राणभाज्या प्रदर्शन, विक्री व मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन पोषण आहार सप्ताह साजरा


रवी घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार सप्ताह निमित्त रानभाज्या प्रदर्शन, विक्री व माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर, प्रमुख पाहुणे मारेगाव येथील डॉ. अस्वले मॅडम व डॉ. गजानन सोडणर सर उपस्थित होते.

डॉ. अस्वले मॅडमनी आपल्या मार्गदर्शनातून वर्तमाकाळात मानवाची बदलत चाललेली जीवनशैली व त्यातून निर्माण होणारे आजार विशेष करून स्त्रियांमध्ये निर्माण होणारे PCOS, अनियमित मासिक पाळी आदि विषयावर आपले विचार मांडले. तसेच डॉ. सोडणर सर यांनी आपल्या वाडवडिलांच्या काळातील पोषण आहार संबंधीत दाखले देत आपले मत व्यक्त केले शेवटी डॉ. घरडे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लुप्त होत चालेल्या राणभाज्या आणि त्याचे फायदे या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. घोडखांदे मॅडम यांनी केले तसेच सूत्रसंचालन डॉ. कांबळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रासेयो विद्यार्थिनी हिने केले. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ. ताणूरकर मॅडम, प्रा. कांबळे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विजय भगत व रासेयो व गृह अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.

जनहित कल्याणकारी संघटना मारेगांवच्या वतीने गोलर कुटुंबाचे सांत्वन व छोटीशी आर्थिक मदत

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सतत होणाऱ्या आत्महत्येमुळे तालुका हादरून सोडला. शासन प्रशासन याकडे फारसं गंभीर नसल्याचे बोलल्या जात आहे. मागील महिन्यात दि.6/8/22 रोजी मंगळवारी मारेगांव तालुक्यातील पांढरकवडा येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती.

आज दिनांक 7/8/22/ रोजी बुधवारला जनहित कल्याणकारी संघटना मारेगांवच्या वतीने आत्महत्या केलेल्या सुधीर गोलर यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाचे सांत्वन व छोटीशी आर्थिक मदत करून त्या कुटुंबाला एक आधार देण्याचे काम जनहित कल्याणकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री गौरीशंकर खुराणा यांच्या आदेशानुसार जनहित कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रोख रक्कम तात्काळ सुधीर च्या आईला 10 हजार रुपये रोख रक्कम देऊन मदत करण्यात आली. तसेच 40 हजार एफ डी (FD) स्वरूपात देण्याचे मान्य केले.

जनहित संघटनेचे संस्थापक व संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्रपणे आवाहन केले की, शेतकऱ्यावर कुठलेही संकट आल्यास आत्महत्या करू नये, कारण देशाचा पोशिंदा हा माझा शेतकरी मायबाप आहे असा संदेश 'जनहित कल्याणकारी संघटने'च्या देण्यात आला. यावेळी काशिनाथ खडसे, रवी पोटे, अंकुश माफूर, प्रमोद रिंगोले, प्रफुल उरकुडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जव्हार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

लाखखिंड येथे ढगफुटीमुळे पिंकाची मोठी नासाठी, नुकसान भरपाईची मागणी

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील लाखखिंड, पळशी, तरोडा येथे दि. ५ सप्टेंबरला दुपारी २.०० वाजता दरम्यान ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असुन यामुळे परिसरातिल शेती खरडुन गेली आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांची मोठी नासाडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन मतद द्यावी अशी मागणी परिसरातिल शेतकऱ्यांनी केली आहे.
ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची तहसिलदार संजय जाधव यांनी पाहणी केली आहे. आधीच खरीपात तुबार, तिबार पेरणीला सामोरे गेलेल्या शेतकऱ्याचे ढगफुटीमुळे अवसान गळयाचे चित्र दिसुन येत आहे. दि. ५ सप्टेंबरला तालुक्यातिल लाखखिंड, पळशी, तरोडा, गोंडेगाव परीसरात दुपारी २.०० वाजता ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. एकतास सुरु असलेल्या या पावसामुळे परीसरातिल नाल्यांना पुर आला. तसेच शेताला तलावाचे स्वरुप आले.

कासारबेहळ: थेट शेतकरी बांधावर कृषी विभागाचे मार्गदर्शन


लखन लोंढे | सह्याद्री चौफेर 

महागांव : शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकावर गोंगलगाय प्रादुर्भाव संकट टळते ते न टळते,आणखी एक संकट उभे राहिले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे ते म्हणजे 'पिवळ्या मोझाक' चा प्रादुर्भाव. 

तूर्तास शेतकऱ्याच्या वतीने शास्त्रज्ञाचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्याची मागणी सन्मानिय नंदकुमार मस्के यांनी कृषी विभागाला केली होती. याची दखल तात्काळ कृषी विभागाने घेत थेट बांधावर कृषी शास्त्रज्ञ व कृषी अधिकारी यांच्या भेटीचे व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिवळा मोझाक आल्यामुळे फवारणी करता करता परिसरातील शेतकरी यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. या रोगामुळे झाडाची पाने लहान होतात. काही पिवळसर होतात, वाढ खुंटते, शेंगाची संख्या सुद्धा कमी होते व शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होते असा हा रोग. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे येथील पीक शास्त्रज्ञ अक्षय इंझाळकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी श्री अशोकराव कऱ्हे, श्री बालाजी बिचुकले, श्री नंदकुमार मस्के, श्री सुखदेव राठोड या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडाची पाहणी केली असता, त्यात पिवळा मोझाकचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी त्यांनी रोगाचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडीचा नियंत्रणासाठी निळे पिवळे चिकट सापळे लावावेत तसेच रसशोषक किडींच्या रासायनिक व्यवस्थापनासाठी लमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के + थेमिथोक्झाम 12.6 टक्के या संयुक्त 5 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी असा सल्ला त्यांनी दिला.
शेतामध्ये पांढरी माशी, मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव असेल व एखादे झाड विषाणू बाधित असेल तर त्या बाधित झाडावरील रसशोषक किडीं पासून इतर झाडामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शेतात असे एखादे बाधित सोयाबीन चे झाड दिसून आले तर ते तात्काळ उपटून जाळून टाकावे किंवा नष्ट करावे असे आव्हान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.प्रशांत नाईक यांनी केले.
ह्याचा प्रादुर्भाव हा फुले संगम या वाणावर मोठ्या प्रमाणात दिसून असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास येत आहे.

यावेळी तंत्रज्ञान समन्वयक नितीन रिठे यांनी शेतकऱ्यांना पुढील हंगामात पिवळा मोझाक रोगाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर बीजप्रक्रिया व सोयाबीन ची लागवड ही बी बी एफ पद्धतीने करून शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करण्याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांनी शेतकऱ्यांना तुमच्या किडी व रोगाचा समस्या आमच्या पर्यंत पोहचवल्या तर आम्ही त्या शास्त्रज्ञाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहू असे आव्हान केले. तसेच फुले संगम या जातीची घेतली कृषी विभागांनी दखल. शेतकऱ्याच्या मागणीला तालुका कृषी अधिकारी यांनी शास्त्रज्ञांना घेऊन केले मार्गदर्शन, शेतकरी निरंजन कवाने, कुबिर राठोड, अशोक करे संभाजी कवाने सरपंच शरद राठोड विटल करे केशव बिचकुले, पिंटु पावडे, रंगराव ठाकरे, बाबुसिंग चव्हाण, मोहन चव्हाण, रूपेश करे, पिंटु पिटलेवाड, सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

या प्रक्षेत्र भेट व मार्गदर्शन साठी मंडळ कृषी अधिकारी के एस राठोड, कृषी सहायक नंदकिशोर आडे, साईनाथ झरीवाड, अविनाश वाघमारे तसेच यावेळी कासारबेहळ, वरोडी, सेवानगर या परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांनी पिकावरील रोग व किडी संबधित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी उपस्थितीतांना मार्गदर्शन मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.