चंद्रपूर : बिरसा क्रांती दलाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

चंद्रपूर : इयत्ता 10 वी मध्ये 80 टक्केच्या वर, इयत्ता 12 वी मध्ये 70 टक्के च्या वर व पदवी 70 टक्केच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या 'गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि.10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे सभागृह, नागपूर रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार सोहळ्या चे अध्यक्ष मा श्री दशरथ मडावी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल, महाराष्ट्र राज्य हे आहेत. तर उदघाटक म्हणून मा श्री राजेश राजगडकर उपमुख्य अभियंता, सीटीपी एस चंद्रपूर, हे असणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री रोहन घुगे (मा प्र से) सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर, श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी, श्री सुभाष कुमरे नियोजन अधिकारी, श्री रोशन इरपाते पोलीस उप निरीक्षक राम नगर पो. स्टेशन, चंद्रपूर हे आहेत.

या कार्यक्रमाची विशेष अतिथी म्हणून श्री धर्मराव पेंदाम, प्रा डॉ श्रीकांत मसराम, प्रा डॉ निलेश मंगाम, प्रा डॉ भूषण नैताम हे असणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व दहावी बारावी व पदवी च्या विद्यार्थ्यांना या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले आहे. 

आरसीसीपीएल (RCCPL) कंपनीत स्थानिकांना रोजगार द्या!

योगेश मडावी | सह्याद्री चौफेर

झरी : तालुक्यातील मुकूटबन येथे अनेक युवक बेरोजगार आहे. सध्या मुकूटबन येथील आरसीसीपीएल  (rccpl) कंपनीचे उत्पादन सुध्दा सुरू झाले आहे. परंतु स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा सुरू असून स्थानिक युवकांत कंपनी विरुध्द रोष निर्माण झाला आहे.
त्यामुळे मुकूटबन येथील युवकांनी रोजगार मिळण्यासाठी आरसीसीपीएल (RCCPL) कंपनीला व ग्रापंचायत कार्यालय मुकूटबन येथे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला.
चार वर्षापासून आरसीसीपीएल कंपनीचे युद्ध स्तरावर काम झाले असून उत्पादन सुध्दा सुरू आहे. चार वर्षापासून स्थानीक पुत्रांना आश्वासन देऊन थापा मारीत कंपनीत कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्यासाठी हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत आता उत्पादन सुरू झाले असून कंपनी द्वारे कामगार व कर्मचारी भरती प्रक्रियेत कुशल, अकुशल कामाकरीता स्थानिक बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दयावा.
परराज्यातील कामगारांना रोजगार न देता, स्थानिकांना प्राधान्याने संधी देऊन रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी तोसीफ उमर शेख, नरेश दारसावार, वसीम हाफिज शेख, सत्यपाल कामतवार, सैफान रऊफ शेख, बबलू अन्सार सैय्यद व इतर कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले असून कंपनीने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू व हे उपोषण सतत सुरू राहील असा इशारा देण्यात आला.

श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील सन 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा व भगिनींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी करण्यात आले आहे.
 लातूर जिल्ह्यातील श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेची प्रत व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनी आपली थोडक्यात माहिती पुढीलपैकी कोणत्याही एका व्हाट्सअप वर दिनांक 20 जुलै 2022 पर्यंत सादर करावी असे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. संपर्कसाठी व व्हाट्सअप नंबर खालीलप्रमाणे :
1.सुदर्शन बोराडे:-7588018828
2.अनंत पांचाळ:-9850641554
3.अंगद पांचाळ:-9922929892
4.राम महामुनी:-9767350054
5.श्रीरंग पांचाळ:-9884411317
6.राम रत्नपारखी:-983485893 
7.सुधाकर दापेकर:-9921564840
8.बालाजी सुवर्णकार:-8180022149

नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील व्हि. एन. के. नगरातील व सध्या देवणी पोलीस स्टेशन येथे सेवेत कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार असलेले नारायण लिंगोजी डप्पडवाड पीएसआय पदी पदोन्नती झाली आहे.
डप्पडवाडांच्या सेवेच्या कालावधीत त्यांनी मुरुड, लातूर, उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट कार्य केले असून, त्यांची पी. आय. एस. पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा व्हि. एन. के. नगरच्या वतिने सत्कार. व्हि. एन. के. नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय राठोड, सचिव सुधाकर मोहिते व उपाध्यक्ष अरविंद धनूरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच पुढील कार्यास त्यांना शुभकामना देण्यात आल्या. 
या वेळी अनिरुद्ध रणसुभे यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला, दोघांनाही अमृतसंदेश ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी व्ही.एन. के. नगरीची सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक व आभार सहसचिव राजेंद्र सास्तुरकर यांनी मांडले.

सोशल मीडियावरील व्यस्तता ठरते डोकेदुखी; इंटरनेटच्या डेटा वापरातच युवकांचा टाईमपास...


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : सध्याच्या युगात सर्वत्र दिवसेंदिवस मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला आहे. 'दीड जीबी सारा गाव बीजी' अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे. युवकांच्या वाढत्या व्यस्ततेमुळे कुटुंबियांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो.

सदर मोबाईल फोन वर सर्रास अघातीक व्हिडिओ टाकण्यात येते.ते व्हिडिओ तरुण युवा नवयुवक वर्ग बघुन मार्ग चुकतात किंबहुना वाम मार्गाने जातात या बाबत अनेक विध्यर्थीचे पालक यांच्याशी ग्रामीण भागातील व शहरी भागातील पालक वर्ग यांच्याशी संपर्क साधला त्यांनी वरिल प्रक्रीया आमच्या प्रतिनिधीशी सांगीतले.
मुले अल्पवयातच एक ना अनेक प्रकारच्या व्यसनाकडे वळत असल्याचे दिसते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना पालक वर्गांना करावा लागत आहे. याकरिता जिल्हा तालुका स्तरावरून शाळांच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोबाईल व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्रे चालवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलात एकाकीपणा वाढत आहे. कारण अलीकडच्या काही वर्षात मोबाईल इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की,त्याकडे कुणाचे ध्यानच गेले नाही.
 'माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो. त्याला मोबाईलमधलं सगळं काही जमतं' अशी कौतुकाची थाप पालक वर्ग मारत होती. मात्र, मुलं जस जशी त्यात गुरफटत गेली वास्तविक पालकांना भीती वाटायला लागली की मुलं आता हाताबाहेर जातील की काय,असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित झाला आहे. या विषयी जन चर्चा आहे.