संविधानिक पदावर राहून हिंदुत्व-हिंदुत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा नोंद व्हावा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : संविधानिक पदावर राहून संविधानाच्या विरोधात हिंदुत्व-हिंदुत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा नोंद व्हावा असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.
पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा या लढवय्या संघटनेचे संस्थापक महासचिव पॅन्थर माकणीकर म्हणाले की, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष असून लोकशाही मार्गाने निवडून येऊन ज्या संविधानाची शपथ घेऊन पदभार सांभाळता, संविधानिक पदावर स्थानापन्न होता आणि हिदुत्व-हिन्दुत्व करता हा भारतीय संविधांना चा घोर अपमान असून हा राष्ट्रद्रोह ठरवावा. व अश्या बेईमान लोकप्रतिनिधींवर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा नोंदवून जेरबंद करण्यात यावे असे ही ते म्हणाले.
संविधानिक पदावर राहून कोणत्याही एका धर्माचे गुंणगाण करून भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या लोक प्रतिनिधी ला क्षमा न करता संबंधित परिसरातील दक्ष नागरिक किंवा पोलीस अधिकाऱ्याने तात्काल दखलं घेऊन होणाऱ्या किंवा घडणाऱ्या असंवैधानिक कृत्याला आळा घालावा. असेही आवाहन डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले.

मानव विकास मिशन अंतर्गत बसेस तात्काळ सुरू करा - संभाजी ब्रिगेड ची मागणी

नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

वणी : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शालेय नवीन सत्र सुरू झाले आहे. त्यातच झरी जामणी तालुक्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू झाले आहेत. परंतु परिवहन व्यवस्थेत झालेल्या दर वाढीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहेत.
त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. झरी जामणी तालुका हा मागासलेला तालुका आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना योग्य त्या वाहतुकीच्या व्यवस्था नाही. आणि आहे ते भाडे परवडणारे नाही. त्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या बससेवा विद्यार्थ्यांसाठी त्वरित सुरू कराव्या अशी मागणी करण्यात आली.
बस सेवा सुरू करण्यासाठी आज वणी आगर व्यवस्थापक यांची भेट घेवून आगर प्रमुखाशी चर्चा केली. तेव्हा असे दिसून आले की,बस सेवा सुरू करण्यात येत आहे. परंतु बस सेवा सुरू करण्यासाठी झरी तालुक्यातील कोणत्याही शाळा मुख्याध्यापक, कॉलेज चे प्राचार्य यांनी आगार प्रमुखाकडे विद्यार्थी संख्या व बस चालू करण्यासाठी पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे बस सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष आशिष झाडे यांनी शाळा व कॉलेज व्यवस्थापक यांना आव्हान केले की, जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार, त्यासाठी शाळा कॉलेज व वणी आगार जबादार राहील अशा इशारा दिलेल्या निवेदनातून केला आहे. 

राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत दि. 9 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत विविध उपक्रम/कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत."स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तर अशा विविधस्तरावर "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांचे जनसहभागातून आयोजन करण्यात येणार आहे.

"स्वराज्य महोत्सव" अंतर्गत राज्य स्तरावरील कार्यक्रम
समूह राष्ट्रगान, आयकॉनिक सांस्कृतिक कार्यक्रम, कॉफीटेबल बुक प्रकाशन, 60 मान्यवरांच्या लेखांच्या ग्रंथाचे प्रकाशन, गिरगाव चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई. इ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन
हुतात्मा स्मारके सुशोभिकरण, रस्ते संग्रहालय, 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभेचे आयोजन, एनसीसी/एनएस एस सायक्लोथॉन/मॅरेथॉन स्पर्धा आयोजन, विविध निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धा आयोजन, प्रदर्शने, हर घर तिरंगा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यापीठस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन, पुरातत्व दृष्ट्या महत्वाच्या स्थळांची स्वच्छता मोहीम, जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तालुकास्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन
वृक्षारोपण मोहीम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, वारसा स्थळ /पुरातत्व दत्तक योजना, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आकाम लोगो, स्वच्छता मोहीम, संविधान स्तंभ उभारणी

ग्रामस्तरावर कार्यक्रमाचे आयोजन
विशेष ग्रामसभा, हर घर तिरंगा, प्रभात फेरी, स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा, अर्थसाक्षरता विषयक शिबीर, शेतकरी मेळावे, पर्यावरण संर्वधन शपथ, वृक्षारोपण, शालेय स्पर्धा, किशोरी मेळावे, देशभक्तीपर चित्रपट दाखविणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन "स्वराज्य महोत्सवांतर्गत करण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे – विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे. या भूमीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे. दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे. अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे सामाजिक न्याय भवनातील सभागृहात एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, बार्टी पुण्याचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा प्रादेशिक उपायुक्त सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण) सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून द युनिक ॲकडमी पुण्याचे तुकाराम जाधव, बीएस एज्युकेशन बॅकींग सोल्युशनचे अखिल कस्तुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. खोडे म्हणाल्या की, वेळेचे अचूक नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे कठीण नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या कमी आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाव्दारे (बार्टी) मागासवर्गीयांना युपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. मुलाखतीची तयारी करुन घेतली जाते. संस्थेच्या या स्तूत्य उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन परीक्षेत यश प्राप्त करुन आपले जीवन उज्वल करावे.

जिल्हाधिकारी श्रीमती विमला म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी कोणाचा व कुठला आदर्श धरावा, हे निश्चित करणे आवश्यक आहे. अनेक महापुरुषांनी शून्यापासून सुरुवात करुन यशाचे उंच शिखर गाठले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा ही बाबपण लक्षात घेणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करावे. बार्टी या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यामागचा मुख्य हेतू व बार्टीकडून देण्यात येणारे स्पर्धापूर्व प्रशिक्षण यासंदर्भात श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा शिकवणीवर्गाचे अखिल कस्तुरकर व तुकाराम जाधव यांनी स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंचे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहारार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. सूत्रसंचलन सतीश सोमकुंवर तर शितल गडलिंग यांनी आभार मानले. या कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे महागांव तहसीलदार यांना निवेदन

नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागांव : तालुक्यातील कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूर आज दि.01 जुलैला महागांव तहसील कार्यालयावर धडकले असून तहसीलदार साहेब यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

सविस्तर असे की, शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत वन्यप्राणी शेतातील पिके फस्त करित आहे. कळपाच्या कळप पिकांचे नुकसान करत असल्याने हातातील पीक जाण्याची शक्यता तसेच रात्र शेतात जागल्याशिवाय पर्याय नाही, परिणामी वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस घालणे सुरु आहे. लाईट चा पुरवठा नसल्याने शेतामध्ये अंधारात रात्र काढणे हे जीव धोक्याचे असल्यामुळे या गंभीर बाबीकडे वन विभाग व संबंधित विज महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आम्ही सर्व गावकरी अशी मागणी करित आहे की, परिसरात वाघाची दहशत असल्यामुळे एजी लाईन किमान 1 फेज तरी 24 तास द्यावा, अनंतवाडी सबस्टेशन ते वरोडी टेल पर्यंत वायरिंग बदलून घेणे, वरोडी ते कासारबेहळ फिडर वेगळे करून देणे, एजी व गांव फिडर डिपी मेन्टनन्स करणे, व या परिसरातील लाईनमन व्यवस्थित सेवा (service) देत नसल्याने त्याची एकतर बदली करा किंवा त्याला समज द्या, जर येत्या सात दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्व गावकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू अशा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

सध्या पेरणी आटोपली पाऊस मात्र, दडून बसल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे निसर्ग कोपल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. परिणामी वन्य प्राण्यांचा हैदोस व पाण्याअभावी माल हातून जाईल असे असतांना संबंधित प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर आज धडकले आहे.
यावेळी माजी पं स सदस्य संदीपभाऊ ठाकरे, नंदकुमार मस्के, प्रमोद अडकीने, राधेश्याम कवाने, उल्हास अडकीने, पंजाबराव कदम, शिवाजी अडकीने, मोहन कऱ्हे, अरविंद शिंदे, मोहन चव्हाण, सुनील राठोड, यशवंत तावडे, मुन्ना राठोड, संजय चव्हाण, निरंजन कवाने, संजय पावडे, सदानंद जाधव, विठ्ठल कऱ्हे, माधव कवाने, उत्तम वारकड सखाराम गानारकर, महेश तुमवार, दीपक मकडे, अरविंद ठाकरे, बालाजी माके, पुंगाजी इलेवाड, संदीप ठागे , संभाजी पावडे, भगवान कवाने,अवधूत पत्रगळे, रवि कवाने भावराव जाधव आदिसह शेतकरी व गावकरी उपस्थित होते.