देशमुखवाडी : डाहुले गुरुजी अनंतात विलीन

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : येथील महादेव कृष्णाजी डाहुले रा. देशमुखवाडी, वणी यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 81 वर्षाचे वय होते.

जिल्हा परीषद शाळा राजुर येथील सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या मागे- विवाहित 8 मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे.

वणी मोक्षधाम येथे आज त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 

2019 पासून राज्यातील जिल्हा परिषदांची स्थगिती असलेली भरती प्रक्रिया सुरू करा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या पदांची जाहिरात मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार रिक्त असलेल्या 13521 विविध पदासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते दरम्यानच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर गेली राज्यातील सरकारने कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे नोकर भरतीवर स्थगिती लागली परंतु कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेवर ताण असल्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यातील पदे भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पाच प्रकारच्या पदभरती साठी मंजुरी देण्यात आली होती. ही पदे आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ याप्रमाणे होती. या पदांच्या परीक्षांचे नियोजन ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आले होते परंतु दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर करून परीक्षा पुढे ढकलण्यात आले परंतु आरोग्य विभाग परीक्षेतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर या परीक्षांचे भविष्य अंधातरी लटकले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेमधील 13521 जागेसाठी मार्च 2019 मध्ये 12 लाखावर विविध पदासाठी अर्ज आले. एका उमेदवाराने ते दोन ते तीन हजार रुपये खर्च करून विविध पदासाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने, जिल्हा परिषदेचेही पदभरती होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढला आहे.

राज्यात झालेल्या नुकत्याच परीक्षेत अनेक घोटाळे, बनावट उमेदवारांना पकडण्यात आले. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात आहे त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर, अंग तपासणी यंत्र बंधनकारक करावे.

 येत्या पंधरा दिवसात परीक्षेची तारीख जाहीर करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अशा प्रकारचे निवेदन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर, राहुल वनकर, सुरज खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सेवानिवृत्ती बद्दल सोमवंशी कालिदास यांचा सन्मान सोहळा संपन्न

बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : सेवानिवृत्ती बद्दल सोमवंशी कालिदास यांचा सन्मान सोहळा संपन्न उदगीर प्रतिनिधी मराठा शिक्षण प्रसारक मंडळ या अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चालवा प्राथमिक विद्यालय उदगीर येथील हिंदी विषयाची सहशिक्षक कालिदास सोमवंशी हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

 या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजाराम भोसले यांच्यासह विचारपीठावर शाळेतील शिक्षिका कुसुम फरकांडे व शिक्षक बालाजी सुवर्णकार उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या वतीने कालिदास सोमवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी आनीता सोमवंशी यांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बालाजी सुवर्णकार, कुसुम फरकांडे व यांची समयोचित भाषणे झाली. या प्रसंगी कालिदास सोमवंशी यांनी आपल्या सेवेच्या कालावधीत केलेल्या कार्याची माहिती दिली व यापुढेही मी शाळेच्या कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले मुख्याध्यापक राजाराम भोसले यांनीही कालिदास सोमवंशी यांच्या केलेल्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीना गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका सुनिता तेलंग यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळुन, अशोक चौधरी यांचा आगळा-वेगळा उपक्रम


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : तालुक्यातील ढोक (वाई) येथील मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा देत असताना देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी घडविणे हे परम कर्तव्य पार करित असताना समाजाची जान असणारे फार कमी शिक्षक असतात,त्यापैकी ढोकी (वाई) येथील आदर्श मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी आपल्या ५९ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधत कुठलाही अवाजवी खर्च न करता, जन्मभुमी असलेल्या ढोकी(वाई)येथील,५० विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून,साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.

अत्यंत खडतर परिस्थितीतुन जिवन काढुन,ढोकी(वाई) गावाचे नाव राज्य पातळीपर्यंत पोहचविले.हिच जान मनात ठेवून, आपल्यावरील असलेले ॠण फोडण्याचे छोटासा प्रयत्न वाढदिवसानिमित्त मा.मुख्याध्यापक अशोक चौधरी यांनी केला आहे. यावेळी गावातील जेष्ठ नागरीक मनोजसिंग काळे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन,कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी गावातील महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम सुत्रसंचालन निलेश चौधरी तर आभार जगदिपसिंग काळे यांनी केली. यावेळी गावातील रामभाऊ राऊत,विक्रमसिंह डोंगरे,अशोक भोयर,राहुलसिंग काळे,सुनिल ठाकरे,रणजित चिकनकर, मंगल राऊत, विशाल बोंडे,दिनेश चौधरी,निखिल चिकनकर, राहुल चिकनकरसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 
           
उदगीर : येथील आयोजित 95 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात केंद्रीय प्राथमिक शाळा गौंडगाव येथे प्राथमिक पदवीधर म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती वर्षा करंजे लिखित 'ओंजळ प्राजक्ताची' कवितासंग्रहाचे प्रसिध्द साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

व्यासपीठावर श्रीपाल सबनीस,कवियत्री वर्षा करंजे,श्रीमती अदिती टाकेकर,डाॅ.बालाजी संमुखराव व साहित्यिक उपस्थित होते.यावेळी अनेक रसिक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत 'ओंजळ प्राजक्ताची 'कवितासंग्रहांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
        
कवितासंग्रह प्रकाशित झाल्यामुळे देवणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड,शिक्षणविस्तारअधिकारी सुर्यकांत येडले,केंद्रप्रमुख केशव नरवटे,मु.अ.शिवाजी इंचुरे,जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार,तालुकाध्यक्ष शिवाजी टिळे व तालुक्यातील शिक्षक बांधवांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.