धावत्या बाईकवरील महिलेवर दरोडा, दोघांपैकी एक वडकी पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : तालुक्यात डॉ हाजरा लूटमार प्रकरण ताजे असतांना आणखीन एका महिलेला भर रस्त्यात लुटण्याचा थरार आज 27 मार्च ला घडला. मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकाला असलेल्या कोसारा येथील एक महिला बँकेच्या कामासाठी आली. ती वडकी वरून बँकेचे काम न झाल्याने कोसारा गावी जाण्यासाठी एका मोटारसायकल वर जात असतांना मागावरून येणाऱ्या दोन बंदूकधारी इसमानी तीची बॅग खैरी गावालगत च्या ब्रेकर वर ओढली. आणि लुटारूनी पोबारा केला. हा थरार आज मंगळवारला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास चिंचमंडळ,धानोरा रिठ येथे घडला असून त्यामुळे ही मारेगाव तालुक्यातील दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार भारती संजय भेदुरकर रा. कोसारा (ता. मारेगाव) ही महिला वडकी येथील राष्ट्रीयकृत बँकेत काही कामा निमित्त गेली. परंतु तीचे काम न झाल्यामुळे ती महिला गावातीलच एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीने गावी परतत असताना तीच्या मागावरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वार इसमापैकी एकाने मागून तीची पर्स ओढली आणि पुढील दिशेने पोबारा केला. सदर घटना खैरी गावालगत च्या ब्रेकर घडली असून महिलेने खैरीत पोहचताच आरडाओरड करून हा प्रकार स्थानिकांना सांगितला.दरम्यान माझी जीवितहानी झाली असती तर असे महिलेने त्या दरोडेखोराला संतापून जॉबही विचारला.

दरम्यान, मोबाईल वरून पुढील मार्गांवरील महिललेने आणि सोबत च्या दुचाकीस्वाराने इतरांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे चिंचमंडळ येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे अतुल पचारे यांनी आपल्या सवंगडयांना संपर्क साधून माहिती देत रस्ता रोखण्यास सांगितले आणि स्वतः ही चिंचमंडळ हा मार्ग निगराणीत असताना त्या दोघांपैकी एका बंदूकधारी युवकाने धानोरा रिठ ह्याकडे कूच केल्याची माहिती मिळताच खैरी व चिंचमंडळ परिसरातील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्याला अतुल पचारे यांनी पकडले व वडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या थरारातील मुख्य आरोपी संतोष खिरटकर (41) रा वरोरा जि. चंद्रपूर येथील असून दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाल्याची चर्चा आहे.


रासेयो पथकाद्वारे आझाद हिंद गाथा नाट्याचे सादरीकरण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला जातो आहे, त्यानिमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समाजामध्ये स्वातंत्र्यविराच्या विचारांना उजाळा मिळावा यासाठी शहीद दिनाच्या निमित्ताने" स्वातंत्र्याची अमृत गाथा" या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेश बुरंगे यांचे कडून यवतमाळ जिल्ह्यातील लोकमान्य टिळक महाविद्यालया ची निवड या नाट्याच्या सादरीकरणासाठी कराण्यात आली.
          
महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सुरू असणाऱ्या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र मुंबई , राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्टिस्टिक ह्युमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी एकाच वेळी महाराष्ट्रातील ७५ महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण करण्यात आले . लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रसाद खांनझोडे यांचे भरपूर प्रोत्साहन लाभले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलिमा दवणे यांच्या मार्गदर्शनात वैष्णवी निखाडे,सागर क्षीरसागर,रवी शेगर,दीक्षा तेलंग,करण ढूरके, समृद्धी ताकसांडे, अब्रार शेख,विनय पुराणकर ,निखिल वाघाडे,गौरी ढेंगळे ,साई दुधलकर,
गौरव नायनवार,संजना देवगडे, प्रवृत्ती तेलंग,रोशन डाहुले विनोद शिंदे, योगेश कॉलर,अंकुश झाडे,सेजल येसेकर,तृप्ती वाघमारे या सर्व स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याची अमृत गाथा या नाट्याचे सादरीकरण केले.

महाविद्यालयातिल प्रध्यापकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि महाविद्यायातील विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको; सहकार्य मिळणे गरजेचे – राज्यपाल रमेश बैस 

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने विधेयक आणले. पूर्वी केवळ ६ अपंगत्वांचा समावेश होता, परंतू नव्या विधेयकामध्ये मधुमेहासह ४२ अपंगत्वांचा समावेश केल्या गेला. मात्र आज देखील दिव्यांग व्यक्तींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका नेत्रहीन अधिकाऱ्याला पदस्थापना मिळण्यासाठी ७ वर्षे लढावे लागले होते. दिव्यांग लोकांना सहानुभूती नको परंतू समाजाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ७५ दिव्यांग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिलाई मशीन व पिठाची चक्की समारंभपूर्वक भेट देण्याचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार अयोग्य, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण - मुंबई उपनगर व 'सक्षम' कोकण प्रांत या संथांनी केले होते.

जगात प्रत्येक आठवी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिव्यांग आहे, तर भारतात जवळ जवळ दोन टक्के लोक दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी व सुरक्षित वातावरण देणे समाजाचे कर्तव्य आहे असे सांगून अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग लोक उत्कृष्ट कार्य करू शकतात असे राज्यपालांनी सांगितले.

अष्टावक्र मुनी, संत सूरदास, वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन व शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग दिव्यांग असून देखील त्यांची प्रतिभा पूर्णपणे उदयास आली होती असे सांगून दिव्यांग व्यक्तींसाठी शासकीय व खासगी कार्यालये, संकेतस्थळे व वाहतुकीची साधने सुगम असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या हेतू चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालांनी ५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमलकिशोर तातेड (नि.), 'सक्षम' कोकण प्रांताचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सावंत, हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव रिखबचंद जैन, मणी लक्ष्मी तीर्थचे विश्वस्त दिनेश मणिलाल शाह, राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम ए सईद व भगवंत मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उपनगरचे सचिव न्या. सतीश हिवाळे तसेच दिव्यांग व्यक्ती व समाजसेवक उपस्थित होते.

आनंदाचे डोही "आनंद" तरंग

                 
                     अ|भि|ष्ट|चिं|त|न वा|ढ|दि|व|स 

'आनंदाचे डोही, आनंद तरंग।
आनंदचि अंग, आनंदाचे'

असे आनंदावस्थेचे स्वरूप तसे आमचे परम मित्र "आनंदराव" म्हणजे आनंद नक्षणे. अगदी मौज मस्तीच्या काळात वडिलांचे छत्र हरवल्यानंतर स्वतः च्या पायावर उभे राहून वाट्याला आलेल्या कुटुंबाची खंबीरपणे आपली जबाबदारी पेलणारे, म्हणजे ते आनंद भाऊसाहेब.... आता तर मनमिळाऊ दिलखुलास व्यक्तिमत्व आम्ही अनुभवतोय हे त्रिवार सत्य. शहरातील सुपरिचित सलून व्यावसायिक ते निर्भीड,निष्पक पत्रकारिता असा त्यांचा आनंददायी  लेखणीचा प्रवास...यापुढे ही आनंदमय जावो हिच. मनस्वी सदिच्छा..

त्यांच्या नावाप्रमांणे त्यांच्या वागण्यात, बोलण्यातच खरा आनंद दडलेला, निरव शांततेचा आभास घडवणारी "कातरवेळ" तो "चिल्ड" अनुभव असल्यामुळे या जन्मदिनी त्यांच्या स्वानुभवाचा आम्हास लाभलेला स्पर्श आहे. या शुभदिनी उत्कट क्षणी बहरलेली 'आनंद' ही अंतर्बाह्य सलग आणि एकच भावजाणीव म्हणजे आनंद नक्षणे....

अशा या उमद्या पर्मोच्चआनंद दिलखुलास व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा..!!

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
पुनःश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा..!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर, परिवार 

वणीत शास्त्रीय नृत्याने रंगली चैत्राची रात्र...

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील स्थानिक श्री जैताई देवस्थानामध्ये चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. त्या अंतर्गत रोज रात्री विविध कार्यक्रम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी ‘गीत रामायण’ या शीर्षकाखाली एक कार्यक्रम झाला.

संस्कार भारती समिती शाखा वणी व नूपुर नृत्य निकेतन अकादमी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात गुरु नृत्यांगना सूचना बंगाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण आणि विविध भक्ती गीतांवर शास्त्रीय नर्त्याद्वारे हा कार्यक्रम प्रस्तुत केला. वणीकर श्रोते कार्यक्रम पाहून दंग झाले असून आयोजकांचे विशेष कौतुक केले.

यात त्यांनी विविध गीतांवर कथ्थक हे शास्त्रीय नृत्य सादर केले. सतीश बगडे यांनी गणेश वंदना आणि जय जय नंदकिशोर हरे या नृत्यासह कार्यक्रमाचा आरंभ केला. त्यानंतर साक्षी गायधने यांनी सरस्वती स्तुती आणि आईगिरी नंदिनी ही नृत्य प्रस्तुत केलीत. गुरु सूचना बंगाले यांनी ठुमक चलत रामचंद्र, विठू माऊली, भजे वसंतम आदी नृत्य सादर केलीत.
सतीश आणि साक्षी यांनी हम कथा सुनाते है, हनुमान चालिसा आणि अबीर गुलाल ही नृत्य प्रस्तुत केलीत. माही सांबारे यांनी धन्य धन्य प्रदक्षिणा प्रस्तुत केलं. त्यानंतर पल पल हे भारी हे समूह नृत्य झालं. सुनिता डाबरे, निखिल वाघाडे, जयती सुराणा, स्पृहा कोरडे, आरोही खैरे यांनी रामचंद्र कृपाळू ही नृत्य प्रस्तुत केलीत. 

यावेळी माधव सरपटवार अशोक सोनटक्के यांनी सूचना बंगाली तथा कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला तसेच राजू उंबरकर यांचा मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचा संचालन अभय पारखे यांनी केलं मैफिलीचे निवेदन सूचना बंगाली यांनी केले असून, तांत्रिक बाजू सागर मुने यांनी सांभाळली, चंद्रकांत अणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मैफिलीचा लाभ शहरातील सर्व रसिक श्रोत्यांनी आणि भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.