महागांव-सिंधी पाणंद रस्त्यांच्या मार्ग होणार सुकर

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : उपसरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषद,मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.

वणी मतदार संघांचे लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी महागांव सिंधी पांदन रस्ताकरिता निधी मंजूर करून दिल्याने अविनाश भाऊ लांबट यांनी त्यांचे आभार मानले. लांबट यांच्या सतत च्या मागणी सह पाठपुराव्याची आमदार साहेबांनी दखल घेतली आहे. त्यामुळे महागांव सिंधी पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होणार आहे असे अविनाश भाऊ लांबट यांनी "सह्याद्री चौफेर" ला बोलतांना सांगितले.

"दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. आजही दुर्गम किंवा अनेक गावे रस्त्यांच्या मुख्य प्रवाहापासून बऱ्याच अंशी दूर आहेत. त्यादृष्टीने विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करणे आणि पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्तीतून कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या महत्वाच्या बाबींवर सरकारने भर दिला आहे. 

वणी मतदार संघातील दुसऱ्यांना निवडून आलेले लोकप्रिय विद्यमान आमदार यांच्याशी चर्चा करून महागांव सिंधी पांदन रस्ता देण्यात यावा यासाठी मागील काही दिवसापासून अविनाश लांबट मागणी करित होते, आवश्यक बारमाही पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो त्यासाठी आमदार बोदकुरवार यांनी देण्याचा निर्णय घेतल्याने आता पांदन रस्त्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

अखिल भारतीय सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांच्या मागणीला मोठे यश आले आहे. आमदारांनी या पांदन रस्त्याकरिता 50 लाख रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने उपसरपंच लांबट यांच्या सह महागांव सिंधी येथील नागरिकांनी आमदार बोदकूरवार यांचे आभार मानले आहे.

कवितेचा प्रांत समृद्ध होण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा - प्रा. श्रीकांत पाटील


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कवी हा जेव्हा कविता लिहून पूर्ण करतो त्यानंतर ती त्याची राहत नाही. ती रसिकांच्या आस्वादनासाठी उपलब्ध होते. रसिकांनी त्या कवितेतील मर्म समजून तिला न्याय दिला पाहिजे. श्रेष्ठ कविता कोणती हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार हा रसिकांचा असतो. त्यामुळे कवितेला श्रेष्ठत्व प्रदान करण्यासाठी व कवितेचा प्रांत समृध्द करण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा असे उद्गार प्रसिद्ध गीतकार व संगीतकार प्रा. श्रीकांत पाटील यांनी काढले. शेगांव ( बु ) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी एक दिवसीय राज्यस्तरीय काव्यसंगितीचे आयोजन करण्यात आले. या काव्यसंगितीच्या पहिल्या सत्रात कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात ते बोलत होते. संवादक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रमोद नारायणे यांनी भूमिका पार पाडली. याप्रसंगी प्रसिध्द समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर उपस्थित होते. कवितेविषयी प्रा. प्रमोद नारायणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीकांत पाटील म्हणाले, कवींसमोर प्रत्येक काळात आव्हाने असतात म्हणूनच कवी शब्दांच्या द्वारा प्रगट होत असतो. त्या आव्हानांना उलथून लावण्याचे काम कवी करतो. कविता ही काही शब्दांचा खेळ नसतो. तर ती जीवनाचे भाष्य करणारी एक कृती असते. कवी कविता लिहितो म्हणजे तो त्या काळाच्या पटावर आपले शब्द कोरत असतो. असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कविमनाची अवस्था, काव्यनिर्मिती प्रक्रिया, कवितेतील आशय अभिव्यक्ती यावरही त्यांनी विस्तृत भाष्य केले. कार्यक्रमाला देवराव कांबळे, दादाजी खोब्रागडे (वणी ) आत्माराम खैरे ( चंद्रपूर ) मुख्याध्यापक चंद्रभान देठे ( भद्रावती ) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रति,
मा. जिल्हा प्रातिनिधी
दैनिक नवजीवन
चंद्रपूर

आपल्या लोकप्रिय दैनिकातून वरील बातमी प्रकाशित करावी ही विनंती.

प्रा. प्रमोद नारायणे
कार्यवाह
कवितेचे घर

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट शेतीवर भर देणे आणि त्या माध्यमातून शेतमालाचे एकत्रिकरण करून शेतकऱ्यांचा बाजार संपर्क वाढविणे यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

याअंतर्गंत महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प इत्यादी प्रकल्प राज्यात राबविण्यात आले. या आणि अन्य माध्यमातून राज्यात सुमारे 1 हजार 700 शेतकऱ्यांच्या कंपन्या, महिलांचे 361 लोक संचलित साधन केंद्र व 1 हजार 482 प्रभाग संघ स्थापन करण्यात आले आहेत. या संघटित शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजाराधिष्टित शेती करण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि राज्यात पिकविल्या जाणाऱ्या विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्यसाखळ्या विकसित करून त्यासाठी या संघटित शेतकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट )प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पारंपरिक कृषि व्यवस्थेचे बळकटीकरण करून ती अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणे आणि मुल्य साखळीतील खाजगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे यावर भरदेण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी कृषि, पशूसंवर्धन, पणन, सहकार, महिला व बाल कल्याण, ग्राम विकास व नगर विकास या सात प्रशासकीय विभागांच्या अकरा यंत्रणा मिळून हा प्रकल्प राबवित आहेत .

लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. राज्याच्या कृषी व ग्रामीण उपजिविका क्षेत्रामध्ये स्मार्ट उपाययोजना राबवून राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी जागतिक बँक व केंद्र शासनाच्या सहकार्यांने ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये जागतिक बँकेकडून ७०% , राज्य शासनाचा हिस्सा २७% तर खाजगी उद्योगक्षेत्राच्या माध्यमातून (सीएसआर) 3% रक्कम पुरविली जात आहे. प्रकल्पाची एकूण किंमत २ हजार १०० कोटी रुपये एवढी आहे.

लाभ कोणाला मिळेल ?

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आणि कृषी विभागाचे अन्य उपक्रमाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांचे प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोक संचालित साधन केंद्र, सहकार विभागाच्या उपक्रमातर्गंत प्राथमिक कृषी पतसंस्था, उत्पादक संघ यांना या योजनेचा लाभ होईल. कृषि व्यवसाय सुधारणांसाठी संस्थात्मक व्यवस्थेचे बळकटीकरण, कृषि व्यवसाय विकास आणि बाजारपेठेत प्रवेश, जोखीम निवारणाची व्यवस्था उभी करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख घटक आहेत.

मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पाचे मुख्य घटक

मुल्यसाखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ती कार्ये करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतामलाच्या किंमतीत वाढ (मुल्यवृद्धी) होत जाते. उत्पादक भागीदारी उपप्रकल्पात उत्पादक समुदाय संस्था आणि खरेदीदार संस्था हे दोघे एकत्र येवून उपप्रकल्प तयार करतील. बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प पध्दतीत उत्पादक समुदाय आधारित संस्था निश्चित असेल तथापि खरेदीदार निश्चित केलेला नसेल. परंतु या समुदाय आधारित संस्थेने उत्पादित केलेला शेतमाल कोणत्या बाजारात विकायचा तो बाजार निश्चित केला गेलेला असेल.

गोदाम आधारीत उपप्रकल्प

विकेंद्रीत स्वरुपात गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम आणि धान्य तारण सुविधा पुरविण्यासाठी हे उपप्रकल्प असतील.

कापूस मुल्यसाखळी

या घटकातंर्गत स्वच्छ व एकजिनसी कापूस उत्पादन करून कापसाच्या बेल (गठान)ची विक्री स्मार्ट कॉटन या ब्रँडखाली इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफार्मव्दारे करण्यात येणार आहे. तसेच कापूस मुल्यसाखळी विकसित करण्यात येणार आहे. सदर उपक्रम कृषि विभाग व महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॉटन ग्रोअर्स मार्केटींग फेडरेशन लि. यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी या १२ जिल्ह्यांमध्ये आहे.

उपप्रकल्पातील उत्पादने

फळे, भाजीपाला, अन्नधान्य पिके, नगदी पिके या मध्ये राज्यातील ज्या पिकांना बाजारपेठेत मागणी आहे तसेच ज्यांच्या मूल्यवर्धनास वाव आहे, अशा निवडक पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच शेळीपालन व परसबागेतील कुक्कुट पालन या दोन घटकांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.

पीक काढणीनंतर लागणारी स्वच्छता, प्रतवारी इत्यादी यंत्र सामुग्री ,प्राथमिक व दुय्यम प्रक्रियेसाठी व पॅकिंगसाठी लागणारी यंत्र सामुग्री, शीत गृह, पिकवण गृह, पूर्व शीत गृह, गोदाम बळकटीकरण, नवीन गोदाम बांधकाम इत्यादी घटकांचा समावेश उपप्रकल्पामध्ये करण्यात येईल .

प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी smart-mh.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रकल्प समन्वय व व्यवस्थापन कक्ष मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) शेती महामंडळ भवन, २७०, भांबुर्डा, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११०१६ दूरध्वनी – (०२०) २५६५६५७७/८ येथे अथवा जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


-श्रीमती अपर्णा प्रकाशराव यावलकर
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

आजचे रशिभाविष्य : २८ मार्च मंगलळवार

 
                राशीभविष्य : २८ मार्च मंगळवार..

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे आणि तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल. असे केल्याने तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळेल. कार्यालयात विरोधकांच्या कारस्थानांपासून सावध राहा. खर्चही जास्त होईल. जर तुम्ही घरातील तरुण सदस्यांसोबत जास्त वेळ घालवलात तर तुमचा पाठिंबा त्यांना मदत करेल. त्यांना तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत अतिशय शुभ आहे. तुम्हाला करिअरच्या बाबतीत मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे. दिवसभर उत्साह राहील. काही गोंधळामुळे लाभाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन प्रकरण सोडवता येईल. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते.

मिथुन :
आर्थिक बाबतीत थोडे जपून पावले टाकण्याचा दिवस आहे. आर्थिक बाबतीत लाभाचा दिवस आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद घालू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या शुभ कार्यासाठी जाण्याची संधी मिळेल. इतरांच्या मदतीने मनाला शांती मिळेल. मित्राची मदत होईल.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा निकाल येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस तणावपूर्ण असू शकतो. प्रामाणिकपणाने बनवलेले नाते दीर्घकाळ टिकेल. काही लोकांचे नशीब चमकू शकते. करिअरच्या दृष्टीने लाभ होईल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल आणि तुम्हाला काही काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील आणि यामुळे तुमची धावपळ अधिक होईल. दिवस खूप व्यस्त असेल. कठोर परिश्रमानंतर, तुम्हाला त्याचे फळ मिळेल, परंतु काही वेळाने ते मिळाल्यानंतर तुम्ही निराश होऊ शकता. समाजातील लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल आणि अचानक प्रवासातून काही फायदा होऊ शकतो. तुम्ही कोणाशीही वाद घातला नाही तर तुमच्यासाठी चांगले आहे.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांना दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला वारंवार लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीवर पैसा खर्च करावा लागू शकतो आणि मुलांच्या शिक्षणात तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या करिअरसंबंधी आयुष्य नवीन वळण घेईल. प्रवास होईल आणि ई-मेल किंवा एसएमएसद्वारे काही चांगली बातमी मिळू शकेल. प्रॉपर्टी पेपर्समध्ये कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित परिणाम मिळेल. पैशाचे प्रश्न सुटतील. आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीशी परिचय होईल आणि तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. एखादी विशिष्ट गोष्ट न मिळाल्याने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुमचे कामही थांबू शकते.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस लाभदायक आहे. आपण केलेल्या नियोजनानुसार सर्वकाही होत असेल तर आपला दिवस आनंदात जाईल. तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. चांगल्या वागण्याने नवीन मित्र बनतील आणि नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल, कौटुंबिक जीवनात, पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवल्यासारखे वाटेल. कार्यालयात विशेष बदल होतील आणि कामेही होताना दिसतील.

धनु :
धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला आहे आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुमच्या आयुष्यात राजकीय घडामोडी वाढतील. एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या पण असे केल्याने काही पैसे खर्च होतील. तुमचे मनही अभ्यासात गुंतलेले असेल. आयुष्याची दिशा नवीन वळण घेईल. तब्येतीची चिंता राहील, पण खाण्यापिण्यात सावध राहिल्यास समस्या दूर होऊ शकतात. मालमत्तेचे प्रश्न सुटतील आणि शेअर बाजाराशी संबंधित लोकांनाही फायदा होईल.

मकर :
करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या लोकांसाठी दिवस जवळपास सामान्य असेल. दिवसाच्या पहिल्या भागात लहान वाद डोके वर काढतील परंतु लवकरच सर्व काही तुमच्या समजुतीने सोडवले जाईल. वाढत्या खर्चाला आळा बसेल. जर तुम्ही जास्त मेहनत केली आणि तुमचे वर्तन सुधारले तर तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ सदस्य आणि वडीलधाऱ्यांना तुमची चिंता होईल. गोंधळ कमी होईल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस सर्वच बाबतीत मंद राहील. ऑफिसमध्ये काम संथपणे केले तर फायदा होईल. अभ्यास आणि लेखनाकडे लक्ष द्या. मालमत्तेचा लाभ मिळेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. ऑफिसमध्ये नवीन सहकारी कामात मदत करतील.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप शुभ राहील. व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत तणाव संपेल. खास लोकांशी तुमचा संपर्क वाढेल आणि प्रवासात तुम्हाला मनोरंजनाचा आनंदही मिळेल. दैनंदिन दिनचर्या करा आणि खाण्यापिण्याचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करा. तुमचे सहकारी तुमच्या कामात मदत करतील पण कोणावरही जबरदस्ती करू नका.


विनोदाची हास्यजत्रा उद्या वणीत..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सागर झेप बाहुउद्देशी संस्था व जैताई मंदिर द्वारे आयोजित हास्य जत्रा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या मध्ये 9 प्रहसन, मिमिक्री, गण, बतावणी, एकपात्री प्रयोग अशी विनोदाची मेजवानी असणार आहे.
यात वणीतील नाट्य कलावंत अशोक सोनटक्के, शैलेश आडपवार, प्रवीण सातपुते, सीमा सोनटक्के, संदीप उरकुडे, प्राची चंदेलकर, प्रिया कोणप्रतिवार, राधा वैद्य, तृप्ती उंबरकर, प्रिया विवलकर, श्रुती उपाध्ये, तारा कुलकर्णी, कविता सातपुते, नंदा गुहे, मीना वानखडे, सोनल टिकले, निकुंज सातपुते, करिष्मा नवले, निखिल वाघाडे, आकाश महादुळे, प्रकाश खोब्रागडे, उमाकांत मसे असे सर्व कलावंत वणीकरांना खदखदून हसवणारा आहे.
त्यामुळे रसिकांनी हसण्याचा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.