सूरमाज फाउंडेशनच्या वतीने रेशन किटचे वाटप


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चोपडा : रमजानच्या या पवित्र महिन्यात तुम्ही जे काही चांगले काम कराल, त्यामध्ये आम्हाला ७०% अधिक गुण मिळतात. आणि ही विचारधारा डोळ्यासमोर ठेऊन सूरमाज फाऊंडेशनचे डॉ. मोहम्मद जुबेर शेख यांनी 29/04/2022 आणि 30/04/2022 तारीखला अक्कलकुवा शहरातील, मोठी राजमोवी, मीताफळी, सीता नगर, संजय नगर, सुरापाडा, सिकफळी, ताकवा मस्जिद, कुरेशी वाडा, बाजारपेठ, दर्गा रोड, हवालदार फली मकरणी फल्ली, अशा अनेक भागात, सर्व धर्माचे, गरीब, आणि गरजू लोकांना खाद्यपदार्थ कीट स्वरूपात वाटले.

किटमध्ये तांदूळ, तेल, तुवर डाळ, साखर, चहा, साबण, धने, हळद आणि इतर अनेक दैनंदिन वस्तूंचा समावेश होता. जे एक कुटुंब सुमारे 8 दिवस खाऊ शकते. वायरमन समीर पठाण, ताहीर शेख, तयेब मकरानी, जमील शेख, आदिल मकरानी, इर्शाद मेमन, मौलाना सैफुल्लाह मकरानी, हाफिज अब्दुल मतल्ली मकरानी, आकिब मकरानी या सर्व बांधवांनी हे काम पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे डॉ मोहम्मद जुबेर शेख यांनी त्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
(गरजूना खाद्यकिट वाटप करताना सुरमाज फाउंडेशन टीम)

हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाझ फाऊंडेशन) यांचे हे कार्य स्वीकारावे आणि त्यांच्या सर्व साथीदारांना अशाच प्रकारे सहभागी होण्यासाठी आम्ही अल्लाहकडे प्रार्थना करतो.


राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनांचे आयोजन; राज्याच्या विभागीय स्तरावर १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उद्घाटन


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे मुंबई आणि मुंबई उपनगरसह राज्याच्या सर्व विभागीयस्तरावर आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या प्रदर्शनांचे उद्या दि.1 मे रोजी उद्घाटन होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. मुंबईतील वरळी सी-फेस येथे कॉमन मॅन पुतळा परिसरात आणि रमाडा हॉटेल मागील जुहू बीच येथे प्रदर्शने भरविण्यात येणार आहेत.
दि. 1 ते 5 मे, 2022 या कालावधीत 5 दिवस ही प्रदर्शने सर्वसामान्यांसाठी दिवसभर खुली राहणार आहेत.

'दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची' या मोहिमेअंतर्गत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वरळी सी फेस येथे तर मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जुहू बीच येथे होणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर सह ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर येथे याच कालावधीत या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते या प्रदर्शनांचे उद्घाटन होणार आहे.

शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची सचित्र माहिती असलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी केले आहे.


ग्रामपंचायत पांढूर्णा आदर्श येथीलसूक्ष्म नियोजन योजनेकरिता निवड

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाअंतर्गत दश वार्षिक नियोजन/आराखड्यासाठी २०२२-२०२३ करिता पांदुर्णा आदर्श/ग्रामपंचायतीची निवड झाली असून त्या आराखड्यामुळे "मागेल त्याला काम" ही लक्षात घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी पाहिजे ते समृध्दी बजेट घेणे आवश्यक आहे. चमु निवासी दिवसाची कुटुंब सर्वेक्षण कारुन गावफेरी, शिवरफेरी व गावासभा घेऊन दहा वर्षाचा आराखडा बनविण्यात आला आहे. ह्या आराखड्याचा योग्य तऱ्हेने अंमलबजावणी झाल्यास “ मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द" ही संकल्पना साध्य होणार आहे . 

यावेळी पी.एम. डांबकर प्रामुख्याने ह्या आराखड्यासाठी एपीओ कलीम शेख, पीटीओ तायडे, अभियंता संजय रामटेके, कसंबे, राठोड, संघटक ऑपरेटर ठोंबरे तसेच गावातुन सरपंच रत्नदीप यादवराव पवार, सचिव संतोष पराते, तलाठी सुर्यवंशी, कोतवाल किरण मोरे उपसरपंच शितल पांडव, सदस्य नारायण आरु, वेणुताई लंगडे, आरती गडपायले, वंदना राठोड , सोपान आरु, नितीन जाधव, केवल पवार, रोहित राठोड, आरती देशमुख आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे पांढर्णा आदर्श गावाची पुन्हा आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल होणार निश्चित .

चिंचमंडळ ग्रामपंचायत सदस्याच्या पती विरोधात विविध कलमानव्यये गुन्हे दाखल तर, सचिवावर विनयभंगाची तक्रार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ ग्रामपंचायत ही काहींना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात नेहमी चर्चेत असते. अशीच काहीशी चर्चा सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. महिला सदस्यांच्या पती आणि सचिवांच्या कुस्ती ची चित्रफीत सोशल मीडियावर  वायरल होतांना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिल्याचे माहिती आहे. 

सविस्तर असे की, चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे जाब विचारण्यात आला. मात्र, यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्याचे पती सचिवास भेटण्यास गेले. यावेळी दोघात शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली.

एका महिला सदस्यांनीही ही ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांचेवर विनयभंगाचा तर शासकीय कामात अडथळा निर्माण व अनु.जाती / जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सातपुते यांचेवर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

शुक्रवार (ता.२९) रोजी चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते. मात्र, विहित वेळेतील ग्रामसभा सदस्यांच्या अनुपस्थिने झाली नाही.
दरम्यान, या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री दिवाकर सातपुते या उशीरा पतीसह उपस्थित झाल्या. यावेळेस ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवर शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस सदस्य सातपुते यांचे पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करित मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.

तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर, दिवाकर सातपुते यांचेवर शासकीय कामात अडथळा आणि अनु.जाती/जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलिस करित आहेत.

अवैध सावकारी लूट खपवून घेतली जाणार नाही – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

नांदेड : अवैध सावकारी लूट थांबविण्यासाठी कायदेविषयक जेवढे प्रावधान आहेत त्याचा काटेकोर वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून याला आळा घातला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारांनी कब्जा करून ठेवल्या आहेत, हडप केलेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत कायदाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, मार्केटिंग फेडरेशनचे उपसरव्यवस्थापक वीर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समितीचे सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. हे गाळप 25 मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रादेशिक सहसंचालक सचीन राव यांना दिल्या. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात एकुण लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने लक्षांकाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हा बँकेतर्फे दोन एटीएम व्हॅन व नवीन एटीएम कार्ड वाटप तसेच एटीएम उभारणीसाठी पुढाकार घेतला. प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा बँकेने 12 कोटी रुपयांचा नफा कमावला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजे. याचबरोबर बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नांदेड येथे सहकार खात्यातील सर्व संबंधित कार्यालयांसाठी एक प्रशस्त इमारत, सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी उपनिबंधक नांदेड यांना सांगितले.