जनार्दन एकनाथ खंडेराव यांचेकडे मारेगाव ठाण्याचे सूत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांची वणी येथे बदली झाल्याने त्यांचे ठिकाणी पोलीस ठाणेदार
म्हणून जनार्दन खंडेराव हे रुजू होणार आहेत,अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी जनार्दन एकनाथ खंडेराव यांच्याकडे मारेगाव पोलीस स्टेशनचे सूत्र सोपविले आहे.

ठाणेदार पुरी यांची वणी येथे बदली झाल्याने पो. स्टे.यवतमाळ यवतमाळ शहर असलेले स.पो.नि जनार्दन खंडेराव यांनी शुक्रवार (दि.30) जून रोजी मारेगाव ठाणेदार पदाचे सूत्र आज स्वीकारणार असल्याचे माहिती आहे.

जनार्दन खंडेराव यांनी यवतमाळ शहराचे ठाणे योग्यरित्या काम सांभाळले. तसेच यवतमाळ शहराचा चांगला अनुभव, त्यामुळे मारेगाव ठाणे सांभाळताना त्यांना फारशी अडचण जाणार नाही. मात्र, अवैध धंदे फोफावणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे.

तालुक्यातील कोंबडबाजार मटका जुगार, भंगार चोरी, गोवंश तस्करी, सुगंधी तंबाखूची होणारी आयात याचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठं आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.

कसा जाईल आपला आजचा दिवस, जाणून घ्या...


    जाणून घ्या आजचे राशीभविष्य : ३० जून शुक्रवार..!

मेष :-
मेष राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि खूप संघर्षानंतर तुम्हाला समस्यांपासून थोडा आराम मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. वाढत्या आर्थिक अडचणींपासून आराम मिळेल. तुम्हाला काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला छोट्या अर्धवेळ व्यवसायासाठीही वेळ मिळेल आणि तुमची कामे सहज पूर्ण होतील. महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, त्यामुळे प्रयत्न केल्यास फायदा होईल.

वृषभ :-
वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. कोणत्याही शुभ कार्याची तुमच्या कुटुंबात चर्चा होऊन त्याची रूपरेषा तयार करता येईल. राहणीमान सुधारण्यासाठी तुम्ही आवश्यक वस्तू खरेदी कराल. संध्याकाळी विशेष पाहुणे येऊ शकतात आणि तुमचा खर्च वाढू शकतो.

मिथुन :-
मिथुन राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि तुम्ही तुमच्या कामात खूप वेगाने पुढे जाल. तुमची प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल आणि तुमच्या रखडलेल्या योजना यशस्वी होतील. प्रगतीचा हा वेग कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. अन्यथा, प्रतिष्ठा नंतर दुखावली जाऊ शकते. निरुपयोगी कामापासून दूर राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कर्क :-
कर्क राशीच्या लोकांना नशीब साथ देत आहे आणि तुमची काही महत्वाची कामे पूर्ण करण्यात दिवस खर्ची पडेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी प्रयत्न करता. तुमचे सर्वांशी संबंध मधुर राहतील. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या आवडीच्या ठिकाणी जागा बदलता येईल.

सिंह :-
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस फारसा अनुकूल नाही. व्यवसायाची चिंता विशेषत: तुम्हाला त्रास देईल कारण गेल्या अनेक दिवसांपासून व्यवसाय नियमित न झाल्यामुळे तुम्ही खूप गोंधळलेले असाल. अस्थिरता तुम्हाला सोडत नाही. नोकरी, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात काही सुधारणा अपेक्षित आहे. तुम्हाला आळस आणि आराम सोडावा लागेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.

कन्या :-
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस खास असेल. तुम्हाला विशेष प्रकारची धावपळ करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला त्यात चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमचे काम पूर्ण उत्साहाने कराल तर तुम्हाला फायदा होईल. काही काळानंतर तुम्हाला सर्वोत्कृष्ट करार मिळवून नफ्याच्या संधी मिळतील.

तूळ :-
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ नाही आणि तुमचे भाग्य साथ देणार नाही. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात लोक तुमच्या बोलण्याला विरोध करतील. तुम्ही तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने या लोकांना पराभूत करू शकता. मनातील दुर्बलता आणि वाईट गुण सोडून पुढे जा.

वृश्चिक :-
वृश्चिक राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुम्हाला कुठूनतरी खूप शुभ बातमी मिळेल. व्यवसायाच्या क्षेत्रातील ताणतणाव तुमच्यावर वर्चस्व गाजवू देत नसाल तर तुमचा दिवस आनंददायी जाईल. तुमच्या काही नवीन योजना यशस्वी होतील आणि जुनी भांडणे मिटतील. अधिकारी वर्गातील लोकांमध्ये परस्पर सौहार्द वाढेल. निराशाजनक विचारांपासून दूर राहा. दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे.

धनु :-
धनु राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुम्हाला नवीन संपर्काचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमचे काम करावेसे वाटेल. जे लोक कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी संबंधित आहेत त्यांना विशेष फायदा होऊ शकतो. रखडलेले पैसे अडचणीने मिळतील आणि दैनंदिन कामात दुर्लक्ष करू नका. सर्वकाही काळजीपूर्वक करा. व्यावसायिक प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल आणि नशीब तुमची साथ देईल. संध्याकाळी शुभ समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

मकर :-
मकर राशीच्या लोकांचा दिवस शुभ आहे आणि तुमचा आदर वाढेल. ग्रहांची हालचाल तुमच्या भाग्यात वाढ होण्याचे संकेत देत आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवसायात फायदा होईल. सकाळीच शुभवार्ता मिळाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जाईल. मित्रांमधील परस्पर संबंध खूप गोड असतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा निर्णय घेऊ शकता. मामाचे सहकार्य लाभेल आणि आर्थिक लाभ होईल.

कुंभ :-
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस नोकरी आणि व्यवसायात फायदेशीर राहील. उच्च अधिकार्‍यांच्या जवळीकीचा लाभ घेण्याची संधी मिळेल. आयात-निर्यात क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या क्षेत्रातील कोणताही निर्णय तुम्हाला भविष्यात लाभ देईल. अध्यात्मात तुमची आवड वाढेल. प्रवासाची संधी मिळेल. वेळेचा योग्य वापर करून तुमचे भाग्य उंचावेल.

मीन :-
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील आणि तुम्हाला फायदा होईल. काही वादग्रस्त अडचणी संपतील. ऑफिसमधील प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, ते परत मिळवणे खूप कठीण होईल.


मार्डी येथे सी एन जी गॅस प्रकल्प निर्मिती केंद्राचे भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : ग्रामीण अर्थव्यवस्थेला शाश्वत रीतीने आधार देण्यासाठी आज गुरुवार (दि.२९) रोजी मार्डी येथे मंजुळ बायोफ्युएल प्रा.लि.मारेगाव, व मा.अनिता फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मारेगाव च्या वतीने सी एन जी गॅस निर्मिती केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन कंपनीचे डायरेक्टर गजानन चौधरी यांच्या उपस्थितीत माजी सरपंच भास्कर धानफुले यांचे हस्ते करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नविन सी एन जी गॅस प्रकल्प होत असल्याने परीसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सेंद्रिय शेती, ऊर्जा पीक शेती, बायोमास फार्मिंग आणि नाविन्यपूर्ण ग्रामीण प्रकल्पांद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, बायोमास आणि कचरा यांसारख्या गैर-अन्न फीडस्टॉकपासून शाश्वत स्वच्छ इंधन तयार करणे हाच आहे. त्यासाठी लागणार कच्चा माल शेतकऱ्यांच्या शेतातून पिकवला जाणार आहे. या गॅस निर्मिती केंद्राकरिता लागणारे रोपटे कंपनीमार्फत उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी संबंधितांनी दिली. येथील परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याने या प्रकल्पाची स्तुतीसुमणांनी स्वागत केले जात आहे.

एम सी एल (MCL) उत्पादक संस्था (MPO) शेतकऱ्यांना जैवइंधन उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी, शाश्वत आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांना आर्थिक लाभ देण्यासाठी कंपनी सक्षम असून हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांना वरदान ठरणार आहे. 
भूमिपूजनाप्रसंगी माजी सरपंच भास्कर धानफुले, सरपंच रविराज चंदनखेडे, डायरेक्टर गजानन चौधरी, गजानन आसुटकर, प्रवीण कुचनकर, अतुल बोबडे, सारंग लांबट, विकास चौधरी, प्रवीण मिलमिले, राहुल चट्टे, ग्राम उद्योजक बंडू टोंगे, सुरेश मुरस्कर, विजय घोटेकर, आकाश बदकी, धनंजय आसूटकर, भैरव राऊत, अक्षय गलाट, अक्षय एकरे, प्रतीक गावंडे, किशोर उलमाले, संजय वानखेडे, प्रेमानंद देठे,  तुफान अन्सारी, विनोद ठेंगळे, अनंता निब्रड,आदी मंडळी सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

मारेगाव: चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी ५० गूरूदेव सेवकांसह पंढरपूर रवाना

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गुरुपौर्णिमेच्या पर्वावर जिल्ह्यातील विविध भागातील गुरुदेव प्रेमी, उपासक चंद्रभागेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी हजारो सेवक निघाले असता, आज (गुरुवार) ला दुपारी 4 वा. मारेगाव तालुक्यातील 50 गुरुदेव सेवकासह पंढरपूर कडे रवाना झाले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हजारों हातांनी चंद्रभागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असं मत रवाना झालेल्या गुरुदेव उपासकांनी व्यक्त केले.

आषाढी यात्रेमुळे पंढरपूरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होतात. "सत्ता कि आयु न बढि,सेवा कि ध्वजा सदा खडी" असं महाराजांनी आपल्या भजनवाणीतून सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात मिळाल्यास चंद्रभागा स्वच्छता अभियान वेगाने रावबिता येईल, या भावनेने पंढरपुरात चंद्रभागा स्वच्छता अभियान, पंढरपूर येथील ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूरचे संचालक सेवकराम दादा यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि.1,2,3, जूलै रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यांच्या या अभियानात रूपेश ढोके, रामदास ढेंगळे, दिवाकर गाडगे, सूरज येवले, सह मारेगाव तालुक्यातील कानडा हिवरा वनोजा येतील कार्यकर्ते चंद्रभागा स्वच्छता अभियान साठी पंढरपूर रवाना झाले असून उद्या सायंकाळपर्यंत सर्व सेवक पंढरपूर ला पोहचणार आहे.

हे अभियान गेल्या 9 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होतात, त्यामुळे आम्ही सुद्धा सहभागी होत आहोत,असे गुरुदेव उपासक रुपेशभाऊ ढोके यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले. 

मंत्रिमंडळ निर्णय: संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दीड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३०० रुपये अशी वाढ देखील करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांत मिळून ४० लाख ९९ हजार २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे २ हजार ४०० कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली.