अभिष्टचिंतन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा श्री राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

                            ||अभिष्टचिंतन ||


               ना मतांसाठी,
                 ना स्वार्थासाठी
           झिजतो रात्र दिवस
             फक्त जनतेसाठी..!

                        जीवेत शरद: शतम् ! 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष 
मा.श्री. राजूभाऊ उंबरकरजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

आपणास निरोगी दीर्घायुष्य, उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर न्यूज परिवार 

1 जुलै "महाराष्ट्र कृषी दिन"

                  कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

आजही महाराष्ट्रात शेतकर्‍यांची स्थिती बिकट आहे. देशाचा अन्नदाता असणार्‍या बळीराजावर बिकट संकट असल्याने अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आजच्या 'कृषी दिना'पासून प्रत्येकाने शेतकर्‍याप्रती आपलं असलेले सामाजिक भान लक्षात घेता बिकट काळात शेतकर्‍याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देणं गरजेचे आहे.
राज्यातील तमाम शेतकऱ्यांना 'महाराष्ट्र कृषी दिना'च्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- श्री विठ्ठल पाटील खारकर 
कृषी मार्गदर्शक तथा संचालक
सुमेध ऍग्रो ट्रेडर्स, वरोरा 



महागांव: शेकडो शेतकरी तहसील व महावितरण कार्यालयावर धडकणार

सह्याद्री | चौफेर न्यूज 

महागांव : तालुक्यात मागील चार महिन्यात तीन ते चार पशुधन वाघाने फस्त केली. त्यामुळे कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या गावातील शेतकरी शेतमजूर दहशतीत आले आहे.

सध्या पेरणी आटोपली पाऊस मात्र, दडून बसल्याने बळीराजा चिंतेत आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे निसर्ग कोपल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पाण्याअभावी माल हातून जाईल असे बोलल्या जात आहे. 

वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व विज महावितरण कंपनीने शेतमालच्या जागली यासाठी सिंगल फेज किमान रात्री विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी दि.01 जुलै रोजी दुपारी 12 वाजता महागांव तहसील व विज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेकडो शेतकरी धडकणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मस्के यांनी सांगितले.

उद्या शुक्रवारी कासारबेहळ, सेवानगर, वरोडी, वरोडी (जुनी), या परिसरातील शेतकरी बांधवानी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे "अभी नही तो कभी" असेही, आवाहन प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. 

पावसाळ्यात वीजांपासून वाचण्यासाठी अशी करा तयारी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

पावसाळ्यात अनेकदा मोठ्या प्रमाणात वादळ वारे व विजा पडत असतात. विशेषतः मान्सून काळात वीजा पडणे/वज्राघात होण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे मोठी मनुष्यहानी, पशुहानी होते त्याचबरोबर वित्त हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपत्तीची हानीकारकता कमी करु शकतो. नागरिकांनी वज्राघात/विज पडल्यास कोणती काळजी घ्यावी व काय उपाययोजना कराव्यात, याबद्दल जाणून घेऊयात...

वज्राघात झाल्यास काय करावे व काय करू नये
सतर्कतेची/चेतावणी चिन्हे : अतिवेगवान वारे, अतिपर्जन्य आणि काळे ढग, घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात, जास्त किंवा अधिक जास्त प्रमाणात मेघगर्जना.
वस्तुस्थिती:- वीज ही सामान्यपणे उंच वस्तूंवर पडते, कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही परंतु, काही स्थाने इतर ठिकाणापेक्षा सुरक्षित आहेत, मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामांपेक्षा जास्त सुरक्षित असतात, जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही वज्राघात होऊ शकतो (16 कि.मी.), वज्राघात सतत एकाच ठिकाणी होऊ शकतो, अशा परिस्थितीत सामान्यतः बाहेर पडलेल्या व्यक्तीच वज्राघातामुळे जखमी किंवा मृत्यू पावतात, वज्राघात बाधीत/जखमी व्यक्तीस तुम्ही मदत करू शकता. त्याच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्या व्यक्तीस तात्काळ/त्वरीत मदत करावी.

काय करावे पूर्वतयारी

• वज्राघातापासून बचावासाठी भित्तीचित्रे / भित्तीपत्रके प्रदर्शित करा. आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेच्या माहितीचे निरीक्षण करा.

• स्वतःसाठी व कुटुंबासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेसंदर्भात तसेच स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात संपर्क करण्यासाठीचा आराखडा तयार करा.

• वैद्यकीय व स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील तयार करणे.

• आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवा.

• जर गडगडाटी वादळाचा/अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर/घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे.

• वीजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानूकुलित यंत्रे बंद ठेवावे.

• आपल्या घराच्या आजूबाजूच्या वाळलेले झाडे किंवा मृत झाडे फांद्या काढून टाकणे.
तुमच्या परिसरात वादळी वारे वाहत असल्यास /विजा चमकत असल्यास
घरात असल्यास: घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा, घराच्या दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहावे, मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच राहावे.

घराबाहेर असल्यास : त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे (मजबूत इमारतीकडे) प्रस्थान करावे, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातूपासून तयार झालेली वाहने (बस मोटार) चांगली आश्रयस्थळे होऊ शकता. उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. (परंतु अचानक येणाऱ्या पूरापासून सावध राहा), जर जमिनीच्या वर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.

वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास: त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत, इजळाला (बाधित व्यक्ति) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.
इजा झालेल्या इसमास पुढीलप्रमाणे हाताळा:
 श्वसन बंद असल्यास:- तोंडावाटे पुनरुत्थान (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी.

हृदयाचे ठोके बंद असल्यास:- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती सीपीआर (CPR) करुन सुरु ठेवा.

इजाळाची / रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास - इतर दुखापतींसाठी/आघातांसाठी तपासणे (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे).

काय करू नये
तयारी:- गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे/ बस/सहलीची आश्रयस्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/ दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी जागी जाणे, या जागांजवळ उभे राहणे टाळावे.

घरात असल्यास: वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्रिक/इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये. (अशा आपत्कालीन वेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे). गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करु नयेत. काँक्रिटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा (धातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग व प्लंबिंग/नळ).

घराबाहेर असल्यास: मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स पासून लांब राहावे.

वज्राघात किंवा वीज पडणे ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही नैसर्गिक आपत्ती कदाचित रोखली जावू शकत नाही, मात्र योग्य उपाययोजना करुन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून आपली व आपल्या संपत्तीची हानी होण्यापासून वाचू शकतो. मनुष्यहानी आणि वित्तहानी निश्चितच कमी केली जावू शकते किंवा पूर्णत: रोखलीही जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात प्रशासनाकडून जारी केल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

- नंदकुमार ब. वाघमारे
माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

अग्नीपथ योजना रद्द करा - ऑल ईंडीया स्टुडंट फेडरेशन व ऑल ईंडीया युथ फेडरेशनची मागणी

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : केंद्र सरकारच्या प्रस्तावित अग्निपथ योजनेविरोधात ऑल ईंडीया स्टुडंट फेडरेशन व ऑल ईंडीया युथ फेडरेशनच्या वतीने वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि. २९) दुपारी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
 ‘अग्निपथ 'योजना मागे घ्या, व शहीद भगतसिंग रोजगार गॅरंटी कायदा (BNEGA) संसदेत पारीत करा, देशातील प्रत्येक बेरोजगारला रोजगाराची हमी द्या, या प्रमुख मागण्यांना घेऊन जाईंट लेफ्ट स्टुडन्ट,युथ संघटनांचा ऑल ईंडीया प्राेटेस्टचे आवाहनानुसार जोरदार शक्ति प्रदर्शनही करण्यात आले.
कॉ अनिल घाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आंदोलनात राकेश खामनकर, सारंग घाटे, अथर्व निवडींग, शंकर केमेकर, अभय चरडे, पांडुरंग ठावरी, धनंजय आसुटकर, प्रफुल केमेकार आदींसह मोठ्या संख्येने विद्याथीॆ युवक सहभागी झाले होते.