपण सत्कारास मान मिळाला व आपल्या आई वडिलांना आणि आपल्या शाळेचा व गुरू जनांचा मान उंचावला तोच कायम ठेवण्यासाठी तुम्ही प्रशासकीय सेवेत आपली उपलब्धी, करावी.
असे आपले मत मांडताना विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी बोलत होते.

विशेष अतिथी म्हणून मारेगांव दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मा.निलेश,वासाडे होते.अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे होते तर या सोहळ्याचे उदघाटक म्हणून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

शेतकरी सुविधा केंद्रात पार पडलेल्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मारेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी,मारेगांव वनपरिक्षेत्राधिकारी शंकर हटकर, नायब तहसिलदार ओसिन मडकाम, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी दिपक कळमकर, जेष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे उपस्थित होते.
यामध्ये विशेष कार्यकरणाऱ्याचाही गौरव करण्यात आला.
यामध्ये पत्रकार माणिक कांबळे, सरपंच तुळशीराम कुमरे पोलिस पाटील मुकींदा बतखल, तलाठी राजु डवरे, ग्रामसेवक जयंत फुलझेले, वनरक्षक प्रेमीला सिडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे,वेगांव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रश्मी आडे,पहापळ येथिल मुख्याध्यापक नत्थुजी चौधरी, अंगणवाडी सेविका आशा खामनकर, कुमार कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे संचालक राजेश घुमे, संगणक मार्गदर्शक अभिषेक कनाके, युवा उद्योजक भगत (घर संसार), इत्यादींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी केले, सुत्रसंचालन,सौ.स्नेहलता, चुंबने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा तातेड यांनी केले. या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कुमारअमोल कुमरे,पंकज साठे,बेबी आत्राम, मनिषा मोहुर्ले, गणेश तातेड,कवडू मोहुर्ले,आदेश तातेड,पंकज नेहारे,आदिनी अथक परिश्रम घेतले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना आज अभिवादन केले.

या कार्यक्रमांसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किन्नाके,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. खूजे, वैद्यकीय अधीकारी डॉ. विरूळकर, अधिसेविका वंदना बरडे, परिसेविका श्रीमती कापटे, श्रीमती पुसनाके, श्रीमती कोडापे, आहारतज्ज्ञ श्रीमती गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार,  श्री येडे यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वरोरा: उपजिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताहाचे उत्स्फूर्तपणे उद्घाटन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : १ ऑगस्ट २०२३ रोजी ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या वर्षांची थिम "स्तनपानाचे सक्षमीकरण नोकरदार पालकांसाठी एक बदल" हे आहे.

या उद्घाटनाला मा.डॉ. प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. लांबट स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. हरियाना बालरोग तज्ज्ञ, श्री. अलंकार मरसकोल्हे बाल विकास प्रकल्प अधिकारी, अधीसेविका वंदना बरडे, ईनरव्हील क्लब अध्यक्ष वैशाली पाचोरे, ईनरव्हील माजी अध्यक्ष निलिमा गुंडावार, प्रामुख्याने होते.
या प्रसंगी सरस्वती मातेचे पुजन करून माल्यार्पन करून दिपप्रज्वलन मान्यवरांनी हस्ते करण्यात आले. सर्व मान्यवरांनी स्तनपान विषयीं आपले मार्गदर्शन केले. स्तनपानात कुटुंबाचा सहभाग खूप जरुरीचे आहे हे विषेश अधीसेविका वंदना बरडे यांनी सांगितले. स्तनपानाची शपथ  आहारतज्ज्ञ गीतांजली ढोक यांनी दिली.

सुत्रसंचालन सोनल घाग अधिपरिचारीका यांनी केले, आभारप्रदर्शन समुपदेशक वंदना बुरिवार यांनी केले. या कार्यक्रमांचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. खुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना बरडे यांनी केले. स्तनपानसंबधीत पोस्टर प्रदर्शन लावून जनजागृती त्याचा प्रचार व प्रसार करण्यात आले.
यावेळी मैत्रीनी महीला मंडळ,भजन मंडळ, क्लब, सोसायटी यांनी प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान अधीसेविका वंदना बरडे यांनी केले. या कार्यक्रमाची जबाबदारी श्रीमती सरस्वतीताई कापटे परिसेवीका, सुजाता जूनघरे, कु.प्रियंका सोनूले, सपना राठोड, कक्षसेवक कुंदा मडावी यांनी संभाळली, कार्यक्रमात सर्वच अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती, तसेच लाभार्थी व नातेवाईक यांनी लाभ घेतला.

महिलांचा आक्रोश मोर्चा: मणिपूर महिला अत्याचार व हिंसक घटनेचा निषेध



सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : वरोरा येथे आम्ही रणरागिणी ग्रुपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्व पक्षीय महिलांनी आम्ही रणरागिणी ग्रुप तर्फे प्रामुख्याने शिवसेना महिला आघाडी (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे महिलांचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन वर धडकला. नराधमांना फाशी द्या अशी मागणी करण्यात आली. महिला मध्ये संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी तात्काळ आरोपींना शिक्षा ठोठावली पाहिजे, असे मत नर्मदा बोरेकर यांनी मांडले. 

'एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढावो' हे सरकार म्हणते पण महिलांची सुरक्षा, महिला अत्याचार यावर ठोस पावले उचलल्या जात नाही. आक्रोश मोर्चा काढून महिलांनी तहसीलदार, ठाणेदार यांना निवेदन दिले. मणिपूर घटना ही देशाच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे. या देशात महिला राष्ट्रपती असून महिलावर अत्याचार होत आहे. ज्या प्रकारे मणिपूर येथे हिंसा घडली ती अत्यंत निंदनीय प्रकार असून त्या नराधमांना फाशी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा. महिला व बालकल्याण मंत्री यांनी तात्काळ महिला सुरक्षा संबंधि ठोस पावले उचलावीत. सध्या आपल्या देशात अतिशय भयानक आणि मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहे. मणिपूर मधील महिलांची एका विकृत जमावाने निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्या अब्रूची जी लक्तरे वेशीवर टांगली आहे त्यामुळे देशात प्रचंड आक्रोश आणि संताप आहे.

सोशल मीडियावर करोडो लोक आपल्या संतापजनक भावना व्यक्त करीत आहे. मेंदू काढून टाकलेल्या झुंडीने केलेले हे भयानक कृत्य भारतीय समाजाला आणि संस्कृतीला लाजविणारे आणि मान खाली घालायला लावणारे आहे. आपण एक महिला आहात. एका महिलेचा मान, सन्मान, प्रतिष्ठा, इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. मणिपूरच्या महिलांच्या बाबतीत जी घुणास्पद आणि लज्जास्पद घटना घडलेली आहे त्याबद्दल तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.

शबरी घरकुल योजनेचा लाभ राखीव, गरजवंत लोकांना द्यावा - बिगर 7/12 शेतकरी संघटनेची मागणी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गट ग्रामपंचायत केगांव (बोदाड) येथील सरपंचा ग्रामसेवक यांचा मनमानी, कामचुकार व भ्रष्ट कारभार आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचीही याकडे कानाडोळा करत असतील तर ग्रामपंचायत कार्यालयालायाचा उपयोगच काय? या संतापातूनच चक्क सरपंचा, ग्रामसेवक विरोधात बिगर 7/12 शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विलास पवार यांच्या नेतृत्वात बोदाड येथील गावाकऱ्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे कडे निवेदनातून तक्रार सादर केली आहे.
सन 2023 शबरी योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेले असून तालुक्यातील केगांव बोदाड येथील गट ग्रामपंचायत पदाधिकारी शासनाच्या घरकुलाचा लाभ हितसाधू लोकांना देण्याच्या तयारीत आहे,असे निवेदनात नमूद आहे. मात्र, हा अन्याय योजनेत मुख्य बसणाऱ्या गरजवंत व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांवर होणार आहे, त्यामुळे इतरांना हा लाभ देण्याचं घाट न घालता या योजनेत बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनातून गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे. याबाबत संबंधिताकडे तक्रार करुनही दखल न घेतल्यास नाईलाजाने आंदोलनात्मक भूमिकेचा अवलंब करावा लागेल असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. या दरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास पंचायत समितीची जबाबदारी असेल असे बिगर 7/12 शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास पवार यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले आहे. 
यावेळी निवेदन देताना अशोक चोपणे, निर्गुण काळे, जिल्हाध्यक्ष विलास पवार, मयूर पवार, किर्तीका पवार, जगन पवार, मनोज काळे, विनोद भोसले, अब्रूचन पवार, संजय येरमे, वंचित तालुका उपाध्यक्ष संजय जिवने आदी उपस्थित होते.


या योजनेचा लाभ इतरांना देण्याचा प्रश्नच नाही, घरकुलाचे 350 टार्गेट दिले आहे. त्यात ज्यांना घरकुल नाही, त्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणीही लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही.

-पद्माकर मडावी
गटविकास अधिकारी पं. स., मारेगाव