कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन तथा महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सिन्देवाही : तालुक्यातील कळमगाव गन्ना येथे ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच व नगर बौध्द पंच कमेटी यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान सन्मान दिन समारोह तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन सोहळा दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ ला राजा बिंबीसार बुध्दविहार कळमगाव गन्ना येथे संपन्न झाला.

             सदर कार्यक्रमाचे नियोजन दिवसभरात चार सत्रामध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये सकाळी ६ ते ९ पर्यंत गावामधुन संविधान सन्मान दिवसानिमित्य रॅली काढण्यात आली. त्यात नवेगाव लोन व पळसगाव जाट येथील समता सैनिक दलाचे पथसंचालन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी १ ते ५ पर्यंत संविधान सन्मान दिन तथा राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.प्रताप नगराळे सर,प्रमुख मार्गदर्शक निखिल ठमके सर, बळीराज निकोडे सर, प्रमुख अतिथी बाबुरावजी गेडाम, डाॅ. राजपाल खोब्रागडे, गेंदबाजी खोब्रागडे, डाॅ. रविन्द्र शेंडे, मोटघरे सर, सेमस्कर सर यांचे वैचारीक भाषणे झालीत.

          तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सस्नेह भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. चवथ्या सत्रामध्ये सायंकाळी ७ वाजतापासुन भव्य एकल नृत्य स्पर्धा खुला गट घेण्यात आला. त्यात प्रथम पारितोषिक ७०००/- व्दितीय ५०००/- व तिसरे ३०००/- ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक अरविंद जैस्वाल, दीपप्रज्वलन मदारे सर, अध्यक्ष अशोक खोब्रागडे, प्रमुख अतिथी प्रभुदास चौधरी, हटवादे मॅडम, मुकेश बन्सोड, दशरथ मडावी, सुदाम खोब्रागडे, शिरीष चांभारे, राजु चांभारे, राजु सरपाते, लताताई गेडाम हे उपस्थित होते.

          या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कळमगाव ग्रामिण फुले-शाहु आंबेडकर विचार मंच, समता जनकल्याण प्रतिष्ठाण, रमाबाई महिला मंडळ, बौध्द समाज कळमगाव गन्ना यांनी केले होते. यात भारत शेंडे, अमरदिप मेश्राम, प्रविण मेश्राम, कोमल गेडाम, अमित जुंबळे, राहुल खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रफुल्ल वाकडे, अनिल जुंबळे, अक्षय रामटेके, अतुल जुमळे, वैभव वाकडे, रुंदन गेडाम, रोशन खोब्रागडे, प्रशांत अलोणे, विक्की गेडाम, शिलानंद रामटेके, संतोष वाकडे, शाहुर खोब्रागडे, राहुल गेडाम, राष्ट्रपाल रामटेके, प्रणय गेडाम, मंगेश वाकडे, स्वप्निल जुंबळे, भगवान जुंबळे, शुभम निमगडे, प्रणित गेडाम, प्रफुल्ल गेडाम, पियुष शेंडे, भारत गेडाम, स्नेहल गेडाम, जगदिश खोब्रागडे, सुरज खोब्रागडे, हिनयान खोब्रागडे, प्रफुल्ल खोब्रागडे, संघपाल खोब्रागडे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

जातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मान. अपेक्षा पिंपळे ह्या होत्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. वैशाली टोंगे आणि प्रा. योगेश दूधपचारे हे होते. आपल्या भाषणात प्रा. दुधपचारे यांनी संविधान सर्व भारतीय लोकांचे, भारतीय लोकांसाठी आहे आणि म्हणुन भारतीय लोकांनी संविधानाचे संवर्धन करावे असे प्रतिपादन केले. अॅड. वैशाली टोंगे यांनी ओबीसी समाजानी संविधान समजुन घेण्याची गरज आहे, कारण संविधानाने ओबीसी, एस. टी., एस. सी. आणि इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण दिले आहे आणि सर्व भारतीयांसाठी हक्क प्रदान केले आहे म्हणूनच तर ओबीसी समाजाला सन्मानाने जगता येत आहे.
नव्हे तर भारतीय स्त्रीयांना मताचा अधिकार काही न कर्ता संविधानाने दिला आहे. तेंव्हा भारतीय स्त्रियांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही विसरु नये असे वक्तव्य केले. संघटनेच्या शहर महासचिव कोमल बोरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाच्या अध्यक्ष मान. अपेक्षा पिंपळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत ह्या लोकशाही राष्ट्राला एका धर्मापूरते मर्यादित करु नये ते संविधान विरोधी असेल. कारण भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता स्विकारली आहे. ती कायम रहावी असे सांगून त्या अशाही म्हणाल्या की, भारत जातीमुक्त झाल्याशिवाय भारत जोडो अभियान यशस्वी होणार नाही.

अलीकडे विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात काही पक्ष आहेत मात्र विरोधी पक्ष मुक्त भारत केल्याने फार तर लोकशाही नष्ट करता येईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या जिल्हा महासचिव प्रतिक्षा पाटील तर सुत्र संचालन उपाली अलोने यांनी केले. संविधान सन्मान या राष्ट्रीय समारंभाची सुरवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आले तर समारंभाचा समारोप राष्ट्रीय गीतांनी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धिरज रासेकर, प्रशांत रामटेके, संबोधी भडके, रितीक ढवळे, ममता खोब्रागडे, विदीना अलोने, क्विटन थूल, रितु अलोने, लक्की पिंपळे, आदित्य धोटे, आयुष धाकडे, नवज्योत जांभुळे, अमर आमटे यांनी प्रयत्न केले.

शेतात रानडुकराने घातला धुडगूस; पिकांचे केले नुकसान

सह्याद्री चौफेर | नितेश वनकर 

मारेगाव : मच्छिन्द्रा शिवारातील राज्य मार्गांलगत असलेल्या शेतात रानडूधुडगूस घालून कपाशी चे मोठ्या प्रमाणात नासधूस करून नुकसान केली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून, झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

मारेगाव तालुक्यात सध्या वाघाचा धुमाकूळ असतांना रानडुकरांनी धुडगूस घालणे सुरु केल्याने उभ्या पिकांचे नासाडी करतांना दिसत आहे. रामदास गणपत वडस्कर यांच्या शेतातील जवळपास अर्धा ते एक एकर खाण्यासाठी कपाशी चे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.


रान डुकराच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेयकुटीस आला आहे. शेतकरी आपल्या शेतात रान डुकराचा त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या कलप्त्या लढविताना दिसत आहे. गावातील शेतात लोकांनी राखण करण्याचे उपाय केले आहेत. रात्री पिपा वाजवणे,फटाके फोडतात, विविध आवाजाची म्युजिक वाजवण्यात येतात तरीही शेतकऱ्यांची नजर चुकवून शेती फस्त केली जाते. संबंधित विभागाने शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामदास गणपत वडस्कर यांनी केली आहे.

मायबाप सरकार बेघर नका करु हो; गरीबाच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष....


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : शासनाच्या कल्याणकारी ध्येय धोरणानुसार गोरगरिब,सामान्य लोकांना निवा-याची व्यवस्था व्हावी म्हणुन भरपूर योजना राबविण्यात आल्या, जागा नाही अशांना पट्टे वाटप केले, ज्याना घरे नाही अशांना पक्के घरे दिलीत, सोबतच त्यांच्या वास्तव्यासाठी रस्ते, नाली, वीज, आरोप आदीची सुविधा केली. या सर्व कल्याणकारी योजनेचे सवागत आभिनंदन केले जात असले तरी गेली 60 ते 70 वर्षापासून गावराण, महसूल जागेत वास्तव्यात असलेल्या अतिक्रमणावर आता मात्र अतिक्रमन हटाव मोहिमे अंतर्गत बुलडोजर चालविण्याचा फर्मान घेतल्याने हतबल झालेली गोरगरिब जनता आता आमचा वाली कोण? अशा केविलवाणी नजरेने पाहत असुन आर्त हाक लोकप्रतिनिधिना देत असल्याचे दिसत.आहे मात्र गोरगरिबाचे रान पेटत असताना गरिबांच्या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधि चुप्पी साधुन असल्याचे दिसुन येत आहे मात्र, गरिबाचा वाली कोण? यावर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहे.
राज्यासह जिल्हा भरात मा.उच्च न्यायालय यांच्या कडील पीआय एल नं.2/2022 मधील दि 15 सप्टेंबर व 6 आक्टोंबर 2022 चे आदेश महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966कलम 53 (1-अ) अन्वये ,तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966कलम 53(1-अ) अन्वये शासनाकडे.विहीत असलेल्या कोणत्याही जमीनीचा अनाधिकृत पणे भोगवाटा करणाऱ्या व्यक्तिस निष्कासित करण्याची तरतुद.असताना,उपरोक्त नमुद केलेल्या शासकीय जमीनीमध्ये केलेल्या अनाधिकृत कब्जा निष्कासित करावा अन्यथा सदरचे अतिक्रमण शासनातर्फ हटविण्यात येईल.असा फर्मान महसूल विभागामार्फत अतिक्रमण धारकांना बजावला आहे, अशा अतिक्रमण हटाव मोहिमेत सावली तालुक्यातील 14 गावाचा समावेश असुन 464 कुटुंबाना नोटीस बजावण्यात आला आहे.

यात पेंढरी, मुडांळा, चकपिरंजी, खेडी, पाथरी, भारपायली, चारगांव आदी 14 अशा समावेश असून 464 कुटुंबियाना तहसीलदार सावली यांनी परत दुस-यांदा नोटीस बजावले आहे. त्यामुळे बेघर.होण्याच्या धास्तीने अनेक कुटुब भयभीत असुन निवेदनाच्या माध्यामातुन अतिक्रमण न हटवता कायम स्वरुपी पट्टे द्या अशी केवीलवाणी विनंती कार्यालयात निवेदनन देऊन करीत आहेत, मात्र गरिबांच्या अशा बेघर होण्याच्या समस्येकडे कुण्याही लोकप्रतिनिधिचे लक्ष असु नये ,याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

सावली तालुका धान उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असुन तालुक्याच्या एकुण भौगोलिक क्षेत्रापैकी 9451.12 हेक्टर हे जंगलाखालील क्षेत्र असुन या भागालगत मोठ्या प्रमाणात शेतजिमिनी आहेत,आणि त्याला लागुनच लोकवस्ती निर्माण झालेली आहे.या मध्ये अकृषक क्षेत्र 141.46 हेक्टर,गावराण क्षेत्र.491 12 हेक्टर, गायरान क्षेत्र 584.63हे.,सरकारी पडीत जमीनेचे क्षेत्र 9734.74 हे.असून अशा भागातील काही गावात गेली अनेक वर्षांपासून गरीब जनतेचे वास्तव्य आहे, या वास्तव्यात.सदर कुटुंबाच्या.तीन.पिढ्या निघुन गेल्या ,निवारा आणि जागेच्या शोधात अनेक गरीब जनतेने अशा भागात आपला संसार.थोटला असताना नुकतेच शासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा फतवा दिल्याने. या भागातील गरीब जनता हैराण झाल्याचे दिसून येत आहे.अशा गंभीर समस्येकडे.शासन काय निर्णय घेते? की गरिब जनतेला बेघर करते.याकडे सर्वांचे.लक्ष लागले असून गरिबांच्या अशा ज्वलंत समस्येकडे लोकप्रतिनिधी मात्र चुप्पी साधुन असल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा शंकर कोडापे सुवर्ण व रजत पदकाचा मानकरी

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : गोंडवांना विद्यापीठांतर्गत वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात सुरू असलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी खेळ स्पर्धेत स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बि.ए. व्दितीय वर्षाचा विद्यार्थी शंकर मल्लेश कोडापे या विद्यार्थ्यांने हातोडा फेक या स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गोळा फेक स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. सावली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शंकर कोडापे या विद्यार्थ्यांने विद्यापीठाच्या स्पर्धेत क्रमशा सुवर्णा व रजत पदक प्राप्त करणाऱ्या शंकरला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. भास्कर सुकारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शंकर कोडापे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार आणि महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.