मूल-मरोडा कृषी महाविद्यालयासाठी कृषीमंत्र्यांकडून 25.55 कोटी मंजूर


सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

मुंबई : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल-मरोडा (चंद्रपूर ) येथे शासकीय कृषी महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 25.55 कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश दिले. वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करीत होते.चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या विकसात्मक कार्याचे हे मोठे यश आहे.

मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी कृषी मंत्री श्री सत्तार यांच्यासोबत मूल कृषी महाविद्यालयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कार्यतत्परतेचा परिचय देत तातडीने स्वाक्षरी करुन निधी मंजूर केला.

मुल-मारोडा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी पहिल्‍या टप्‍प्‍यात ६४.५९ कोटी रू. किंमतीच्‍या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. शासनाच्‍या कृषी व पदूम विभागाच्‍या 16 मार्च 2022 च्या शासन निर्णयान्‍वये सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी ६४.५९ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. 

श्री. मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्रीपदाच्‍या कार्यकाळात दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मुल-मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर करण्‍यात आले. या महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी महाराष्‍ट्र कृषी संशोधन परिषद पुणे यांच्‍यामार्फत रू.१३३.३५ कोटींचा प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला होता. या प्रस्‍तावाची छाननी करून ६४.५९ कोटीच्‍या प्रस्‍तावाला प्रशासकीय गेल्या वर्षी मार्च मध्ये मान्‍यता देण्‍यात आली.सदर कृषी महाविद्यालयाच्‍या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्‍ध करावा यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला होता. 

निधी मंजूर केल्याबद्दल कृषी मंत्री श्री. सत्तार यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आभार मानले.

जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आदर्श ग्रामपंचायत कोसंबीला भेट..!


सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
मो.9623494935
मुल : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाँन्सन यांनी नुकतीच मुल पंचायत समिती ला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. दरम्यान पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कोसंबी येथे सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान गावातील विकास कामाची पाहणी केली व अंगणवाडीतील महीलां, वाचनालयातील विद्यार्थी आणि सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध उपक्रमाविषयी चर्चा केली. तसेच सोमनाथ गोसदन, मारोडा तलाव सौंदर्यीकरण बाबत चर्चा केली व गांडूळ खत प्रकल्प चे उद्घाटन केले. या प्रसंगी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत आणि कोसंबी चे सरपंच रवींद्र किसन कामडी, तसेच विस्तार अधिकारी संजय पुप्पलवार, जीवन प्रधान, सुनिल कारडवार, उपविभागीय अभियंता गोंगले, बिसेन, भाग शिक्षणाधिकारी वैभव खांडरे , सतिश वनकर, प्रज्ञामित्र नगराळे ,बोरकर, ग्रा.पं चे सचिव सुरज आकनपल्लीवार, उपसरपंच सारिका गेडाम, सदस्य चंदा कामडी, अरुणा वाढई, रोषनी मोहुर्ले, चौधरी आणि कर्मचारी वृंद, महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी चे अध्यक्ष वेदिका विवेक सोनुले, सचिव आणि सदस्य गण, सर्व महीला बचत गट, सर्व पुरुष बचत गट,पशु सखी,आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सर्व महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले महाराज, आणि सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील अर्चना मोहुलै, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, ,निषाताई सोनुले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी चौधरी, उमाजी पेंदाम, नारायण गिरडकर, जि.प. उच्च प्राथमिक शाळा शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी , पालक, ग्राम पंचायत कमेटी, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय कोसंबी, नवयुवक वायामशाळा,आंगनवाड़ी सेविका, आंगनवाड़ी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कृषी मित्र, संगणक परिचारक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक मंडळ, युवती मंडळ, आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जय सहकार पॅनलला भरगोस मतांनी विजयी करा - अ‍ॅड. देविदास काळे यांचे आवाहन


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी,मारेगाव,झरी, मुकुटबन, मार्डी या परिसरात पसरलेल्या दि वसंत जिनिंग या सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थेची निवडणूक दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनल, तर काँग्रेसचे दुसरे लोकनेते अ‍ॅड. देविदास काळे समर्थित जय सहकार पॅनल, भाजप प्रणित ठाकरे गट व भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना असा चौरंगी सामना रंगणार आहे. 17 संचालक पदासाठी होणाऱ्या या निवडणुकीत 67 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे.

अंतिम टप्प्यात आलेल्या वसंत जिनिंगच्या निवडणुकीची रंगत वाढायला लागली असून जय सहकार पॅनलला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता इतर पॅनलचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे वसंत च्या निवडणुकीत जय सहकार पॅनलचा विजय निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष उल्लेखनीय की,निवडणुकीचा प्रचार प्रारंभ झाल्यापासून सहकारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोअर टू डोअर जाणे, मतदारांना जागृत करणे, वसंत जिनिंग सहकाराचा उदय हा सर्वसामान्य जनतेचे उत्थान करण्यासाठी झालेला आहे. तो यापुढे ही शेतकरी मायबापांना होईल, त्यासाठी परत श्री काळे साहेब यांच्या कुशल नेतृत्व व विकासात्मक धोरणाची गरज "वसंत" ला आहे, असे अनेकांचे मत ऐकायला मिळत आहे. या निवडणूक अनुषंगाने वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी त्यांच्या बाजूने किंबहुना त्यांच्या समर्थनात प्रचारी धुरा अत्यंत चोखंदळपणे सांभाळत आहे. त्यांच्या कार्याला सलाम म्हणत याचे नक्कीच फळ विजयात रूपांतर होणार असा आशावाद अ‍ॅड. देविदास काळे व्यक्त केला आहे.

तूर्तास वणी विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि राजकीय दृष्टया फायदेमंद असलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. मतदारांनी या चौरंगी लढ्यात भक्कमपणे आमच्या जय सहकार पॅनल च्या पाठीशी उभे राहून आपले अमूल्य मत जय सहकारला आपल्या सहकार'ला भरघोस मतांनी निवडून द्याल असे आवाहन जय सहकार पॅनल च्या वतीने करण्यात आले आहे.


आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन आणि ग्रामपंचायत चकपिरंजी तर्फे सामूहिक फळबाग लागवडीला सुरुवात

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
                 
सावली : आज गुरुवारी चकपिरंजी येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. चकपिरंजी येथील १८ एकर सामाजिक कुरण जमिनीच्या जागेवर ग्रामपंचायत चकपिरंजी व आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक फळबाग लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये आय.सी.आय.सी.आय. फाउंडेशन तर्फे विविध प्रकारच्या फळझाडांची रोपे, जैविक खते, पाणी व्यवस्थापन व कुंपणासाठी जाळी उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर ग्रामपंचायत चकपिरंजी यांच्यावतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोपांचे संगोपन व संवर्धन केले जाणार आहे. जेनेकरून भविष्यातील भेळसावणाऱ्या रोजगाराच्या संबंधाने गावातील नागरिकांच्या पलायनाच्या समस्येवर आळा बसणार असून गाव स्वावलंबी व स्वयंरोजगारपूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे.

आजच्या या स्तुत्य उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत कार्यालय चकपिंरजीचे सरपंच मा.सौ.उषाताई गेडाम तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.वाघमारे साहेब मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग सावली, मा.श्री.आर.जी.परसावार विस्तार अधिकारी पंचायत समिती सावली, मा.श्री. भक्तदासजी आभारे, ए.पी.ओ.पंचायत समिती सावली, मा.श्री.प्रशांतजी भोयर, ए.पी.ओ.पंचायत समिती सावली, मा.भावनाताई भानारकर सचिव ग्रा.पं.कार्यालय चकपिरंजी, मा.श्री.वेणूदासजी मडावी उपसरपंच ग्रा.पं. चकपिरंजी, मा.श्री.ईश्वरजी मेश्राम पो.पा.चकपिरंजी, मा.श्री.प्रकाशजी लाटकर अध्यक्ष तंटामुक्ती समिती, मा.श्री.अनिलभाऊ स्वामी अध्यक्ष सेवा सह.सोसायटी सावली, मा.श्री.अरविंदजी भैसारे सदस्य ग्रा.पं.चकपिरंजी, मा.श्री.अमृतभाऊ चौधरी सदस्य ग्रामपंचायत चकपिरंजी, मा.सौ.मेहमूदा शेख सदस्य ग्रा.पं.चकपिरंजी तसेच मा.श्री.अर्जुनजी भोयर, मा.श्री चंदूभाऊ गुरनुले रोजगार सेवक ग्रा.प.चकपिरंजी, आय.सी.आय.सी.आय.फाउंडेशनचे विकास अधिकारी मा.श्री.अनंत गायकवाड, मंगेश राजुरकर, रंजित कोटगले. रो.ह.यो कामगार तसेच चकपिरंजी ग्रामस्थ उपस्थित होते .

मा.भावनाताई भानारकर ग्रा.पं.सचिव यांनी आय.सी.आय.सी.आय फाउंडेशनचे गावात सुरु असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देऊन प्रास्ताविक केले. मा.श्री.वाघमारे साहेब मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले. मा.श्री.आर.जी.परसावार विस्तार अधिकारी यांनी फळबाग लागवडीच्या माध्यमातून भविष्यात ग्रा.पं.चा आर्थिक दर्जा वाढून ग्रा.पं.सक्षम कशी बनेल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मा.सौ. उषाताई गेडाम ग्रा.पं. सरपंच यांनी फळाबाग लागवड करणे म्हणजे एक प्रकारची ग्रा.पं.आर्थिक बळ वाढणे आणि गावाला एक रोजगार उपलब्ध करून लोकांना स्वयंमरोजगार करण्यासाठी लावणे या मार्गदर्शनातून आय.सी.आय.सी.आय फॉउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

मा.श्री.प्रशांतजी भोयर ए.पी.ओ यांनी मजुराना फळबाग लागवड संदर्भात मार्गदर्शन केले. मा.श्री. अर्जुनजी भोयर यांनी वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे आणि त्याचे योग्य प्रकारे संगोपन केले तर गावाचा विकास होईल याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश राजुरकर यांनी केले तर आभार रंजित कोटगले यांनी मानले.

कन्हाळगाव - सावरगाव रस्त्यावरील खड्डा जीवघेणा.


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभीड : तालुक्यातील सावरगाव - कन्हाळगाव रोडवरील सावरगाव पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रोडच्या बाजूच्या खड्ड्यात सकाळी सकाळी भ्रमंतीला गेलेला युवक रेती तस्कर ट्रॅक्टर पासून वाचण्याच्या नादात खड्ड्यात पडल्याने किरकोळ जखमी. वृत्त याप्रमाणे की कन्हाळगाव सावरगाव रोडचे काम सुरू होणार असून त्यापूर्वीच एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या बाजूला आठ ते दहा फूट खोल जे.सी.बी.ने खोदुन ठेवलेला खड्डा कंत्राट दाराने तसाच खुला ठेवलेला आहे. मात्र या रस्त्याने तळोदी कडून नवरगावला जाणारी नागपूर - नवरगाव बस , किंवा इतर वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते मात्र तो खड्डा खुलाच ठेवल्यामुळे या खड्ड्यात मोठे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नकारता येत नाही. अशातच आज आपल्या मित्रांसोबत पहाटेला कन्हाळगाव रोड कडे व्यायाम करायला गेलेला सावरगाव येथील युवक हितेश विलास मुंगमोडे हा व्यायाम करून परत येत असताना. सावरगावच्या नदीतून रेती चोरी करून कन्हाळगाव कडे जाणाऱ्या रेती तस्कराच्या भरगाव वेग ट्रॅक्टर पासून बचाव करण्याकरता बाजूला अचानक खड्ड्यात पडल्याने किरकोळ जखमी झाला. तरी संबंधित ठेकेदाराने बांधकाम करण्याच्या एक दोन महिना पूर्वीच असा खड्डा करून न ठेवता किंवा खड्डा खोदल्यानंतर तात्काळ बांधकाम करणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदार या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते काही असले तरी यामध्ये बस, ट्रॅक्टर, किंवा इतर मोठे वाहन किंवा एखादी दुचाकी स्वार पडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डा बुजवावा. अशी मागणी सावरगाव येथील व सावरगाव ला ये जा करणाऱ्या कन्हाळगाव येथील रहिवासी लोकांनी केलेली आहे.