विनोदभाऊ ढूमणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : शिवसेना यवतमाळ जिल्हा व माँ आरोग्य सेवा समितीच्या संयुक्त विध्यमाने आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त शिवसेना यवतमाळ च्या वतीने वसंतराव वैधकीय महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले, ह्या कार्यक्रमासाठी नामदार संदीपान भुमरे पालकमंत्री यवतमाळ तथा माननीय आमदार संजय राठोड, जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, श्रीधर मोहाड,संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती यवतमाळ, राजूदास जाधव संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश घेतला.

विनोदभाऊ ढूमणे सुपरिचित व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे मन मिळाऊ संजयभाऊ देरकर यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात सतत सोबत असणारे कट्टर समर्थक अशी ख्याती असलेले ज्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षांमध्ये वणी माजी शहर उपाध्यक्ष पदावर कार्य करीत होते,तरी आज रोजी त्याच्या प्रवेशामुळे शिवसेनेला त्याचा फायदा होणार अशी प्रतिक्रिया वणी मतदारसंघातुन ऐकावंयास मिळत आहे.
ह्यावेळी संतोष कुचनकार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वणी, प्रेमानंद धानोरकर संचालक कृ. बा. समिती वणी, डॉ.जगन जुनघरी, भगवान मोहिते, प्रवीण खानझोडे, नागेश किनाके, मनोज भट यावेळी उपस्थित होते.

थकीत मानधन त्वरित अदा करा, नाही तर आत्मदहनाची परवानगी द्या

चेतन पवार : सह्याद्री चौफेर 

यवतमाळ: लसीकरणाचे सलग सहा महिने रोजंदारीने काम केले. यासाठी निर्धारित केलेले मानधन न देता केवळ २० हजार रूपये देवून बोळवण केल्याची तक्रार डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील चव्हाण यांनी गुरूवार, दि. २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली. यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा आत्मदहनास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली.

दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणाकरीता डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील चव्हाण, एएनएम चैताली आशिष, ललिता होलगरे, कॉम्प्युटर ऑपरेटर नीरज चव्हाण यांना रोजंदारी तत्त्वावर कार्यरत होते.कॉम्प्युटर ऑपरेटर, एएनएम यांना पाचशे रूपये प्रति दिवसदेण्याचे जमा केले. निश्चित झाले होते. तद्नंतर सलग सहा महिने कुठल्याही प्रकारची सुट्टी न घेता त्यांनी लसीकरणाचे काम केले, परंतू उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने कुठल्याही स्वरूपाचा मोबदला त्यांना दिलाच नाही.सप्टेंबर २०२१ रोजी त्यांना निवेदनातून केला आहे. कामावरून कमी करण्यात आले. आणि वरिष्ठ कार्यालयातून पैस मिळाल्यानंतर मानधन करू, असे सांगितले. शेवटी संतप्त रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मानधन अदा करण्याबाबतचे आदेश दिले. दरम्यान, २५ नोव्हेंबर २०२१ ला त्यांच्या खात्यात २० हजार रूपये
प्रत्यक्षात मात्र महिन्याकाठी २० हजार रूपये मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. केवळ २० हजार रूपये मानधन देवून प्रशासनाने बोळवण केल्याचा आरोप त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
यासंदर्भात गुरूवार, दि. २८ एप्रिल रोजी परत स्वप्नील चव्हाण अदा यांनी निवेदन दिले.

मानधन अदा करा, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी निवेदनातून केली.

एस.पी.एम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराट्र दिन संपन्न


सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : शि.प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम वंदे मातरम राष्ट्रीय गीत झाले त्यानंतर शालेय प्रार्थना सादर करण्यात आली.
 
शाळेचे मुख्याध्यापक मा श्री क्षीरसागर सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर उपस्थित होते,ध्वजारोहनानंतर राष्ट्रगीत झाले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचारी उपस्थीत होते.

सूत्रसंचालन मा. श्री. बुजोने सर यांनी केले.

दारव्हा येथे मा.आ संजयभाऊ राठोड यांची पाणीटंचाई निवारणार्थ आढावा सभा सपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : येथील शासकीय विश्रामगृह येथे दारव्हा दिग्रस नेर मतदार संघाचे लाडके आमदार मा.संजय भाऊ राठोड माजी वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दारव्हा तालुक्यातील पाणी टंचाई निवारणार्थ आढावा सभा घेतली यावेळी दारव्हा तालुक्यातील सर्व गावांमध्ये शासनाच्या विविध योजनेतून जसे राष्ट्रीय पंप योजना जल जीवन मिशन खनिज विकास निधी जिल्हा नियोजन निधी तसेच संपूर्ण तालुक्यात सद्यस्थितीत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व पाणी टंचाई निवारणार्थ सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात व समस्त तालुक्यातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी सौ.कालींदाताई पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा,श्रीधर मोहोड माजी शिक्षण व आरोग्य सभापती, सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी दारव्हा, सुभाष जाधव तहसीलदार, राजीव शिंदे गटविकास अधिकारी दारव्हा,उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा कवाडे साहेब, महावितरणचे कवाडे साहेब, डी.वा. ई.राठोड साहेब, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव,माजी उपसभापती सौ.उषाताई चव्हाण, शहर प्रमुख राजू दुधे तथा हरिभाऊ लिंगणवार व समस्त पटवारी, सचिव सरपंच,उपसरपंच व समस्त पदाधिकारी उपस्थित होते.

खळबळजनक: शेतकऱ्यांचा सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपावण्याचा प्रयत्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात खळबळ उडवून देणारा प्रकार हटवांजरी येथे शुक्रवारच्या रात्री घडला. चक्क! पिडीत शेतकऱ्यांनी सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली. त्यामुळे हटवांजरी येथील जमिनीचा मोबदला प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. 

तालुक्यातील सराटी, हटवांजरी शिवारात १३ वर्षांपूर्वी सिंचन विभागाने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यात येथील किमान चोवीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरेदी करीत अधिग्रहीत करण्यात आल्या. यातील केवळ ६ जणांना नव्या निकषानुसार चौपट पटीने नुकसान भरपाई अदा करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांची जमीन तोडक्या दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.

सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना जिल्हा सिंचन प्रशासनाने शुक्रवारला थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करताच बघता बघता दोन शेतकऱ्याने चक्क! गळफास लावला. उपस्थितात आरडाओरड होताच ग्रामस्थांच्या समयसुचकतेने समोरील अनर्थ टळला. या घटनेने प्रशासनात कमालीची भंबेरी उडाली मात्र, स्थानिकात प्रचंड संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संतप्त प्रकरणाची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी घटनास्थळी भेट देत सदरील प्रकरण शासन दरबारी मांडण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले. तूर्तास प्रकरण शांत करण्यात आले असले,तरी प्रशासनाच्या बेताल भूमिकेवर शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना खदखदत आहे.