चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील लाखखिंड, पळशी, तरोडा येथे दि. ५ सप्टेंबरला दुपारी २.०० वाजता दरम्यान ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असुन यामुळे परिसरातिल शेती खरडुन गेली आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांची मोठी नासाडी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करुन मतद द्यावी अशी मागणी परिसरातिल शेतकऱ्यांनी केली आहे.
ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची तहसिलदार संजय जाधव यांनी पाहणी केली आहे. आधीच खरीपात तुबार, तिबार पेरणीला सामोरे गेलेल्या शेतकऱ्याचे ढगफुटीमुळे अवसान गळयाचे चित्र दिसुन येत आहे. दि. ५ सप्टेंबरला तालुक्यातिल लाखखिंड, पळशी, तरोडा, गोंडेगाव परीसरात दुपारी २.०० वाजता ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. एकतास सुरु असलेल्या या पावसामुळे परीसरातिल नाल्यांना पुर आला. तसेच शेताला तलावाचे स्वरुप आले.