शालेय कर्मचारी पतसंस्थेत सहकार पॅनल ने मारली बाजी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. मारेगाव र. नं. 1061 च्या दि.5 फेब्रुवारी ला झालेल्या पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनल ने 15 पैकी 12 जागेवर विजय मिळवीत बाजी मारली. 
      
5 फेब्रुवारीला शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचे इतर मागासवर्गीय गटात गजानन देवाजी उपरे बिनविरोध निवडून आले. सर्वसाधारण गटात सहकार पॅनल चे संजय नानाजी पोटे, विजय तानबाजी नाखले, विनोद केशवराव देवाळकर, श्रीकांत गिरीधर गोहोकर, दिनेश अरुणराव गुंडावार, माधव झिंगराजी कोहळे, भूदेव माधवराव पांडे, अनिल दुर्गदत्त पेचे तर अनुसूचित जाती व अनु. जमाती मतदार संघात अरुण बळीराम भरणे, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र मतदार संघात पंकज भारतराव राठोड, सपना बापूराव गेडाम विजयी झाल्या तर सर्वसाधारण गटात परिवर्तन पॅनल चे नितीन विजय कापसे, तर महिला राखीव गटात संगीता उमाकांत आवारी व सर्वसाधारण गटात अपक्ष विलास तात्याजी आसुटकर विजयी झाले.

या शालेय कर्मचारी पतसंस्थेवर सहकार पॅनलने 15 पैकी 12 जागेवर विजय प्राप्त करीत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.

इंडियन स्कॉलर्स अकॅडमी स्कुल चे वार्षिक स्नेह सम्मेलन संपन्न


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : इंडियन स्कॉलर्स अकॅडमी स्कूल मार्डी येथील तीन दिवसीय स्नेह-सम्मेलन मोठ्या थाटात संपन्न झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच रविराज चंदनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भास्करराव धानफुले, तर प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख अरविंद ताटेवार सर, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, माजी सरपंच तानबाजी नाखले, उपसरपंच सुधाकरजी डाहुले, ग्रा. पं. सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके, मंगला टिपले, शोभा कालर, छाया पुसाटे, मनिषा चौधरी इं. उपस्थित होते.
या निमित्ताने माजी विदयार्थी ईतिहास अभ्यासक समीर लेनगुले, संस्थेच्या अध्यक्षा मालाताई बदकी मॅडम, सचिव गौरव बदकी, मुख्याध्यापक केशव रिंगोले, शितल शेंडे, विनोद आंबेकर, प्रियंका डुकरे, प्रतिक्षा भगत, संदीप झोटींग, चंद्रकांत वांढरे, नेताजी बलकी उपस्थित होते.

या वार्षिक स्नेहसंमेलनात एकल नृत्य, समुह नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पालकांसाठी खेळ, आनंद मेळावा, खेळ यासारख्या विविध स्पर्धांचे व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,  समारोपीय दिवशी बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले. 

युवानेते अतुल पचारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..



             वा|ढ|दि|व|स || अ|भि|ष्ट|चिं|त|न

युवा नेते 
   अतुल पचारे...
          सामाजिक, राजकीय क्षेत्रात उडी घेत समाजाला न्याय देणारं व्यक्तीमत्व "अतुल पचारे" हे तालुका स्थळावर नाव चांगले सुपरिचित. मारेगाव तालुक्यातील विविधांगी विषयावर हात घालून पाठपुरावा करणारे,उमदा युवानेते तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम आहे.
    
त्यांच्या जन्मदिनी अतुल पचारे यांना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो..

व्हावास तूम्ही शतायुषी,
व्हावास तूम्ही दीर्घायुषी,
ही एकच आमची इच्छा,
              तुमच्या भावी जीवनासाठी.
              ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी 
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी 
              एक अनमोल आठवण ठरावी,
             आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, हीच शुभेच्छा.. !

अतुल भाऊ आपणास प्रगटदिनाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा सर्व भोई समाज मित्र परिवार, मारेगाव (तालुका)

मारेगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासनाची ‘मोठी’ कारवाई…


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजता च्या दरम्यान, शहरातील घोंन्सा रोड लगत असलेल्या एका स्विट मार्ट व्यवसायिकाच्या गोडावून वर धाड टाकून प्रतिबंधक सुगंधित तंबाखू व वाहन असा एकूण १६ लाख रुपयाच्या मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषधं प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करून जप्त केला. ही कारवाई तालुक्यातील सर्वात मोठी मानली जात असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

सविस्तर असे की, एलसीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून माजिद शेख यांच्या घोंन्सा रोड लगत एका गोडाऊन मध्ये स्विट मार्ट व्यवसायाच्या आड प्रतिबंधक सुगंधित तंबाखू चा अवैध साठा मोठ्या प्रमाणात साठवून असल्याची खबर मिळताच गोडावून मध्ये धाड टाकून प्रतिबंधक तंबाखू व वाहन हस्तगत केले. ही कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा व व अन्न व औषधं प्रशासन विभागाने संयुक्त केली. सदर कारवाईत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू १३ लाख व वाहून नेणारे वाहन अंदाजे किंमत तीन ते चार लाख असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मागास असलेल्या तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असल्याचे बोलले जात आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोडे यांचे मार्गदर्शनात सहा. पो.नि. अमोल मुडे, घनश्याम दंडे, प्रदीप परदेशी, व जमादार आनंद आचलेवार यांनी ही केली.

एक पिढी दुसऱ्या पिढीला स्वप्नांचा वारसा देते तेव्हा स्वप्न पूर्ण होतात - प्रा. डॉ. अविनाश कोल्हे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : एखादा देश असो किंवा त्या देशाची राज्यघटना असो याच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. हे स्वप्न साध्य करण्यासाठी एक पिढी दुसऱ्या पिढीला या स्वप्नांचा वारसा देते तेव्हा स्वप्नांची पूर्तता होत असते असे विचार मुंबई येथील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. अविनाश कोल्हे यांनी मांडले. ते येथील नगर वाचनालयातर्फे आयोजित हेमंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ( एक आकलन) या विषयावर गुंफताना बोलत होते. 

       या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अर्बन क्रेडिट बँकेचे अध्यक्ष संजय खाडे हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात वैष्णव जन तो या विजय गंधेवार यांनी गायलेल्या गीताने झाली. त्यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. 

     आपला विषय पुढे मांडताना डॉ. कोल्हे यांनी सन 1773 साली इंग्लंडच्या पार्लमेंटने भारतासाठी पहिल्यांदा रेग्युलर अक्ट हा कायदा बनविला तेव्हापासून भारताच्या राज्यघटनेच्या जडणघडणीची सुरुवात झाली होती. त्या नुसार भारतात गव्हर्नर जनरल हे पद निर्माण करण्यात आले. सन 1760 मध्ये इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान लावण्यात आले. ते अजूनही सुरू आहे. सन 1818 साली पेशव्यांच्या अस्ता सोबत इंग्रजांची निरंकुश सत्ता सुरू झाली. एका कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्ता काढून घेऊन 1857 पासून इंग्लंडच्या राणीचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला. 1892 मध्ये प्रांत पातळीवर विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. 1909 च्या कायद्यानुसार 60 भारतीयांना खासदार म्हणून नेमणूक करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली. सन 1917 साली इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. अशा प्रकारे स्वातंत्र्य मिळण्याआधीच आपल्याला शासन व प्रशासन चालविण्याचे शिक्षण इंग्रजाकडून मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्ष संविधान समिती तयार होऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रम घेतल्या नंतर संविधानाची निर्मिती झाली. इंग्रजांनी बनविलेल्या 200 ते 250 कायद्यपैकी 80 ते 90 टक्के कायदे त्याला भारतीय मुलामा चढवून अजूनही तसेच आहेत. 
    प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना संजय खाडे यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील अतिशय सुंदर अशी राज्यघटना असून तिचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषण करतांना आशिष खुलसंगे यांनी आता देशात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये भगवतगीतेचा व संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा समावेश करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. हे व्याख्यान मंजिरी व सुधीर दामले यांनी स्व. निर्मला वामनराव वैद्य यांच्या स्मरणार्थ आयोजित केले होते.

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अभिजित अणे यांनी मानले. या प्रसंगी वाचनालयाचे अनिल जयस्वाल, अर्जुन उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.