खळबळजनक: शेतकऱ्यांचा सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपावण्याचा प्रयत्न


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात खळबळ उडवून देणारा प्रकार हटवांजरी येथे शुक्रवारच्या रात्री घडला. चक्क! पिडीत शेतकऱ्यांनी सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली. त्यामुळे हटवांजरी येथील जमिनीचा मोबदला प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. 

तालुक्यातील सराटी, हटवांजरी शिवारात १३ वर्षांपूर्वी सिंचन विभागाने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. यात येथील किमान चोवीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरेदी करीत अधिग्रहीत करण्यात आल्या. यातील केवळ ६ जणांना नव्या निकषानुसार चौपट पटीने नुकसान भरपाई अदा करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांची जमीन तोडक्या दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली.

सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना जिल्हा सिंचन प्रशासनाने शुक्रवारला थेट जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम सुरू करताच बघता बघता दोन शेतकऱ्याने चक्क! गळफास लावला. उपस्थितात आरडाओरड होताच ग्रामस्थांच्या समयसुचकतेने समोरील अनर्थ टळला. या घटनेने प्रशासनात कमालीची भंबेरी उडाली मात्र, स्थानिकात प्रचंड संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संतप्त प्रकरणाची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी घटनास्थळी भेट देत सदरील प्रकरण शासन दरबारी मांडण्यात येऊन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले. तूर्तास प्रकरण शांत करण्यात आले असले,तरी प्रशासनाच्या बेताल भूमिकेवर शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना खदखदत आहे.
खळबळजनक: शेतकऱ्यांचा सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपावण्याचा प्रयत्न खळबळजनक: शेतकऱ्यांचा सामूहिक गळफास घेऊन जीवनयात्रा संपावण्याचा प्रयत्न  Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.