विद्यार्थांनी हिच चिकाटी कायम ठेऊन प्रशासकीय सेवा करावी - भैय्याजी कनाके


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत आज चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आपण सत्कारास मान मिळाला व आपल्या आई वडिलांना आणि आपल्या शाळेचा व गुरू जनांचा मान उंचावला तोच कायम ठेवण्यासाठी तुम्ही प्रशासकीय सेवेत आपली उपलब्धी, करावी.
असे आपले मत मांडताना विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा पेसा समिती अध्यक्ष भैय्याजी बोलत होते.

विशेष अतिथी म्हणून मारेगांव दिवाणी व फौजदारी न्यायाधीश मा.निलेश,वासाडे होते.अध्यक्षस्थानी कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे होते तर या सोहळ्याचे उदघाटक म्हणून वर्धमान फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

शेतकरी सुविधा केंद्रात पार पडलेल्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मारेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी,मारेगांव वनपरिक्षेत्राधिकारी शंकर हटकर, नायब तहसिलदार ओसिन मडकाम, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, महिला व बालकल्याणचे विस्तार अधिकारी दिपक कळमकर, जेष्ठ समाजसेवक पुंडलिक साठे उपस्थित होते.
यामध्ये विशेष कार्यकरणाऱ्याचाही गौरव करण्यात आला.
यामध्ये पत्रकार माणिक कांबळे, सरपंच तुळशीराम कुमरे पोलिस पाटील मुकींदा बतखल, तलाठी राजु डवरे, ग्रामसेवक जयंत फुलझेले, वनरक्षक प्रेमीला सिडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना देठे,वेगांव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रश्मी आडे,पहापळ येथिल मुख्याध्यापक नत्थुजी चौधरी, अंगणवाडी सेविका आशा खामनकर, कुमार कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट चे संचालक राजेश घुमे, संगणक मार्गदर्शक अभिषेक कनाके, युवा उद्योजक भगत (घर संसार), इत्यादींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भंडारी यांनी केले, सुत्रसंचालन,सौ.स्नेहलता, चुंबने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा तातेड यांनी केले. या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कुमारअमोल कुमरे,पंकज साठे,बेबी आत्राम, मनिषा मोहुर्ले, गणेश तातेड,कवडू मोहुर्ले,आदेश तातेड,पंकज नेहारे,आदिनी अथक परिश्रम घेतले.