वाघाच्या हल्यात महिला ठार, तोरगाव (बु.) येथिल घटना


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : शेतशिवारात धान कापनी व धान बांधणीचा हंगाम सुरु आहे. असातच तोरगाव (बुज.) येथिल एक महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज 10 वाजता चे दरम्यान घडली. ब्रम्हपूरी वनविभागातील तोरगाव (बुज.) येथिल जाईबाई तुकाराम तोडरे वय 55 वर्ष ही महिला स्वता:चे शेतात धान बांधणी नतंर पडलेला धान(सरवा) वेचत असताना.दबा धरून बसलेला वाघाने महिलेवर आचानक हल्ला करून ठार केले. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एकच गर्दी जमली.मॄत्तक जाईबाई तोडंरे यांचे पच्छात कुटुंबात सात जण असुन परिवारावर दुःखा चे डोंगर कोसळले आहे.या परिसरात नरभक्ष वाघाचे वास्तव्य असुन एका मागो-माग मानवावर वाघाचे हल्ले सुरुच असल्याने या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा असी मागणी या परिसरातील जनतेनी केली आहे.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी: तालक्यातील कोलार पिंपरी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अनिरुद्ध प्रकाश बोंडे (२१) असे मृतकाचे नाव आहे. अनिरुद्ध हा आई व भावासोबत राहायचा व दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. आज मंगळवारी सकाळी घरातील सदस्य उठले असता त्यांना अनिरुद्ध घरात आढळून आला नाही. त्यांनी गावात शोधाशोध केली मात्र अनिरुद्ध आढळून आला नाही. दरम्यान गुरांच्या गोठ्यामध्ये त्यांना अनिरुद्ध गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत मृतकाचे काका गजानन बोंडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
जाहिरातसाठी संपर्क : 9011152179

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मुंबई : धेय वेडेच इतिहास घडवतात, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात धेय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या पाठीशी असून उत्तन जवळ नवीन चित्रनगरी बनविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. 

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांनी गड - किल्ल्यांची केलेली बांधणी, उंचावरील तोफा, गडावरील पाणीसाठा हे काम दूरदृष्टीचे होते. हे वैभव पाहून रयतेचा राजा नजरेसमोर येतो. त्यांच्यावरील सर्वच चित्रपटांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला देखील रसिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट कात टाकतोय असे सांगून हा चित्रपट देखील भव्य बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणारे विराज मडके, तुळजा जामकर यांची भूमिका साकारणारे जय बुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारणारे प्रवीण तरडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार साकारणार आहेत.

डिसेंबर मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून सन 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

वसंत जिनिंग निवडणूक धुरळा : सहकारच्या प्रचाराला डोअर टू डोअर प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 
      
वणी : दि. वसंत को-ऑपरेटीव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी निवडणुकीचा धुरळा उडताच तब्बल चार पॅनल उभे ठाकले आहे. आपलेच पॅनल शिक्कामोर्तब करेल यासाठी राजकीय पराकाष्ठा सुरू झाली असून यात जय सहकार पॅनलला मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता अन्य पॅनल चे धाबे दणाणले. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होते की काय? असे वाटायला लागले आहे. 
     
चार पॅनल ने एकमेकांसमोर दंड थोपटले असून वसंत जिनिंग निवडणूक लढत काट्याची होणार असे संकेत दिसून येत असून वसंत जिनींगची निवडणूक अंतिम टप्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनल आमने-सामने उभे ठाकलेले आहे. सध्यस्थितीत सत्तारूढ असलेले अ‍ॅड.देविदास काळे (गट) समर्थित जय सहकार पॅनल,काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनल, भाजप समर्थित शेतकरी एकता पॅनल आणि मराठा सेवा संघ -भारतीय कम्युनिस्ट पक्ष - शेतकरी संघटना समर्थित वसंत जिनिंग बचाव पॅनल असे चार पॅनलने  निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
     
या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने जय सहकार पॅनल चा "डोअर टू डोअर" सुरू असलेल्या दणदणीत प्रचारात सहकार ला जास्त पसंती मिळताना दिसून येत आहे. अ‍ॅड. देविदास साहेब काळे यांच्या कुशल नेतृत्व व विकासात्मक धोरणामुळे मागील रंगनाथ चा विजय झाला. तोच येथेही होईल असे अप्रत्यक्ष बोलल्या जात आहे. 

मात्र, ही चौरंगी निवडणूक लढत काट्याची होणार आहे. मतदार राजा जाणता झाला असून अनुभवी माणूस आणि विकास याकडेच मतांचा कल असणार आहे. आता या निवडणूक लढ्यात कोण मुसंडी मारते हे अवघ्या दिवसातच कळणार आहे.

मत्स्यव्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : मत्स्य व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी, विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त स्तरावरील समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या समस्या सोडविण्याबाबत बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार परिणय फुके, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, सदस्य बंडु हजारे, सहकार भारतीचे वासुदेव सुरमुसे यांच्यासह मच्छिमार समितीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनामार्फत यापूर्वीच मत्स्य व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. नव्याने आयुक्त स्तरावरील समिती दर तीन महिन्यांनी जिल्हा समितीमार्फत केलेल्या कामांचा आढावा घेण्याबरोबरच या सामितीसमोर येणारे प्रश्न निकाली काढेल. महाराष्ट्र राज्य मच्छिमार (गोड्या पाण्यातील )कल्याण विकास मंडळ स्थापन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी यावेळी मांडली. मात्र याबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अशा प्रकारचे कल्याण विकास मंडळ दुसऱ्या राज्यांमध्ये आहे का याबाबत माहिती घेण्यात येईल, तसेच या मंडळाची कार्यप्रणाली कशी आहे हे सुद्धा तपासून घेण्यात येईल. अशा प्रकारचे मंडळ महाराष्ट्रात स्थापन करण्याच्या मागणीसंदर्भात एक समिती करण्यात यावी. या समितीमध्ये मत्स्यविकास विभागाचे संबंधित अधिकारी आणि मच्छिमार प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीने येत्या दोन महिन्यात याबाबत अहवाल शासनास सादर करावा असे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.

मच्छिमार सहकारी संस्थांना मत्स्यबीज संचयन करण्यासाठी पॅकेज देणे किंवा यापूर्वी असे काही पॅकेज राज्य शासनामार्फत देण्यात आले होते का याबाबतही अभ्यास करण्यात यावा. याशिवाय जिल्हा मच्छिमार सहकारी संघांना प्रशासकीय तसेच व्यवस्थापकीय खर्च कराण्यासाठी दहा लाख रुपये अनुदान देणे याबाबतचा अभ्यास विभागामार्फत करण्यात येईल.